शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

Maharashtra Vidhan Sabha 2019:सांगोल्यातून लढण्याचा राजू शेट्टी यांना आग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 12:27 IST

सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांच्या तोडीचा वारसदार कोण, याचा शोध सुरू झाला आहे. हा शोध स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यापर्यंत येऊन थांबला आहे.

ठळक मुद्देसांगोल्यातून लढण्याचा राजू शेट्टी यांना आग्रहगणपतराव देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली भेट

कोल्हापूर : सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांच्या तोडीचा वारसदार कोण, याचा शोध सुरू झाला आहे. हा शोध स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यापर्यंत येऊन थांबला आहे. आजच्या परिस्थितीत शेट्टी हेच गणपतरावांचा वसा आणि वारसा समर्थपणे चालवू शकतात, असा मतप्रवाह ‘शेकाप’च्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यांनी शेट्टी यांची भेट घेऊन सांगोल्यातून लढावे, असा आग्रह धरला आहे.सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून १९६२ पासून गणपतराव देशमुख शेतकरी कामगार पक्षाचे आमदार म्हणून गेली ५५ वर्षे विधानसभेत प्रतिनिधित्व करीत आहेत. याला अपवाद फक्त १९७२ आणि १९९५ ची निवडणूक राहिली. १९७२ मध्ये ते पहिल्यांदा पराभूत झाले; पण लगेच पोटनिवडणूक लागल्याने ते पुन्हा विजयी झाले.

१९९५ मध्ये युतीच्या लाटेत शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांच्याकडून त्यांना पराभूत व्हावे लागले होते. या दोन निवडणुकांचा अपवाद वगळता गणपतराव देशमुख यांनी ५५ वर्षे आमदार म्हणून राहण्याचा जागतिक विक्रमच आपल्या नावावर केला. ‘गिनीज बुक’मधील विक्रमापेक्षा जनतेच्या मनावर तब्बल साडेपाच दशके अधिराज्य गाजविण्याचा विक्रम करणारे गणपतराव आता ९४ वर्षांचे आहेत.कार्यकर्त्यांचा आग्रह असला तरी प्रकृती साथ देत नसल्याने नव्या दमाच्या व्यक्तीकडे नेतृत्वाची धुरा सोपवावी, असे सांगून त्यांनी माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. विनंत्या करूनही त्यांनी निर्णय न बदलल्याने अखेर नव्या नेतृत्वाचा शोध सुरू झाला आहे.गणपतरावांचा वारसदार हादेखील त्यांच्याप्रमाणेच विचारांशी, चळवळीशी आणि जनतेच्या प्रश्नांशी बांधीलकी मानणाराच असावा, असे निकष ठरविण्यात आले. विशेष म्हणजे मतदारसंघाला डाग लागू द्यायचा नाही, ही एकमेव धारणा घेऊन शोध सुरू झाला. त्यांच्या या प्राथमिक निकषांत शेतकरी चळवळीतून पुढे आलेले राजू शेट्टी बसत असल्याने कार्यकर्त्यांनी शिरोळला येऊन त्यांच्याकडे तसा आग्रह धरला आहे.

शेतकऱ्यांची चळवळ कमकुवत होणे ही आजच्या घडीला धोक्याची घंटा असल्याने ती सुरू राहायची असल्यास शेट्टींना बळ मिळणे गरजेचे आहे. शेतकरी आणि दुष्काळी समाजाचा आवाज विधानसभेत गणपतरावांप्रमाणेच ताकदीने पोहोचविण्याची धमक आजच्या घडीला शेट्टी यांच्याव्यतिरिक्त कुणाकडे नाही, असा कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. यातूनच त्यांनी आग्रह धरला आहे; पण शेट्टी यांनी अजून होकार दर्शविलेला नाही. 

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाRaju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूरGanpatrao Deshmukhगणपतराव देशमुख