शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कोल्हापूर-शिर्डी रेल्वेला तत्त्वत: मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : धार्मिक स्थळ जोडणी योजनेअंतर्गत कोल्हापूरहून शिर्डीला रेल्वे सुरू करण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी दिल्ली येथे प्रभू यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही मागणी केली होती.कोल्हापूरहून सुटणाºया रेल्वेगाड्यांची संख्या तुलनेने कमी आहे. रेल्वेस्थानकाचे सुशोभीकरण, प्रलंबित विकासकामे, पायाभूत सुविधा याबाबत एकीकडे ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : धार्मिक स्थळ जोडणी योजनेअंतर्गत कोल्हापूरहून शिर्डीला रेल्वे सुरू करण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी दिल्ली येथे प्रभू यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही मागणी केली होती.कोल्हापूरहून सुटणाºया रेल्वेगाड्यांची संख्या तुलनेने कमी आहे. रेल्वेस्थानकाचे सुशोभीकरण, प्रलंबित विकासकामे, पायाभूत सुविधा याबाबत एकीकडे खासदार महाडिक यांनी पाठपुरावा सुरू केला असून देशातील महत्त्वाच्या शहरांना रेल्वेने जोडण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून खासदार महाडिक यांनी दिल्ली येथे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन कोल्हापूर-शिर्डी (साईनगर) अशी थेट रेल्वे सुरू करण्याची मागणी केली.कोल्हापूर ते नागपूर एक्स्प्रेस आठवड्यातून एकदा निघते आणि कोल्हापुरात पोहोचल्यानंतर मेंटेनन्सनंतर ही गाडी तब्बल ३२ तास मिरज स्टेशनच्या रॅकमध्ये उभी असते. या कालावधीमध्ये या रेल्वेचा वापर करून कोल्हापूर-शिर्डी सेवा सुरू करता येईल, असे महाडिक यांनी प्रभू यांच्या निदर्शनास आणून दिले. बुधवारी सायंकाळी चार वाजता ही गाडी कोल्हापुरातून निघाल्यास गुरुवारी पहाटे ५ वाजून ५० मिनिटांनी शिर्डीला पोहोचेल. तसेच गुरुवारी सकाळी शिर्डीतून निघून गुरुवारी रात्री उशिरा १२ ते १२.३० दरम्यान कोल्हापुरात पोहोचेल. यानंतर नियमित नागपूरच्या फेरीसाठी ही गाडी पुन्हा सज्ज राहू शकते. रेल्वेमंत्री प्रभू यांनी रेल्वे ट्रॅक व ट्रॅफिकची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्यास सहमती दर्शवून, नव्या गाडीला तत्त्वत: मंजुरी दिली. रेल्वेचे एडीजीएम पी. डी. गुहा यांनी ही नवीन रेल्वे सुरू करण्यात तांत्रिक अडचण नसल्याचे सांगितले.सध्या मिरज-पंढरपूर धावणारी रेल्वे कोल्हापूरपासून सुटावी, आठवड्यातून दोनदा कोल्हापूर-अहमदाबाद रेल्वे सुरू करावी, अशीही मागणी महाडिक यांनी केली. यावेळी कोल्हापूर विभागीय रेल्वे मंडळाचे सदस्य समीर शेठ उपस्थित होते. कोल्हापूर, मिरज, कुर्डूवाडी, दौंड ते शिर्डी किंवा कोल्हापूर, मिरज, पुणे, दौंड ते शिर्डी या दोन मार्गांपैकी एका मार्गावरून ही रेल्वे सुरू होईल.