शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
2
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
3
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
4
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
5
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
6
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
7
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
8
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
9
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
10
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
11
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
12
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
13
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
14
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
15
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
16
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
17
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
18
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

महाडिकांकडे जाणारे ठराव झेरॉक्स कॉपी : मंत्री मुश्रीफ यांचा चिमटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 00:45 IST

सर्वाधिक ठराव त्यांच्या बाजूने असतानाही त्यांना विजयासाठी झुंजावे लागले. थोड्या मतांनी आमचा पराभव झाला; पण आम्ही ‘गोकुळ’ सभासदांच्या मालकीचा राहावा; यासाठी संघर्ष कायम ठेवला आहे. आताही तीच भूमिका आहे.

ठळक मुद्दे‘गोकुळ’मध्ये मुश्रीफ सोबत असल्याचा सतेज पाटील यांचा निर्वाळा

कोल्हापूर : भाजपकडून ४०० ठराव आल्याची केलेली वल्गना ही अतिशयोक्तीच आहे. मागीलवेळीही सत्ताधाऱ्यांकडेच सर्वाधिक ठराव होते; पण मते किती पडली, याची आठवण करून देत पालकमंत्री सतेज पाटील यांनी कितीही गठ्ठ्याने ठराव जाऊ देत, असे सांगताच मध्येच ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘महाडिकांकडे जाणारे हे ठराव झेरॉक्स कॉपी आहेत’, असा चिमटा काढला. मागीलवेळी मी एकाकी लढत होतो, सत्ता थोड्या मतांनी हुकली, आता मुश्रीफ माझ्यासोबत आहेत, तेव्हा ‘गोकुळ’चे मैदान नक्कीच मारू, असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील हे गुरुवारी कोल्हापूर दौºयावर होते. शासकीय विश्रामगृहावर विविध विभागांच्या आढावा बैठका घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत भाजपची ताकद महाडिकांच्या मागे राहणार असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना मंत्री पाटील यांनी वरील स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, ‘मोठे बोलणे, अतिशयोक्तीपूर्ण बोलणे, ही काहींची सवयच झाली आहे. त्यातून भाजपकडे ४०० ठराव असल्याचे म्हटले गेले आहे. गत निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी त्याचा अनुभव घेतला आहे. सर्वाधिक ठराव त्यांच्या बाजूने असतानाही त्यांना विजयासाठी झुंजावे लागले. थोड्या मतांनी आमचा पराभव झाला; पण आम्ही ‘गोकुळ’ सभासदांच्या मालकीचा राहावा; यासाठी संघर्ष कायम ठेवला आहे. आताही तीच भूमिका आहे.

मागीलवेळी मी एकाकी लढत दिली होती. आता मुश्रीफ आमच्यासोबत असल्याने संघर्ष अधिक तीव्र होईल. त्यांनी कितीही ठराव गोळा करू देत, काही फरक पडत नाही. मल्टिस्टेट ठरावावेळी काय घडले होते, हे सत्ताधाºयांनी विसरू नये, असा सल्लाही मंत्री पाटील यांनी दिला.

 

  • चुयेकर यांचेही नरकेंच्या पावलावर पाऊल

जयश्री पाटील यांची निवृत्तीची घोषणा : शशिकांत रिंगणात असणारकोल्हापूर : मागील आठवड्यात ‘गोकुळ’चे संस्थापक-संचालक अरुण नरके यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आता चुयेकर कुटुंबीयांनीही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवले आहे. संस्थापक-चेअरमन असलेले दिवंगत आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या स्मृतिदिनीच त्यांच्या पत्नी व विद्यमान संचालक जयश्री पाटील यांनी निवृत्तीची घोषणा करताना मुलगा शशिकांत निवडणुकीत उमेदवार असेल, असे जाहीर केले आहे. आठवडाभराच्या फरकाने ‘गोकुळ’ची उभारणी केलेल्या संस्थापक कुटुंबातील खांदेपालट चर्चेचा विषय ठरली आहे.

  • गोकुळसाठी एप्रिलमध्ये मतदान होणार असले तरी ठराव संकलनावरून जिल्ह्यातील राजकारण तापले आहे. या वातावरणाला वेगळे वळण देणारी घटना मागील आठवड्यात घडली. दूध संघाच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान असलेले अरुण नरके यांनी आपण ‘गोकुळ’मधून निवृत्ती घेत आहोत, माझ्याऐवजी मुलगा चेतन नरके हा उमेदवार, असे जाहीर केले. संस्थापक संचालकांच्या या ऐनवेळच्या निवृत्तीवरून तर्कवितर्क लढवले जात असतानाच गुरुवारी आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या कुटुंबीयांकडून धक्का दिला. चुयेकर यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी आपण निवडणुकीला उभे राहणार नाही, येणाऱ्या निवडणुकीत मुलगा शशिकांत पाटील चुयेकर हेच उमेदवार असतील, असे जाहीर केले.संघाच्या संस्थापक कुटुंबातील खांदेपालट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul Milkगोकुळ