शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

पर्यटकांसाठी आनंदवार्ता! राऊतवाडीचा धबधबा झाला प्रवाहित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 12:59 IST

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेला पंचावन्न किलोमीटर अंतरावर असणारा हा धबधबा दळणवळणासह सर्वच दृष्टीने प्रेक्षणीय असा आहे.

रमेश साबळे

कसबा तारळे : वर्षा ऋतूतील पर्यटनासाठी आकर्षक ठरलेला आणि अल्पावधीतच नावारूपास आलेला राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा दोन दिवसांपूर्वी प्रवाहित झाला. पावसाचे प्रमाण कमी असल्याने धबधब्याचा प्रवाहही कमी आहे. तरीही पर्यटकांनी पहिल्याच रविवारी धबधब्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेला पंचावन्न किलोमीटर अंतरावर असणारा हा धबधबा दळणवळणासह सर्वच दृष्टीने प्रेक्षणीय असा आहे. साहजिकच वर्षा ऋतूतील पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची सर्वाधिक पसंती या धबधब्याला आहे. दीड दोनशे मीटरवरून कोसळणारे पाणी नयनरम्य असून, डोळ्यांची पारणे फेडतो. धबधब्याच्या खाली तसेच कोसळणाऱ्या जलधरांच्या मागील बाजूस उभे राहून जल तुषाराने न्हाऊन निघता येते, हे या धबधब्याचे खास वैशिष्ट्य आहे.

धबधब्याच्या परिसरात स्थानिक तसेच बाहेरील व्यावसायिकांनी हॉटेल, चहा नाश्ता सेंटर, उकडलेले कणीस, भुईमुगाच्या शेंगा स्टॉल थाटल्याने पर्यटकांना जेवण व नाश्त्याची सोय झाली आहे. दूरवरून आलेल्या पर्यटकांसाठी धबधबा परिसरापासून जवळच तसेच राधानगरीत यात्री निवास व लॉजिंग सुविधा उपलब्ध करून राहण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.

गेली दोन वर्षे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वच पर्यटन स्थळावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती. पावसाळी पर्यटन ही त्यासाठी अपवाद नव्हते. परिणामी, राऊतवाडी धबधब्याकडे पर्यटकांनी पाठ फिरविली होती. त्यामुळे शनिवारी, रविवारी येणाऱ्या पर्यटकांमुळे जेवण, चहा, नाश्ता यासह इतर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर आर्थिक संकट कोसळले होते. मात्र, यावर्षी धबधबा प्रवाहित झाल्यापासून सर्वच व्यावसायिकांनी आपले व्यवसाय थाटले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtourismपर्यटनRainपाऊस