शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

शेतकऱ्यांना मिळेल आता संधी ; सीमेवरील शेतक-यांना दिलासा - : महिनाभर शेती होती बेवारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 13:25 IST

सीमाहद्दीवरील शेतकरी मोठा अडचणीत आला होता. त्याच्या जनावरांना वैरण आणण्यासाठीही शेतकऱ्याला आपल्या शेतात जाता येत नव्हते.पण राज्यामध्ये दोन जिल्ह्यांच्या सीमाहद्दीत असणा-या शेतक-याला त्याच्या शेतात शेतीकामासाठी जाण्याची मुभा राज्य सरकारने दिल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहेशेजारील जिल्ह्यात शेतीकामास जाणाऱ्या शेतकऱ्यांना परवाना

कोल्हापूर : शेजारील जिल्ह्यात सीमाभागात शेती असणाºया शेतक-यांना शेतीकामासाठी जाता येणार असल्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने जिल्हा सीमेवर असणाºया शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊनमुळे परजिल्ह्यांत शेती असणाºया अनेक शेतक-यांना शेतीकामासाठी जाता येत नसल्याने अनेक शेतक-यांची अडचण झाली होती.

‘कोरोना’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कायद्यामुळे दोन जिल्ह्यांच्या हद्दी सीलबंद झाल्या. अनेक शेतकरी एका जिल्ह्यात राहत असले तरीही त्यांची शेती शेजारील जिल्ह्यात होती. त्यामुळे शेतीकामात शेतक-यांना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. महिनाभर लॉकडाऊन सुरू राहिल्याने शेजारील जिल्ह्याचा एकमेकांशी संपूर्ण पूर्णपणे तुटला.

जिल्ह्यात प्रवेश करण्याच्या मार्गावर मोठमोठे दगड, झाडे तोडून रस्ते अडविले होते. अनेक शेतकरी राहत असलेल्या ठिकाणी त्यांची जनावरे होती; पण शेजारील गावात असणारी शेती दुसºया जिल्ह्याच्या हद्दीत असल्याने अनेक शेतकºयांची कुचंबना झाली होती. सीमाहद्दीवरील शेतकरी मोठा अडचणीत आला होता. त्याच्या जनावरांना वैरण आणण्यासाठीही शेतकºयाला आपल्या शेतात जाता येत नव्हते. पण राज्यामध्ये दोन जिल्ह्यांच्या सीमाहद्दीत असणाºया शेतकºयाला त्याच्या शेतात शेतीकामासाठी जाण्याची मुभा राज्य सरकारने दिल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.गावसमितीची संमती आवश्यकज्या गावात शेती आहे, त्या गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, गावकामगार तलाठी, पोलीसपाटील यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. परजिल्ह्यातून गावात येणाºयांवर लक्ष ठेवून त्यांची सविस्तर माहिती पोलीस खात्याला देण्याची जबाबदारी त्या कमिटीवर सोपविण्यात आली आहे. शेजारील जिल्ह्यात राहणा-या शेतकºयाची जमीन संबंधित गावात असल्याची नोंद ग्रामपंचायतीमध्ये असते. त्यामुळे या गावसमितीची मान्यता घेऊन शेजारील गावाशेजारील दुसºया जिल्ह्याच्या गावातील शेतकºयाला शेतीकामासाठी येण्याची मुभा देण्यात आली आहे.अनेक जिल्ह्यांत पिके, धान्य चोरीलाजिल्हा लॉकडाऊन झाल्यामुळे परजिल्ह्यात शेती असणा-या शेतकºयाचा गेले महिनाभर शेतीशी संपर्क तुटला. याचदरम्यान, शेतात डोलणारी उभी पिके, पिकलेले धान्य चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या आता उघडकीस येऊ लागल्या आहेत. 

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसFarmerशेतकरीkolhapurकोल्हापूर