शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

'राजू शेट्टींना महाविकास आघाडीत थारा देऊ नये'; ठाकरे गटाच्या मुरलीधर जाधव यांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 19:06 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज मुंबईत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. अशातच आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज मुंबईत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. राजू शेट्टींची भेट ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नाही तर लोकसभा निवडणुकीच्या जागा संदर्भात झाली, राजू शेट्टींचा पूर्व इतिहास माहीत असताना त्यांना आता महाविकास आघाडीत थारा देऊ नये. असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी केले आहे. 

महाविकास आघाडीबद्दल नेमकं काय म्हणाले राजू शेट्टी?

आगामी लोकसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे की, "महाविकास आघाडीसोबत माझं काहीही देणं घेणं नाही. महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे काही विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादीने कारखानदारांना पूरक पद्धतीने एफआरपीचे तुकडे केले, भूमी अधिग्रहण कायद्याची मोडतोड करून रस्त्याजवळ जमिनीचा शेतकऱ्यांना जो चार ते पाच पट मोबदलला मिळायचा तो कमी करण्याचं काम महाविकास आघाडीचे सरकारने केलं," अशी टीका करत राजू शेट्टी यांनी आपण मविआसोबत जाणार नसल्याचं सांगितलं आहे.  

"उद्धव ठाकरेंची मदत घेणार"

"उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची अदानी उद्योग समूहाविरोधात जी लढाई सुरू आहे त्या अदानींचा आम्हा शेतकऱ्यांनाही मोठा त्रास होत आहे. केंद्र सरकारने अदानींवरील प्रेमापोटी आयात होणाऱ्या खाद्यतेलावर पाच टक्के आयात शुल्क कमी केल्यामुळे सोयाबीनला भाव नाही. २००० साली  चार हजार रुपये इतका भाव होता, २४ वर्षानंतर तो आताही तेवढाच आहे. याचं कारण मोठ्या प्रमाणात बाहेरच्या देशांतून आयात झालेल्या कच्च्या तेलावर आयात शुल्क २०२५ पर्यंत पाच टक्के कमी केल्यामुळे परिणाम झाला आहे. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर मी मराठवाड्यामध्ये दौरा सुरू करणार आहे. या लढाईत आम्ही उद्धव ठाकरे यांची मदत घेणार असून उद्धव ठाकरेंनीही आम्हाला त्याबाबत आश्वस्त केलं आहे," असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीUddhav Thackerayउद्धव ठाकरेkolhapurकोल्हापूरMahavikas Aghadiमहाविकास आघाडी