कृषी कायदे, इंधन दरवाढ रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:24 IST2021-03-27T04:24:08+5:302021-03-27T04:24:08+5:30
निवेदनात म्हटले आहे, शेतकऱ्यांचे आर्थिक व सामाजिक स्वास्थ्य बिघडविणारे कृषी कायदे संमत करून शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनविण्याचा केंद्र सरकारचा ...

कृषी कायदे, इंधन दरवाढ रद्द करा
निवेदनात म्हटले आहे, शेतकऱ्यांचे आर्थिक व सामाजिक स्वास्थ्य बिघडविणारे कृषी कायदे संमत करून शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनविण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. नव्या कृषी कायद्यांमुळे उद्योजकांना शेतकऱ्यांची खुली लूट करण्याची मुभा मिळणार आहे. तसेच पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसचे दर वाढविल्यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे कृषी कायदे आणि इंधन दरवाढ रद्द करून जनतेला दिलासा द्यावा.
निवेदनावर, बसवराज आजरी, अॅड. दिग्विजय कुराडे, सोमगोंडा आरबोळे, दयानंद पट्टणकुडी, राजशेखर यरटे, उत्तमकुमार देसाई, शंकर सूर्यवंशी, विरसिंग बिलावर, महेश तुरबतमठ, आप्पासाहेब कांबळे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे काँग्रेसतर्फे तहसीलदार दिनेश पारगे यांना बसवराज आजरी यांनी निवेदन दिले. यावेळी दिग्विजय कुराडे, सोमगोंडा आरबोळे, दयानंद पट्टणकुडी, आदी उपस्थित होते.
क्रमांक : २६०३२०२१-गड-०२