शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

राजू शेट्टी यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 05:13 IST

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर विधानसभेला सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर विधानसभेला सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मंगळवारी मुंबईत बैठक झाली. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ‘मनसे’प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. ‘ईव्हीएम’बाबत जनतेमध्ये कमालीचा संभ्रम असून, याविरोधात जनआंदोलन उभे करण्याबाबतही या भेटीत चर्चा झाली आहे.कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस, स्वाभिमानी पक्ष, रिपाइं (कवाडे व गवई गट), शेकाप, समाजवादी पार्टी आदी पक्ष एकत्रित येऊन लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले; पण राज्यात आघाडीला सपाटून मार खावा लागला. या निवडणुकीनंतर मुंबईत मंगळवारी आघाडीतील प्रमुखांची बैठक झाली. त्यानंतर राजू शेट्टी यांनी दुपारी ‘कृष्णकुंज’वर जाऊन ‘मनसे’प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी विधानसभेला वंचित बहुजन आघाडी, ‘मनसे’ यांना सोबत घेऊन महाआघाडी करण्याबाबत दोन्ही नेत्यांत चर्चा झाली. महाआघाडीत सहभागी होण्याबाबत विचारविनिमय करून निर्णय घेऊ, असे ठाकरे यांनी शेट्टी यांना सांगितले.‘ईव्हीएम’बाबतही या भेटीत चर्चा झाली. वायफायच्या माध्यमातून मशीनमध्ये फेरफार कसा करतो येतो, यासह अनेक प्रकारची माहिती आपल्याकडे असल्याचे दोन्ही नेत्यांनी सांगितले. याविरोधात जनआंदोलन उभे करण्याबाबत ठाकरे व शेट्टी यांचे एकमत झाले आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे