शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

वादळात दिवा लावण्याची जबाबदारी, सतेज पाटील यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 11:15 IST

समीर देशपांडे कोल्हापूर : काँग्रेसचे बहुतांशी नेते मनातून हरले असताना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसला उभारी देण्याची जबाबदारी पक्षाने सतेज पाटील ...

ठळक मुद्देवादळात दिवा लावण्याची जबाबदारीसतेज पाटील यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर

समीर देशपांडेकोल्हापूर : काँग्रेसचे बहुतांशी नेते मनातून हरले असताना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसला उभारी देण्याची जबाबदारी पक्षाने सतेज पाटील यांच्यावर सोपविली आहे. केवळ माझा मतदारसंघ, माझे पै-पाहुणे, माझेच कार्यकर्ते, माझ्याच संस्था आणि जिथे-तिथे मीच आणि माझ्या घरातलेच अशी भूमिका घेणाऱ्या नेत्यांना बाजीला करत पुन्हा एकदा नवी सुरुवात करण्याचे आव्हान पाटील यांच्यासमोर आहे. देशभर निर्माण झालेल्या भाजपच्या वादळात पाटील कसा दिवा लावणार आहेत, यावर जिल्ह्यातील काँग्रेसचे भवितव्य अवलंबून आहे.शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी मंडळाच्या निवडणुका, राष्ट्रवादीचे तत्कालीन मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्याविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवून मिळविलेला विजय, त्यासाठी भाजप-शिवसेनेचे घेतलेले सहकार्य. दुसºयावेळी काँग्रेसची उमेदवारी घेत विजयी होऊन गृहराज्यमंत्रिपद अशी कामगिरी सतेज पाटील यांच्या नावावर आहे.मात्र, सन २०१४ च्या नरेंद्र मोदी यांच्या लाटेमध्ये त्यांचा पराभव झाला आणि जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा बदलली. गेली दहा वर्षे सतेज पाटील यांनी प्रत्येक तालुक्याच्या राजकारणामध्ये लक्ष घालायला सुरुवात केली. प्रत्येक तालुक्यात आपला स्वतंत्र गट करत त्यांनी बळ वाढविले. विधानसभेचा वचपा काढत त्यांनी महादेवराव महाडिक यांचा पराभव करत विधानपरिषदेत बाजी मारली.हे सर्व करत असताना त्यांनी कधीच स्वत :ला एका तालुक्यापुरते बांधून घेतले नाही. त्यामुळे ज्येष्ठ नेते पी. एन. पाटील हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असले तरी जिल्हाभर वावर सतेज यांचा राहिला. नगरपंचायतीपासून ते ‘गोकुळ’पर्यंत अनेक ठिकाणी त्यांनी अनेकांना बळ देण्याचा प्रयत्न केला. अशातच प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यरत असताना खुद्द त्यांनीच केवळ आठ महिन्यात पक्षाचाच राजीनामा दिला आणि काँग्रेस मुळापासून हादरली.त्यामुळे ही जिल्हाध्यक्षपदाची माळ सतेज यांच्या गळ्यात पडली. प्रत्येक पक्षीय किंवा स्वत:च्या कार्यक्रमांचे नेटके नियोजन, त्यासाठीची आवश्यक यंत्रणा राबविण्याची हिंमत यामुळे काँग्रेसला सतेज यांच्याशिवाय समर्थ पर्यायही नव्हता.

तालुका-तालुक्यातील काँग्रेसच्या नेत्यांना एकत्र करणे, प्रत्येकाच्या विविध संस्था, जिल्हा बँक, गोकुळ यातील राजकारणामुळे फाटाफूट झाल्याने अशांना किमान पक्षीय निवडणुकांसाठी एका जाजमावर आणणे हे फार मोठे आव्हान पाटील यांच्यासमोर आहे.काँग्रेसपासून दूर निघालेल्या युवापिढीला तेवढ्याच ताकदीने त्यांनासोबत घ्यावे लागेल तसेच भाजप-शिवसेनेतही दुखावलेले अनेकजण आहेत. त्यांनाही पाटील हात घालण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे आता ‘पदरचं खाऊन काँग्रेससाठी’काम करणाºया नेते, कार्यकर्त्यांची फळी जी गेल्या अनेक वर्षांत लुप्त झाली ती पुन्हा निर्माण करावी लागेल तरच जिल्ह्यात ‘हात’ टिकण्याची शक्यता आहे.कार्यकर्त्यांना पाठबळ देणारा नेतासत्तेत असो किंवा नसो; ‘कार्यकर्त्यांना पाठबळ देणारा नेता’ अशी त्यांची ओळख आहे म्हणून सध्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वेगळी भूमिका घेतानाही त्यांचे कार्यकर्ते बिनधास्तपणे त्यांची भूमिका पुढे नेताना दिसत आहेत. निवडणुकीतील अवगत असलेले तंत्र, ‘अरे’ला ‘कारे’ म्हणण्याची तयारी, विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी असलेला स्नेह, सातत्यपूर्ण संपर्क या जोरावर त्यांनी आपले हे स्थान निर्माण केले आहे ते पाटील यांना उपयुक्त ठरणार आहे. 

 

टॅग्स :Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलPoliticsराजकारणkolhapurकोल्हापूरcongressकाँग्रेस