शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राज्यपाल कोश्यारींना १५ दिवसांत हटवा, अन्यथा राजभवनावर ‘कोल्हापुरी चप्पल मार्च’

By संतोष.मिठारी | Updated: November 28, 2022 18:06 IST

शिवराय, महाराष्ट्राचा अवमान होताना सत्ताधारी गप्प, तर ईडीला घाबरून विरोधकही शांत. मात्र, कोल्हापूरची जनता शांत बसणार नाही.

कोल्हापूर : छत्रपती शिवराय आणि महाराष्ट्राबाबत वारंवार अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्य शासनाने १५ दिवसांत राज्यपालपदावरून हटवावे. अन्यथा मुंबईतील गेट-वे ऑफ इंडिया ते राजभवनपर्यंत ‘कोल्हापुरी चप्पल मार्च’ काढण्यात येईल, असा इशारा आज, सोमवारी कोल्हापुरातील शिवभक्त लोकआंदोलन समितीने दिला. शिवराय, महाराष्ट्राचा अपमान सहन केला जाणार नाही. स्वाभिमान जपण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार समितीने केला असल्याची माहिती निमंत्रक वसंतराव मुळीक यांनी दिली.येथील शाहू स्मारक भवनात राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध व त्यांना पदावरून हटविण्यासाठी आंदोलनाची दिशा ठरविण्याकरिता समितीतर्फे ‘कोल्हापुरी पायताण मार’ सभा झाली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व्यंकाप्पा भोसले होते.छत्रपती शिवराय आमचे दैवत आहेत. त्यांच्यासह महाराष्ट्रातील अन्य महापुरुषांचा अवमान करण्याचा प्रकार वारंवार राज्यपाल कोश्यारी, भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, पंकज चतुर्वेदी यांच्याकडून सुरू आहे. त्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी लंगडे समर्थन करू नये, अन्यथा त्यांना परिणाम भोगावे लागतील, असा इशारा मुळीक यांनी दिला.शिवराय, महाराष्ट्राचा अवमान होताना सत्ताधारी गप्प, तर ईडीला घाबरून विरोधकही शांत आहे. मात्र, कोल्हापूरची जनता शांत बसणार नाही. कोश्यारी यांना राज्यपालपदावरून हटविण्यासाठी तीव्र आंदोलन केले जाईल. या सभेत गुलाबराव घोरपडे, रघुनाथ कांबळे, शैलजा भोसले, बाजीराव नाईक, पंडित पोवार, जहाँगीर अत्तार, बाळासाहेब मोमीन, रणजित पवार, सुशीलकुमार कोल्हटकर, रफिक शेख, अंजली जाधव, दगडू भास्कर, अशोक भंडारी यांनी मनोगत व्यक्त केले. शाहीर दिलीप सावंत यांनी कवनातून राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी