शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

Maharashtra Vidhan Sabha 2019:सांगोल्यातून लढण्याचा राजू शेट्टी यांना आग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 12:27 IST

सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांच्या तोडीचा वारसदार कोण, याचा शोध सुरू झाला आहे. हा शोध स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यापर्यंत येऊन थांबला आहे.

ठळक मुद्देसांगोल्यातून लढण्याचा राजू शेट्टी यांना आग्रहगणपतराव देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली भेट

कोल्हापूर : सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांच्या तोडीचा वारसदार कोण, याचा शोध सुरू झाला आहे. हा शोध स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यापर्यंत येऊन थांबला आहे. आजच्या परिस्थितीत शेट्टी हेच गणपतरावांचा वसा आणि वारसा समर्थपणे चालवू शकतात, असा मतप्रवाह ‘शेकाप’च्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यांनी शेट्टी यांची भेट घेऊन सांगोल्यातून लढावे, असा आग्रह धरला आहे.सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून १९६२ पासून गणपतराव देशमुख शेतकरी कामगार पक्षाचे आमदार म्हणून गेली ५५ वर्षे विधानसभेत प्रतिनिधित्व करीत आहेत. याला अपवाद फक्त १९७२ आणि १९९५ ची निवडणूक राहिली. १९७२ मध्ये ते पहिल्यांदा पराभूत झाले; पण लगेच पोटनिवडणूक लागल्याने ते पुन्हा विजयी झाले.

१९९५ मध्ये युतीच्या लाटेत शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांच्याकडून त्यांना पराभूत व्हावे लागले होते. या दोन निवडणुकांचा अपवाद वगळता गणपतराव देशमुख यांनी ५५ वर्षे आमदार म्हणून राहण्याचा जागतिक विक्रमच आपल्या नावावर केला. ‘गिनीज बुक’मधील विक्रमापेक्षा जनतेच्या मनावर तब्बल साडेपाच दशके अधिराज्य गाजविण्याचा विक्रम करणारे गणपतराव आता ९४ वर्षांचे आहेत.कार्यकर्त्यांचा आग्रह असला तरी प्रकृती साथ देत नसल्याने नव्या दमाच्या व्यक्तीकडे नेतृत्वाची धुरा सोपवावी, असे सांगून त्यांनी माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. विनंत्या करूनही त्यांनी निर्णय न बदलल्याने अखेर नव्या नेतृत्वाचा शोध सुरू झाला आहे.गणपतरावांचा वारसदार हादेखील त्यांच्याप्रमाणेच विचारांशी, चळवळीशी आणि जनतेच्या प्रश्नांशी बांधीलकी मानणाराच असावा, असे निकष ठरविण्यात आले. विशेष म्हणजे मतदारसंघाला डाग लागू द्यायचा नाही, ही एकमेव धारणा घेऊन शोध सुरू झाला. त्यांच्या या प्राथमिक निकषांत शेतकरी चळवळीतून पुढे आलेले राजू शेट्टी बसत असल्याने कार्यकर्त्यांनी शिरोळला येऊन त्यांच्याकडे तसा आग्रह धरला आहे.

शेतकऱ्यांची चळवळ कमकुवत होणे ही आजच्या घडीला धोक्याची घंटा असल्याने ती सुरू राहायची असल्यास शेट्टींना बळ मिळणे गरजेचे आहे. शेतकरी आणि दुष्काळी समाजाचा आवाज विधानसभेत गणपतरावांप्रमाणेच ताकदीने पोहोचविण्याची धमक आजच्या घडीला शेट्टी यांच्याव्यतिरिक्त कुणाकडे नाही, असा कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. यातूनच त्यांनी आग्रह धरला आहे; पण शेट्टी यांनी अजून होकार दर्शविलेला नाही. 

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाRaju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूरGanpatrao Deshmukhगणपतराव देशमुख