शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनदृष्या रंकाळा संवर्धन गरजेचे, संवर्धनाचा ठोस आराखडा नसल्याने तलावाला अवकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 11:45 IST

रंकाळा तलावाचे जतन व संवर्धन करण्याकरिता राज्य सरकारकडून यापूर्वी आणि आत्ताही निधी मिळालेला आहे. परंतु हा सगळा निधी गेला कोठे? अशी विचारण्याची वेळ नागरिकांवर येते.

भारत चव्हाणकोल्हापूर : गेली अनेक वर्षे शहराच्या सौदर्यात भर घालणाऱ्या रंकाळा तलावाचे होत असलेले विद्रूपीकरण चिंताजनक आहे. या नैसर्गिक तलावाला अधिकाधिक सुंदर ठेवण्याऐवजी तलावातील पाण्याचे वाढत असलेले प्रदूषण, तलावात अधूनमधून मिसळणाऱ्या नाल्यातील सांडपाणी, त्याला बसलेला हातगाडीवाल्यांचा विळखा, संवर्धनाचा ठोस आराखडा नसणे यामुळे तलावाला अवकळा प्राप्त झाली आहे.

रंकाळा तलावाचे जतन व संवर्धन करण्याकरिता राज्य सरकारकडून यापूर्वी आणि आत्ताही निधी मिळालेला आहे. परंतु प्रामुख्याने कोणती कामे हाती घ्यावीत याचा प्राधान्यक्रमच ठरलेला नसल्यामुळे कामे पूर्ण झल्यानंतर हा सगळा निधी गेला कोठे? अशी विचारण्याची वेळ नागरिकांवर येते.या आधी राष्ट्रीय नदी, सरोवर स्वच्छता अभियानमधून नऊ कोटी रुपयांचा निधी मिळाला. त्यातून परताळा परिसरातील सांडपाणी शालिनी पॅलेसच्या मागून तर शाम हौसिंग सोसायटी नाल्याचे सांडपाणी देवकर पाणंद, जुना वाशीनाका, रंकाळा टॉवर मार्गे दुधाळी प्रक्रिया केंद्राकडे वळविण्यात आले.

पण विद्युत पुरवठा खंडित होतो तेव्हा थेट तलावात सांडपाणी मिसळते. एक वर्षापूर्वी परताळ्याकडील ड्रेनेज लाईन चोकअप झाल्यामुळे रंकाळ्यात सांडपाणी मिसळले. त्यावरून मानवी चुका आणि तांत्रिक बिघाडाने विद्युत पुरवठा खंडित झाला तर तलावात सांडपाणी मिसळून प्रदूषण होतेच. मग नऊ कोटी रुपये खर्च करून काय उपयोग झाला असा प्रश्न रंकाळाप्रेमींकडून विचारला जातो.

सध्या राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी तलावाच्या जतन व संवर्धनासाठी १५ कोटींचा निधी आणला आहे. या निधीतून केल्या जाणाऱ्या कामांच्या बाबतीत पर्यावरणप्रेमी, काही तज्ज्ञांचा आक्षेप आहे.तलावाचा विकास करणे म्हणजे काय असा त्यांचा मूलभूत प्रश्न आहे. नवीन बांधकामे, बैठक व्यवस्था करण्याऐवजी तलावाचे नैसर्गिक सौदर्य जपण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशा अपेक्षा त्यांच्या आहेत; पण महापालिकेचे अधिकारी कामांचा प्राधान्यक्रम ठरवितात आणि विकास कामे करतात असा अनुभव आहे.

कासवं गायब, माशांची संख्या कमीएकेकाळी तलावाच्या काठावर तलावातील कासवे अंडी घालण्यासाठी येत. तलावात वेगवेगळ्या प्रकारचे सर्प होते. त्यांचा एक नैसर्गिक अधिवास होता. परंतु अलीकडे काठावर नागरिकांचा स्वैर संचार वाढल्यामुळे ही कासवं, सर्प दिसायची बंद झाली आहेत.तलावाच्या काठावर उभे राहिले की पाण्यातील मासे डोळ्यांनी स्पष्ट दिसायचे. मरळ, तिलाप, ओमटी यासारख्या माशांची संख्या मोठी होती. सूर्यकिरण व ऑक्सिजन घेण्याकरिता जलचर प्राणी वरती यायचे तेव्हाचे दृष्य अतिशय नयनरम्य असायचे. आता तलावातील पाणी प्रदूषित झाल्यामुळे जलचरांची संख्या लक्षणीय कमी झाली आहे.

संध्यामठ झाला पांढरा तलावातील संध्यामठाची एक उत्तम वास्तू आहे. अनेक वर्षे पाण्यात असल्यामुळे त्याचा काही भाग धोकादायक झाला आहे. संध्यामठावर अनेक पक्षी बसतात. तेथेच ते विष्ठा टाकतात. अनेक वर्षे ही विष्ठा साफ न केल्यामुळे संध्यामठाचा टॉप पांढरा झाला आहे.हातगाड्यांची पर्यायी व्यवस्था आवश्यक

हातगाड्यांचा रंकाळा तलावाला अक्षरश विळखा पडला आहे. तलावावर फिरायला येणाऱ्या पर्यटकांना, नागरिकांना खायला मिळायला पाहिजे ही गोष्ट जरी खरी असली तरी त्याची पर्यायी उत्तम व्यवस्था करणे आवश्यक आहे.

कसे झालेय विद्रूपीकरण

  •  तलावाच्या पूर्व, पश्चिम, उत्तर बाजूला प्रचंड प्रमाणात खाद्यपदार्थांच्या हातगाड्या
  •  तलावातील पाण्याला हिरवा रंग, पाण्याला दुर्गंधीही सुटलीय
  •  जलचर प्राण्यांची संख्या झालीय कमी
  •  तलावातील संचार करणाऱ्या विविध पक्षांची संख्या घटली
  •  तलावातील पाणी काही वर्षे वॉशआऊट न केल्यामुळे खराब
टॅग्स :kolhapurकोल्हापूरtourismपर्यटन