शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘पर्यायी जमिनी’साठी अडले पुनर्वसन ! चारशे हेक्टर बुडीत : ४६७ प्रकल्पग्रस्तांना ३२७.४३ हेक्टर पर्यायी जमिनीची गरज, ‘स्वेच्छा’साठी शासनाकडून गळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 23:27 IST

उत्तूर : धरणासाठी ४०० हेक्टर जमीन बुडीत होऊनही केवळ २५ टक्के धरणग्रस्तांनाच जमिनी मिळाल्या आहेत. उर्वरित ७५ टक्के टक्के धरणग्रस्त जमिनीच्या प्रतीक्षेत आहेत. पर्यायी जमीन पुरेशी

रवींद्र येसादे ।उत्तूर : धरणासाठी ४०० हेक्टर जमीन बुडीत होऊनही केवळ २५ टक्के धरणग्रस्तांनाच जमिनी मिळाल्या आहेत. उर्वरित ७५ टक्के टक्के धरणग्रस्त जमिनीच्या प्रतीक्षेत आहेत. पर्यायी जमीन पुरेशी उपलब्ध होत नाही म्हणून आर्थिक पुनर्वसन मोबदला (स्वेच्छा) घ्यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आम्हाला जमीनच हवी, अशी भूमिका धरणग्रस्त मांडत आहेत.

एकूण ८२२ प्रकल्पग्रस्तांपैकी ३५५ जणांनी स्वेच्छा, तर ३३४ प्रकल्पग्रस्तांना २४८.०९ हेक्टर आर जमीन अद्याप देय आहे.उत्तूर येथील ४६ प्रकल्पग्रस्त असून, २४ जणांनी स्वेच्छा पुनर्वसन घेतलेले आहे. १६ जणांना ९.५३ हे. आर जीमन देय आहे, तर सहाजणांना जमिनी वाटप झाल्या आहेत. आर्दाळ येथे २४० प्रकल्पग्रस्त असून, १०४ जणांनी स्वेच्छा पुनर्वसन घेतले आहे. ७८ प्रकल्पग्रस्तांना ५९.८८ हे. जमीन देय आहे. ५८ जणांना २९.०५ हे. जमीन वाटप झाले आहे.

वडकशिवाले येथील ४५ प्रकल्पग्रस्तांपैकी २८ जणांनी स्वेच्छा, तर १७ जणांना १२.२२. हेक्टर जमीन देय आहे. महागोंड येथील २६ प्रकल्पग्रस्तांपैकी सातजणांनी स्वेच्छा, तर १९ प्रकल्पग्रस्तांना १२.२१. हेक्टर जमीन देय आहे. हालेवाडीतील १५९ प्रकल्पग्रस्तांपैकी ६६ जणांनी स्वेच्छा, तर ९३ जणांना ७३.०० हेक्टर जमीन देय आहे.करपेवाडी येथील १५४ प्रकल्पग्रस्तापैकी ५९ जणांनी स्वेच्छा, तर २६ जणांना ३१.११ हेक्टर जमीन देय आहे. ६९ जणांना ३८.० हेक्टर जमीन वाटप झाले आहे. होन्याळी येथील १५२ प्रकल्पग्रस्तांपैकी ६७ जणांनी स्वेच्छा, तर ८५ जणांना ६३.४० जणांना जमीन देय आहे.

पुनर्वसनासाठी आजरा तालुक्यातील उत्तूर, मुमेवाडी, करपेवाडी, चव्हाणवाडी, होन्याळी, महागोंड, वडकशिवाले, पेंढारवाडी, आर्दाळ येथील जमिनी संपादित केल्या आहेत. गडहिंग्लज तालुक्यातील शिप्पूर, कडगाव, लिंगनूर, अत्याळ, करंबळी, गिजवणे येथील जमिनी संपादित केल्या आहेत. यापैकी १७५.२ हेक्टर जमीन देय आहे त्याचे निवाडे जाहीर झालेत. त्यातील १३५.४३ क्षेत्रावर कब्जा घेतला आहे. ७२.६१. हेक्टर जमिनींचे वाटप झाले आहे. ५८.१० हे जमिनींना संबंधितांनी कोर्टातून स्थगिती मिळविली आहे. ४४.४९ हे जमिनींचे वाटप झालेले नाही.

जिल्हाधिकारी यांचे नावे असणाºया जमिनी पाहावयास गेले असता मूळमालक ताबा देत नाही. पोलीस यंत्रणा फारशी दखल घेत नाही. केवळ बैठका होतात. ठोस निर्णय काही नाही. आम्ही प्रकल्पासाठी जमिनी दिल्या, आता आम्हाला वाली कोण? अशी विचारणा प्रकल्पग्रस्त करीत आहेत.बाबा, मुश्रीफ आणि आता दादा !युती शासनाच्या काळात सुरू झालेला प्रकल्प वेगवेगळ्या कारणाने रखडला. तत्कालीन सहकार राज्यमंत्री स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नाने प्रकल्पाचे पन्नास टक्के काम झाले. विधानसभा पुनर्रचनेनंतर आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रकल्पाचे काम ७० टक्क्ंयापर्यंत नेले. विस्थापितांच्या प्रश्नासाठी बैठका घेऊन काही प्रश्न सुटले . आता १०० टक्के काम व पुर्नवसन करण्याची जबाबदारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर राहणार आहे.

गेली वीस वर्ष धरण रखडले, मोर्चे, आंदोलने, धरणाचे काम बंद पाडणे असे अनेक प्रकार झाले. तरी हा गुंता सुटला नाही. जमीन वाटपाचा आदेश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते वडकशिवाले येथील कार्यक्रमात दिला. मात्र, अजून जमीन जिल्हाधिकारी यांच्याच नावे आहे. वीस वर्ष हेलपाटे मारण्याशिवाय काही नाही. सरकारला विंनती आहे. आता धरण नको, आमची हक्काची जमीन तरी द्या. आमचं आयुष्य संपत चाललयं. आमच्या मुलांचं काय? याचा विचार शासन करणार का ?- महादेव खाडे, धरणग्रस्त (होन्याळी ) .

 

टॅग्स :Damधरणkolhapurकोल्हापूर