शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला पाठीत लाथ घालून जागे करु, राजू शेट्टींचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 11:51 IST

आम्ही काय सरकारकडे चंद्र, सूर्य मागतोय काय? दिवसा दहा तास वीज तर मागत आहे

कोल्हापूर : गेली अकरा दिवस शेतकरी महावितरण समोर बसला असताना प्रश्न मार्गी लागत नसेल तर आता राज्य सरकारचे दिवस भरले आहेत. राज्य सरकार जिवंत नसल्याने त्याची संवेदना संपली आहे. त्यामुळे शनिवारी सरकारचे बारावे घालणार असून, झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारच्या पाठीत लाथ घालून जागे केल्याशिवाय शेतकरी स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी दिला.शेट्टी म्हणाले की, पंढरपूर तालुक्यात एका युवा शेतकऱ्याने वीज बिल भरता येत नाही म्हणून आत्महत्या केली. शेतकऱ्यांनी संयमाने रहावे. सरकारला सळो की पळो करून सोडू. आजपासून आंदोलन अधिक तीव्र केले जाणार असून, राज्यभर याचे पडसाद उमटतील. राज्य सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. त्यांना जागे कसे करायचे, हे संघटनेला चांगलेच माहिती आहे. अजूनही जागे व्हा, अन्यथा तुमचे कपडे उतरवायला फार वेळ लागणार नाही.

१२ कार्यकर्ते मुंडन करणार

राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी विधिवत पूजा करून सरकारचं बारावं महावितरणच्या कार्यालयासमोर दुपारी १२ वाजता घातले जाणार आहे. बारा कार्यकर्ते मुंडन करून सरकारचा निषेध करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

आम्ही काय चंद्र, सूर्य मागतोय का?शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन तिथे धरणे उभारली, त्यावर वीज निर्मिती करता. आम्ही काय सरकारकडे चंद्र, सूर्य मागतोय काय? दिवसा दहा तास वीज मागत असल्याचे शेट्टी यांनी सांगितले

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी