शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
4
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
5
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
6
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
7
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
8
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
9
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
10
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
11
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
12
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
13
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
14
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
15
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
16
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
17
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
18
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
19
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
20
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान

Kolhapur: टोलवाटोलवी नको; खंडपीठासाठी जागा आरक्षित करा!; सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांकडून अपेक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 12:38 IST

वकिलांची मागणी, इमारतींसाठी व्हावी आर्थिक तरतूद

उद्धव गोडसेकोल्हापूर : खंडपीठासाठी ११०० कोटी रुपयांच्या निधीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठ वर्षांपूर्वी केली होती. खंडपीठ अस्तित्वात येण्यासाठी न्याययंत्रणेकडून सकारात्मकता दिसत असताना मूलभूत सुविधांची पूर्तता करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. यासाठी घोषणा केलेल्या निधीची तरतूद करण्याची गरज आहे. तसेच कर्नाटकातील धारवाड आणि गुलबर्गा खंडपीठाप्रमाणे इमारतींची व्यवस्था करावी. यासाठी सहा जिल्ह्यांतील पालकमंत्र्यांनी प्रयत्न करावेत, अशी वकिलांची अपेक्षा आहे.

खंडपीठासाठी ५० एकर जागेची मागणी बार असोसिएशनने महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून शेंडा पार्क येथील जागा उपलब्ध असल्याचे कळविले होते. विभागीय आयुक्तांनी पहिल्या टप्प्यात २७ एकर जागा देण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.

मात्र, ही जागा आरक्षित करणे आवश्यक आहे. यासाठी सहा जिल्ह्यांतील पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जागेच्या आरक्षणाचा आणि मूलभूत सुविधांचा आग्रह धरणे गरजेचे आहे. जागा, इमारत, न्यायाधीशांची निवासस्थाने याचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे सादर केल्यास अंतिम निर्णयास गती मिळेल, असा विश्वास बार असोसिएशनने व्यक्त केला. यासाठी वकिलांनी कर्नाटकातील धारवाड आणि गुलबर्गा येथील खंडपीठांचा दाखला दिला आहे. खंडपीठाचा निर्णय होण्यापूर्वीच कर्नाटक सरकारने मूलभूत सुविधांची पूर्तता केली होती.

एकमेकांकडे बोट नकोमूलभूत सुविधांसाठी बार असोसिएशनने यापूर्वी अनेकदा राज्य सरकारसोबत पत्रव्यवहार केला आहे. मात्र, राज्यकर्त्यांनी न्याययंत्रणेकडे बोट दाखवून निर्णय येताच सर्व सुविधा देऊ, असे आश्वासन दिले. आता पुन्हा निर्णयाची वाट न पाहता सुविधांसाठी कृती करावी, अशी अपेक्षा वकिलांनी व्यक्त केली आहे.

कोल्हापूरमध्ये खंडपीठ होण्यासाठी गेली कित्येक वर्षे लढा सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना, पक्षकारांना या खंडपीठाचा फायदाच होणार आहे. त्यामुळे आमचा या खंडपीठाला पाठिंबा आहे. समर्थन आहे. - नीतेश राणे - पालकमंत्री, सिंधुदुर्ग 

खंडपीठाच्या निर्णयासह पायाभूत सुविधांसाठी सहा जिल्ह्यांतील पालकमंत्री आणि सर्वपक्षीय आमदारांना घेऊन मुख्यमंत्र्यांना विनंती करू. यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. - प्रकाश आबिटकर - पालकमंत्री, कोल्हापूर