शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

रत्नागिरी : वेड्यांना शहाणे करण्याचा तरूणांना ध्यास - राजरत्न प्रतिष्ठानची धडपड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 16:46 IST

‘इऽऽ किती घाण वास येतोय’ असे म्हणत रस्त्यावर दिसणाºया वेड्यापासून सगळेच चार हात लांब पळतात. पण, याच वेड्यांना पकडून त्यांना शहाणे करून रत्नागिरी मनोरूग्णमुक्त करण्याचा ध्यासच जणू तरूणांनी घेतला आहे. रत्नागिरीतील राजरत्न प्रतिष्ठानने आतापर्यंत एक-दोन नव्हे तर चक्क २४ जणांना

ठळक मुद्दे- स्वच्छ - सुंदर रत्नागिरी मनोरूग्णमुक्त करण्याचे ध्येयशौचालयच त्याचे घर--पुरस्कारापेक्षा पुनर्वसनासाठी पुढे या

अरुण आडिवरेकर । 

रत्नागिरी : ‘इऽऽ किती घाण वास येतोय’ असे म्हणत रस्त्यावर दिसणाºया वेड्यापासून सगळेच चार हात लांब पळतात. पण, याच वेड्यांना पकडून त्यांना शहाणे करून रत्नागिरी मनोरूग्णमुक्त करण्याचा ध्यासच जणू तरूणांनी घेतला आहे. रत्नागिरीतील राजरत्न प्रतिष्ठानने आतापर्यंत एक-दोन नव्हे तर चक्क २४ जणांना पकडून त्यांना उपचारासाठी दाखल केले आहे. यातील तिघे बरे होऊन आपल्या घरीही गेले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे रयतेबाबतचे असलेले प्रेम, समाज बांधिलकी व त्यांची शिकवण पुढे चालविण्याच्या हेतूने राजरत्न प्रतिष्ठानची सन २०१५मध्ये सचिन शिंदे यांनी स्थापना करण्यात आली. राजकीय पक्षात काम करताना काही मर्यादा येत होत्या. राजकारण म्हणजे एक दलदल आहे, तेथे इच्छा असूनही सामाजिक काम करता येत नाही. त्यामुळे पक्षविरहीत संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

विविध घटकांपर्यंत पोहोचत असताना रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरूग्णांनाही जगण्याचा हक्क मिळाला पाहिजे, त्यांनाही आनंदाने जगता आले पाहिजे हे डोळ्यासमोर ठेवून ‘स्वच्छ, सुंदर रत्नागिरी’ बरोबरच ‘मनोरूग्णमुक्त रत्नागिरी’ करण्यासाठी प्रतिष्ठानने काम सुरू केले. एखाद्या मनोरूग्णाबाबत माहिती मिळताच त्याला पकडण्यासाठी हे सारे शिलेदार सकाळी ७ वाजताच घरातून बाहेर पडतात. मग त्याला पकडून आंघोळ घालण्याचे काम केले जाते. त्यानंतर त्याला चांगले कपडे घालून, केस-दाढी केली जाते. त्याला पोटभर जेवण दिले जाते. तेथून मनोरूग्णालयात आणले जाते. रूग्णालयाचे पत्र घेतले जाते, हे पत्र न्यायालयाकडे देऊन न्यायालयाकडून रितसर पालकत्व घेतले जाते. त्यानंतर रूग्णालयात आणून त्याच्या सर्व वैद्यकीय चाचण्या केल्या जातात व नंतरच त्याला मनोरूग्णालयात दाखल केले जाते. तेथे त्यांच्यावर उपचार केले जातात. आतापर्यंत जिल्ह्यातून २४ मनोरूग्णांना पकडण्यात आले आहे. यातील ३ मनोरूग्ण पूर्ण बरे होऊन त्यांच्या घरीही गेले आहेत.

तेल, मासे खाऊनच ‘ती’ जगली

मिºया येथून सुमित्राबाई जाधव हिला ताब्यात घेण्यात आले होते. ती लातूर जिल्ह्यातील शिंदाळा येथील राहणारी होती. नवरा गेल्याने तिला मानसिक धक्का बसला होता. सांगलीत देवदर्शनासाठी तिचे कुटुंब आले असता, ती बेपत्ता झाली होती. सन २०१७पासून ती बेपत्ता होती. अलावामध्ये महापुरूषाच्या मंदिरातील कच्चे तेल पिऊन आणि मिºया येथे कापून टाकलेले माशाचे तुकडे खाऊन ती जगत होती. तिच्यावर उपचार केल्यानंतर ती एका महिन्यातच बरी झाली. ती बी. ए. बीएड्. झालेली शिक्षिका होती. तिला नातेवाईकांच्या ताब्यातही देण्यात आले आहे.

दोन वर्ष बाजारात वावर

५ एप्रिल रोजी सकाळी आठवडा बाजारात गेली दोन वर्ष वावरणाऱ्या एका मनोरुग्ण महिलेला ताब्यात घेतले. महिला सभासदांनी या मनोरुग्ण महिलेला स्वच्छ आंघोळ, नवीन कपडे व खायला देऊन अधिक उपचारासाठी मनोरुग्णालयात दाखल केले.

 

गेली साडेचार वर्ष बेपत्ता

पुंडलिक शिंदे (वय २९) हा मूळचा पाटण - शिंदेवाडी येथील राहणारा होता. गेले साडेचार वर्ष तो बेपत्ता होता. त्याला साळवी स्टॉप येथून ताब्यात घेण्यात आले होते. तो आता बरा होऊन त्याच्या घरी गेला आहे.

 

वारीतून हरवला

गोरख पाटील (वय ३३) हा नाशिक येथील राहणार होता. तो वारीसाठी आला होता आणि वारीतच हरवला. त्याला रेल्वेस्टेशन येथून ताब्यात घेण्यात आले होते. तोही बरा होऊन आपल्या घरी गेला आहे.

 

शौचालयच त्याचे घर

आठवडाभरापूर्वी चिपळूण बसस्थानकातून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. तो तेथीलच शौचालयात राहायचा आणि तेथेच त्याच खाणंपिणं असायचं. तो सातारा येथील असल्याचे कळले असून, लवकरच त्यालाही नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

एकालाही आजार नाही

आतापर्यंत ताब्यात घेतलेल्या मनोरूग्णांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यातील एकालाही कोणताच आजार नसल्याचे पुढे आले आहे.

 

पुरस्कारापेक्षा पुनर्वसनासाठी पुढे या

राजरत्न प्रतिष्ठानने केलेल्या कामाचा गौरव करण्यासाठी विविध संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊ केले. मात्र, या पुरस्कारांपेक्षा मनोरूग्णांच्या पुनर्वसनासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन राजरत्न प्रतिष्ठानने केले आहे. मनोरूग्णांच्या पुनर्वसनासाठी कोणीच पुढे येत नसल्याची शोकांतिका आहे. प्रतिष्ठानच्या कार्याला सढळ हस्ते मदत केल्यास हे कार्य अधिक व्यापक होईल, असा विश्वास प्रतिष्ठानच्या पदाधिकाºयांना आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीsocial workerसमाजसेवक