शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

राजू शेट्टींची १७ ऑक्टोबरपासून ‘आत्मक्लेश पदयात्रा’: २२ दिवस ५२२ किलोमीटर चालणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 12:23 IST

कारखान्यातून एकही साखरेचे पोते बाहेर पडू देणार नाही

कोल्हापूर : मागील गळीत हंगामातील गाळप झालेल्या उसाला चारशे रुपये दिल्याशिवाय कारखान्यांची धुराडे पेटू देणार नाही, असा गर्भित इशारा देत साखर कारखान्यांना दिलेली मुदत संपली असून, आता कारखान्यातून एकही साखरेचे पोते बाहेर पडू देणार नाही. त्याचबरोबर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर २२ दिवस ५२२ किलोमीटरची आत्मक्लेश पदयात्रा काढणार आहे. या यात्रेची सांगता ७ नोव्हेंबर रोजी जयसिंगपुरातील ऊस परिषदेने करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.शेट्टी म्हणाले, प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढून कारखानदारांना चारशे रुपये देण्यासाठी २ ऑक्टोबरची मुदत दिली होती. ती संपली असून, एकही कारखानदार बोलण्यास तयार नाही. गांधी जयंतीनिमित्त सोमवारी प्रत्येक कारखान्यावर जाऊन ढोलताशे वाजवून कारखानदारांना जागे करण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ३७ कारखान्यांवर १७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत ‘आत्मक्लेश’ पदयात्रा काढणार आहे.

२२ वी ऊस परिषद आणि २२ दिवस पदयात्रा‘स्वाभिमानी’ची यंदाची २२ वी ऊस परिषद आहे. त्यामुळे आत्मक्लेश पदयात्रेचे नियोजन २२ दिवस आणि ५२२ किलोमीटर केले आहे.

सीमाभागातील कारखानेही सुरू करू देणार नाहीया आंदोलनाचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्रात असून, सीमाभागातील कारखानेही सुरू करू देणार नाही. त्याचाच भाग म्हणून ५ ऑक्टोबरला बेडकिहाळ येथे शेतकरी मेळावा, तर ९ ऑक्टोबरला कर्नाटक राज्य रयत संघटनेसोबत बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीSugar factoryसाखर कारखाने