शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मुस्लिम समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: February 13, 2015 22:53 IST

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : आरक्षण पूर्ववत करा; राज्य सरकाने भूमिका स्पष्ट करावी

कोल्हापूर : मुस्लिम आरक्षणाबाबत राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी; तसेच समाजाला देण्यात आलेले पाच टक्के आरक्षण पूर्ववत सुरू करावे, या मागणीसाठी शुक्रवारी जिल्ह्यातील मुस्लिम हक्क संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकारी राजाराम माने यांना निवेदन देण्यात आले. दसरा चौक येथून राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर सुरू झालेल्या मोर्चात आजरा, गडहिंग्लज, कागल, शिरोळ, करवीर तसेच कोल्हापूर शहरातील मुस्लिम मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी राजाराम माने यांना मार्चेकऱ्यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात सच्चर समिती, रंगनाथ मिश्रा समिती, मेहमूद्दूर रहेमान समितीच्या अहवालाने मुस्लिम समाजाच्या मागासलेपणावर प्रकाश टाकून मुस्लिम समाजाला आरक्षण देणे गरजेचे असल्याचे नमूद केले आहे. हा समाज आर्थिक व विशेषत: शैक्षणिक क्षेत्रात मागासलेला आहे. त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक व सरकारी नोकरीत आरक्षण मिळणे गरजेचे आहे. वस्तुस्थिती पाहून मागील सरकारने मुस्लिम समाजाला आरक्षण दिले. मुंबई उच्च न्यायालयाने समाजाला दिलेले पाच टक्के आरक्षण कायम ठेवले, असे असतानाही राज्य सरकारने आरक्षण रद्द करून मुस्लिम समाजावर अन्याय केला आहे. आजच्या मोर्चाचे नेतृत्व मुस्लिम हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष अस्लम मुल्ला, आरीफ मुजावर, नईम चौगुले, मुबारक बागवान, गणी आजरेकर, नुश्रीफ बुजरूग, इस्माईल ऐनापुरे, दिगंबर सकट, संतोष कांबळे, मुफ्तिफिरोज इनामी, मोहसीन शेख, मेहबूब बागवान, संभाजी कागलकर, मेहबूब बोजगर, फरीद मुजावर, आदींनी केले.