शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पूरनियंत्रण उपाययोजनांचा अहवाल १० मेपूर्वी द्या, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंनी दिल्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 11:35 IST

पुरानंतर मात्र खूप मोठ्या प्रमाणात काम करावे लागते. त्याआधी प्रत्येक गावाला संदेश पोहोचविण्यासाठी पब्लिक ॲड्रेस सिस्टीम कोल्हापूर जिल्ह्याने तयार केली आहे. अशी यंत्रणा सर्व जिल्ह्यांमध्ये असली पाहिजे.

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगलीसह पुणे विभागात येणाऱ्या पुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वयंसेवी संस्था व तज्ज्ञांनी सुचवलेल्या उपाययोजनांवर १० मे पूर्वी सविस्तर अहवाल द्या, प्रशासनाच्या पातळीवर शक्य असलेल्या उपाययोजनांसाठी कोणता निधी वापरता येईल याची पडताळणी करा, अशा सूचना मंगळवारी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनाला दिल्या.

कोरो इंडिया संस्थेने पश्चिम महाराष्ट्रात केलेल्या कामाचा आढावा, पूर व्यवस्थापन आणि जलसंधारण विषयावर पुण्यातील विधान भवनात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेघा पाटकर, विभागीय आयुक्त सौरभ राव, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्यासह सांगली, सातारा, रत्नागिरी, पुणे-पिंपरी-चिंचवडचे जिल्हाधिकारी, आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, जलसंपदा विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी उपस्थित होते.

गोऱ्हे म्हणाल्या, राष्ट्रीय महामार्गावरील कमकुवत पुलांची माहिती आणि अहवाल येत्या पंधरा दिवसांत सादर करा. सांगली जिल्हाधिकारी आणि शासकीय अधिकारी यांनी अशा ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा अहवाल ५ मेपर्यंत सादर करावा. त्यावर आपण एक वेगळी बैठक मुंबईमध्ये आयोजित करू या. सामाजिक आणि राजकीय इच्छाशक्ती एकत्र आली तर यावर काम होणे शक्य होईल. पश्चिम महाराष्ट्रात अनेक प्रकारे जलसंधारणाचे काम झाले आहे. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात काही भागांत पूर आले. काही भागात मात्र अजूनही दुष्काळसदृश परिस्थिती आहे. जिल्हानिहाय पाणी व्यवस्थापन करणे आणि त्यासाठी आवश्यक तो संवाद करण्यासाठी त्या त्या जिल्ह्यात बैठका घ्याव्यात.

मेघा पाटकर म्हणाल्या, पुरानंतर मात्र खूप मोठ्या प्रमाणात काम करावे लागते. त्याआधी प्रत्येक गावाला संदेश पोहोचविण्यासाठी पब्लिक ॲड्रेस सिस्टीम कोल्हापूर जिल्ह्याने तयार केली आहे. अशी यंत्रणा सर्व जिल्ह्यांमध्ये असली पाहिजे. यावर गोऱ्हे यांनी महापालिका आयुक्तांनी कार्यवाही करावी अशी सूचना केली.

विभागीय आयुक्त सौरव राव म्हणाले, जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या विषयांवर कार्यवाही करावी. आपत्ती व्यवस्थापन करताना संवेदनशील भागात अधिक काळजीपूर्वक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. माझी वसुंधरा, नमामि चंद्रभागासारख्या पर्यावरणपूरक कार्यक्रमांचा पुढच्या पिढीला फायदा होईल. त्यासाठी समाज विकास तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, निवृत्त शासकीय अधिकारी यांनी स्वत:हून पुढे येण्याची गरज आहे.

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पूरग्रस्त गावांसाठी विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. नद्यांमध्ये वाळू उत्खनन बंदी आहे जिल्हा आपत्ती निवारण यंत्रणेच्या माध्यमातून याबाबत एक प्रस्ताव दिला आहे. त्यास मंजूरी मिळणे आवश्यक आहे. आपत्ती व्यवस्थापन निधीमधून याकरिता येणारा खर्च मंजूर करण्याविषयी लक्ष घालण्याची विनंती केली.

कोल्हापुरातील पूरस्थितीबाबत पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड, उदय कुलकर्णी व अनिल चौगुले यांनी सादरीकरण केले. त्यांनी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे वगळता जुने यांत्रिक सेवा द्वार काढून तेथे ऑटोमाइझ्ड दरवाजे बसवावेत, पूर प्रभावित खोऱ्यातील धरणांचे काम पूर्ण करा, धामणी धरणाचे काम पूर्ण झाले, तर ३ टीएमसी साठा तितकाच पूर कमी करेल, धरणे, नदी, ओढ्यांमधील गाळाचे प्रमाण अभ्यासून प्रत्यक्ष पाणीसाठा किती होतो व गाळामुळे किती पूर येतो हे तपासावे अशा सूचना केल्या.

नीलम गोऱ्हे यांच्या महत्वाच्या सूचना

  • धरण सुरक्षा कायदा समितीची नागरिकांना माहिती द्या.
  • धरणांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा
  • धोरणात्मक निर्णय कोणत्या स्वरूपाचे घ्यावे लागतील याची माहिती द्या.
  • पुलांची सुरक्षितता विषयावर याबाबत माहिती सादर करावी.

नुकसानभरपाईचा प्रश्न

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शहरी व ग्रामीण भागातील नुकसानभरपाईच्या अडचणीचा मुद्दा मांडला. पूररेषेत व्यवसाय किंवा घर येत असेल तर विमा कंपन्या विमा उतरवण्यासाठी पुढे येत नाहीत, नुकसानीचे दर वेगवेगळे असल्याने पंचनाम्याप्रमाणे नुकसानभरपाई मिळत नाही, असे सांगितले. यावर नीलम गोऱ्हे यांनी हा धोरणात्मक निर्णय असून, शासनस्तरावर याचा सकारात्मक विचार केला जाईल, असे सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरNeelam gorheनीलम गो-हे