शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
4
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
5
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
6
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 
7
Stock Markets Today: वीकली एक्स्पायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी ३० अंकांनी वाढून उघडला; ऑटो स्टॉक्समध्ये गुंतवणूकदारांची खरेदी
8
कंपनी मालकीन कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी कोट्यवधि रुपये मोजले; प्रकरण न्यायालयात पोहोचले
9
VIRAL : धडकी भरवणारी 'सफर'! अफगाणिस्तानातून विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा मुलगा
10
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
11
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
12
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
13
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
14
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
15
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
16
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
17
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
18
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
19
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
20
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर

Maharashtra Vidhan Sabha 2019:सांगोल्यातून लढण्याचा राजू शेट्टी यांना आग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 12:27 IST

सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांच्या तोडीचा वारसदार कोण, याचा शोध सुरू झाला आहे. हा शोध स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यापर्यंत येऊन थांबला आहे.

ठळक मुद्देसांगोल्यातून लढण्याचा राजू शेट्टी यांना आग्रहगणपतराव देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली भेट

कोल्हापूर : सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांच्या तोडीचा वारसदार कोण, याचा शोध सुरू झाला आहे. हा शोध स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यापर्यंत येऊन थांबला आहे. आजच्या परिस्थितीत शेट्टी हेच गणपतरावांचा वसा आणि वारसा समर्थपणे चालवू शकतात, असा मतप्रवाह ‘शेकाप’च्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यांनी शेट्टी यांची भेट घेऊन सांगोल्यातून लढावे, असा आग्रह धरला आहे.सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून १९६२ पासून गणपतराव देशमुख शेतकरी कामगार पक्षाचे आमदार म्हणून गेली ५५ वर्षे विधानसभेत प्रतिनिधित्व करीत आहेत. याला अपवाद फक्त १९७२ आणि १९९५ ची निवडणूक राहिली. १९७२ मध्ये ते पहिल्यांदा पराभूत झाले; पण लगेच पोटनिवडणूक लागल्याने ते पुन्हा विजयी झाले.

१९९५ मध्ये युतीच्या लाटेत शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांच्याकडून त्यांना पराभूत व्हावे लागले होते. या दोन निवडणुकांचा अपवाद वगळता गणपतराव देशमुख यांनी ५५ वर्षे आमदार म्हणून राहण्याचा जागतिक विक्रमच आपल्या नावावर केला. ‘गिनीज बुक’मधील विक्रमापेक्षा जनतेच्या मनावर तब्बल साडेपाच दशके अधिराज्य गाजविण्याचा विक्रम करणारे गणपतराव आता ९४ वर्षांचे आहेत.कार्यकर्त्यांचा आग्रह असला तरी प्रकृती साथ देत नसल्याने नव्या दमाच्या व्यक्तीकडे नेतृत्वाची धुरा सोपवावी, असे सांगून त्यांनी माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. विनंत्या करूनही त्यांनी निर्णय न बदलल्याने अखेर नव्या नेतृत्वाचा शोध सुरू झाला आहे.गणपतरावांचा वारसदार हादेखील त्यांच्याप्रमाणेच विचारांशी, चळवळीशी आणि जनतेच्या प्रश्नांशी बांधीलकी मानणाराच असावा, असे निकष ठरविण्यात आले. विशेष म्हणजे मतदारसंघाला डाग लागू द्यायचा नाही, ही एकमेव धारणा घेऊन शोध सुरू झाला. त्यांच्या या प्राथमिक निकषांत शेतकरी चळवळीतून पुढे आलेले राजू शेट्टी बसत असल्याने कार्यकर्त्यांनी शिरोळला येऊन त्यांच्याकडे तसा आग्रह धरला आहे.

शेतकऱ्यांची चळवळ कमकुवत होणे ही आजच्या घडीला धोक्याची घंटा असल्याने ती सुरू राहायची असल्यास शेट्टींना बळ मिळणे गरजेचे आहे. शेतकरी आणि दुष्काळी समाजाचा आवाज विधानसभेत गणपतरावांप्रमाणेच ताकदीने पोहोचविण्याची धमक आजच्या घडीला शेट्टी यांच्याव्यतिरिक्त कुणाकडे नाही, असा कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. यातूनच त्यांनी आग्रह धरला आहे; पण शेट्टी यांनी अजून होकार दर्शविलेला नाही. 

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाRaju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूरGanpatrao Deshmukhगणपतराव देशमुख