शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांचे पुर्नवसन करा, अन्यथा काम बंद पाडणार-श्रीपतराव शिंदे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 19:25 IST

dam, kolhapurnews गेली २१ वर्षे रेंगाळलेल्या आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांचे आधी पुर्नवसन करा, मगच कामास सुरुवात करा, असा इशारा माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांनी शनिवारी येथे दिला. पुर्नवसनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत प्रकल्पाचे काम बंद ठेवा, असे आवाहन शिंदे यांनी धरणग्रस्तांना मार्गदर्शन करताना केले.

ठळक मुद्देआंबेओहळ प्रकल्पग्रस्तांचे आधी पुर्नवसन करा मगच कामास सुरुवातमाजी आमदार श्रीपतराव शिंदे यांचा इशारा, काम बंद पाडणार

रवींद्र येसादेउत्तूर :  गेली २१ वर्षे रेंगाळलेल्या आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांचे आधी पुर्नवसन करा, मगच कामास सुरुवात करा, असा इशारा माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांनी शनिवारी येथे दिला. पुर्नवसनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत प्रकल्पाचे काम बंद ठेवा, असे आवाहन शिंदे यांनी धरणग्रस्तांना मार्गदर्शन करताना केले.यावेळी अ‍ॅड. शिंदे म्हणाले , आंबेओहळ प्रकल्पग्रस्त न्यायासाठी रस्त्यावरची लढ़ाई करीत आहेत. धरणग्रस्तांच्या पुर्नवसनाची बैठक शासकीय अधिकारी यांच्यासमवेत घेण्याचे ठरले असताना प्रकल्पाचे काम सुरू करणे अयोग्य आहे. धरणग्रस्तांचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत काम बंद ठेवा अन्यथा धरणग्रस्तांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा शिंदे यांनी दिला.यावेळी संग्राम संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव म्हणाले, २१ वर्ष पुर्नवसनासाठी लढूनही आजपर्यंत न्याय मिळाला नाही. अधिकारी हे धरणग्रस्तांसोबत बनवेगिरी करतात. पुन्हा पुन्हा नोटीसा काढून धरणग्रस्तांना वेठीस धरतात. आमचे प्रश्न सोडवा, मगच धरणाचे काम करा. अन्यथा आमचा जीव गेला तरी आता माघार नाही. काम सुरू केले तर काम बंद पाडणार.यावेळी पंचायत समिती सदस्य बाळेश नाईक, वडकशिवालेचे सरपंच संतोष बेलवाडे, सचिन पावले यांची भाषणे झाली. प्रकल्पाचे अधिकारी खट्टे, बारदेस्कर यांनी प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे ऐकून घेतले. प्रकल्प स्थळी महादेव खाडे, नामदेव पोटे, बजरंग पुंडपळ, श्रीराम चौगुले,मधुकर पोटे यांचेसह कर्पेवाडी, होन्याळी, आर्दाळ गावातील धरणग्रस्त उपस्थित होते. 

धरणग्रस्तांनी आंबेओहळ प्रकल्पाचे पुर्नवसन न झाल्याने वाहनांच्या आडवे पडून काम बंद पाडले. पुर्नवसन होत नाही तोपर्यंत काम करू नका अशी भूमिका मांडली होती, पण त्यांना न जुमानता दुपारी तीन वाजता प्रकल्पाचे काम सुरू असल्याचे कळताच प्रकल्पग्रस्त सांयकाळी आक्रमक झाले.

प्रकल्प अभियंता स्मिता माने, कृष्णा खोरेचे अधिकारी खट्टे, प्रकल्पाचे अधिकारी बारदेस्कर व धरणग्रस्त यांच्यात पुर्नवसन प्रश्नावरून बाचाबाची झाली. धरणग्रस्त आक्रमक होत असल्याचे पाहून पोलिसांचा फौजफाटा मागवण्यात आला.

टॅग्स :Damधरणkolhapurकोल्हापूर