शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

राज्यमाता दर्जा सर्व देशी गायींना, अनुदान मिळणार गोशाळांनाच; पशुपालक राहणार वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 16:48 IST

राजाराम लोंढे कोल्हापूर : राज्य शासनाने देशी गायींना ‘राज्यमाता’चा दर्जा देऊन त्यांच्या संगोपनासाठी पशुपालकांना दिवसाला पन्नास रुपये अनुदान देण्याचा ...

राजाराम लोंढेकोल्हापूर : राज्य शासनाने देशी गायींना ‘राज्यमाता’चा दर्जा देऊन त्यांच्या संगोपनासाठी पशुपालकांना दिवसाला पन्नास रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. पण, वयोवृद्ध देशी गायींचे संगोपन करणे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर आहे. दूध उत्पादन बंद आणि दिवसाला दोनशे रुपये संगोपनाचा खर्च येतो. त्यामुळे शेवटपर्यंत त्या गायींचे संगोपन करणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अडचणीचे ठरू शकते.

हिंदू धर्मात गाय हे पवित्रतेचे, संपन्नतेचे, मांगल्याचे प्रतीक आहे. हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासूनच गाईला महत्त्वाचे स्थान आहे. गोमूत्राला देखील विशेष धार्मिक व वैद्यकीय महत्त्व आहे. गोमय (गाईचे शेण), गोमूत्र (गाईचे मूत्र), गाईचे दूध, दही, तूप यांच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात. दूध व्यवसायासाठी देशी गायीचे संगोपन करणे परवडत नाही.

त्यामुळेच अलिकडे संकरीत गायींचे प्रमाण वाढत असून त्या तुलनेत देशी गायी कमी होत आहेत. देशी गायी टिकल्या पाहिजेत, यासाठी राज्य शासनाने संगोपन करणाऱ्या पशुपालकाला प्रतिदिन पन्नास रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात २ लाख ८३ हजार गायवर्गीय प्राणी आहेत. त्यापैकी १ लाख ४ हजार देशी गायींचा समावेश आहे.

देशी गायीचे दूध १०० रुपये लिटरदेशी गायीचा उपयोग खूप आहे. तिचे दूध, दही, तूप अतिशय पौष्टिक व आरोग्याला चांगले असते. त्यामुळे दुधाला मागणी अधिक असते. साधारणत: १०० रुपये लिटर दर असून तुपाचा दर हजार रुपयांपर्यंत आहे.

खिलार खोंडासाठीच गायीपूर्वी शेतीच्या कामासाठी बैलांची गरज होती, त्यामुळे आपल्या गोठ्यातच चांगले खाेंड तयार करण्याकडे शेतकऱ्यांचा कल होता. काळाच्या ओघात यांत्रिकीकरणामुळे गोठ्यातील बैल कमी झाले. आता, केवळ हौशी शेतकरीच खोंडासाठी देशी गायीचे संगोपन करत आहेत.

देशी गाय दूध कमी देते, त्यात तिचा भाकडकाळही जास्त असतो. गायीचे वय झाल्यानंतर तिचे संगोपन करणे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर असते. सकस वैरण, पशुखाद्य व औषधोपचाराचा खर्च दिवसाला दोनशेपेक्षा अधिक येतो. त्यामुळे शासनाने अनुदानात वाढ करण्याची गरज आहे. - अजित खाडे (पशुपालक, सांगरूळ)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcowगायGovernmentसरकार