शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

‘स्वामीनाथन’च्या अहवालात शेतकरी समृद्धीला बगल : अमर हबीब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 00:35 IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी स्थापन झालेल्या स्वामीनाथन आयोगाच्या अहवालात शेतकऱ्यांच्या समृद्धीच्या उपायांनाच बगल देण्यात आली आहे.

ठळक मुद्देसर्वच पक्षांकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात -- राजर्षी शाहू व्याख्यानमाला

कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी स्थापन झालेल्या स्वामीनाथन आयोगाच्या अहवालात शेतकऱ्यांच्या समृद्धीच्या उपायांनाच बगल देण्यात आली आहे. तर देशात कोणत्याही पक्षाची सत्ता असली तरी त्यांनी शेतकºयांचा विश्वासघातच केला आहे, अशी घणाघाती टीका ज्येष्ठ विचारवंत अमर हबीब यांनी मंगळवारी केली. शेतकºयांवरील निर्बंध हटवून त्यांना स्वातंत्र्य देण्याची मागणी त्यांनी केली.

शाहू स्मारक भवनात राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने आयोजित राजर्षी शाहू व्याख्यानमालेत त्यांनी ‘शेतकरी चळवळ आणि स्वामीनाथन आयोग’ या विषयावर विवेचन करून व्याख्यानमालेचा समारोप केला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. जे. एफ. पाटील होते. व्यासपीठावर ट्रस्टचे विश्वस्त प्रा. डॉ. जयसिंगराव पवार, प्रा. डॉ. अशोक चौसाळकर उपस्थित होते.

हबीब म्हणाले, स्वामीनाथन हे कृषितज्ज्ञ आहेत; पण शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कृषीला अर्थतज्ज्ञांची जोड देणे गरजेचे होते. या आयोगाने अहवालात नोंदविलेली निरीक्षणं आणि उपाय यांचा मेळच बसत नाही. यात मांडलेल्या शिफारशी शेतकºयाला जगविण्यापुरत्या मर्यादित आहेत. शेतकरी समृद्धीचा त्यात विचारच केलेला नाही. त्यांनी शिफारस केलेला दीडपट हमीभाव हा काही पिकांपुरता मर्यादित आहे. हा भाव नाही परवडला तर व्यापारी बाजूला होतील आणि शेतकºयांची गोची होईल. व्यापाºयांना वगळून शेतकºयांना सरकारी अधिकाºयांच्या दावणीला बांधणे अत्यंत घातक आहे.

ते म्हणाले, केंद्र सरकारला शेतीचे सरकारीकरण करायचे होते; पण ते शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी शेतीमालाचे सरकारीकरण केले. केंद्राने १९५१ साली घटनेतील शेतीविषयक कायद्यात दुरुस्ती केली. त्यातील ‘३१ ब’ या प्रकरणात शेतीसंबंधी २४९ कायदे असून, त्याविरोधात न्यायालयात जाण्याचा अधिकार शेतकºयाला दिलेला नाही. त्याला दुय्यम नागरिकत्व देण्यात आले आहे. ‘स्वामीनाथन’च्या अहवालात जमीन अधिग्रहण, आवश्यक वस्तूसंबंधीचा कायदा अशा शेतकरीविरोधी कायद्याला विरोध केलेला नाही. शेतकºयांच्या गळ्याला बसलेला हा फास तोडायला कोणताही पक्ष तयार नाही.पुढारी, उद्योगपतीच लाभार्थीहबीब म्हणाले, जो व्यक्ती स्वत: शेती कसतो आणि त्यावरच त्याचा चरितार्थ चालतो, त्याला शेतकरी म्हणतात; पण आता पुढारी, उद्योजकही स्वत:ला शेतकऱ्यांच्या यादीत बसवून कर्जमाफीचा लाभ घेत आहेत. आज देशात १६० पेक्षा अधिक शेतकरी संघटना आहेत. त्यात अनेक स्वयंभू नेते आहेत; पण कायद्यांचा फास दूर होऊन शेतकरी स्वतंत्र होण्यासाठी एकही नेता, संघटना संघर्ष करत नाही.

टॅग्स :Shahu Maharaj Jayantiशाहू महाराज जयंतीkolhapurकोल्हापूर