शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

कृषिमंत्री म्हणून राजू शेट्टी यांचे नाव आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 12:24 IST

घटकपक्ष या नात्याने हे दोन्ही नेते सहभागी झाले तरी त्यांना पदाशिवाय ठेवणे पुढील काळात अडचणीचे ठरणार असल्यानेच त्यांना मंत्रिपद देऊन त्यांचे उपद्रवमूल्य कमी करण्याचा यामागे विचार असल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देपद मिळाले तर कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपदांची हॅट्ट्रिक होणार आहे.

कोल्हापूर : महाराष्ट्र विकास आघाडीच्या आज, गुरुवारी स्थापन होत असलेल्या सरकारमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना मोठे पद मिळणार, अशी चर्चा आहे. कृषिमंत्रिपदासाठी सध्या त्यांचेच नाव आघाडीवर असून, बुधवारी दिवसभर मुंबईत झालेल्या भेटीगाठींमध्येही याभोवतीच चर्चा फिरत राहिली.

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केल्यानंतर आता मंत्रिमंडळात कोण-कोण असणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. या तीन पक्षांसह त्यांना पाठिंबा देणाऱ्या घटकपक्षांतील नेत्यांकडूनही मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू करण्यात आले आहे.

शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी यशवंतराव चव्हाण भवनमध्ये झालेल्या बैठकीत आज, गुरुवारी होणारा शपथविधी, संभाव्य मंत्री आणि दिलेल्या आश्वासनांवर सविस्तर चर्चा झाली. मंत्रिपद वाटपाच्या फॉर्म्युल्यासह घटकपक्षांना दिल्या जाणाºया सत्तेच्या वाट्यावरही चर्चा झाली. त्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रीय पातळीवर वर्चस्व निर्माण केलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे नाव मंत्रिपदासाठी अग्रक्रमाने घेतले जात आहे.

शेट्टी यांनी लोकसभेपासून काँग्रेस आघाडीशी केलेला घरोबा विधानसभा निवडणुकीतही कायम ठेवला. ‘बहुजन वंचित आघाडी’ची आॅफर असतानाही त्यांनी काँग्रेस आघाडीसोबतच राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना आघाडीच्या जागावाटपात सहा जागा मिळाल्या तरी, देवेंद्र भुयार यांच्या रूपाने त्यांचा एकच आमदार निवडून आला आहे. एक जरी आमदार असला तरी राजू शेट्टी यांचे नैतिक बळ मोठे आहे. शेतकरी आणि त्यांच्या प्रश्नांविषयी असलेली बांधीलकी यांमुळे ते कृषिमंत्री या पदासाठी न्याय देऊ शकतील, अशी भावना आहे. कृषिराज्यमंत्रिपदासाठी ‘प्रहार’ पक्षाकडून निवडून आलेल्या आणि शिवसेनेला पाठिंबा दिलेल्या बच्चू कडू यांचे नाव घेतले जात आहे.-------------------------------उपद्रवमूल्य रोखण्यासाठी खेळीभिन्न विचारसरणी असली तरी सत्तेसाठी एकत्र आलेले हे सरकार पाच वर्षे टिकून राहावे म्हणून समतोल साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातूनच उपद्रवमूल्य असणाºया नेत्यांवरच मोठी जबाबदारी टाकून त्यांना अडकवून ठेवण्याचीही रणनीती खेळली जात आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद देऊन त्याची सुरुवात झाली आहे. राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांचे उपद्रवमूल्यही मोठे आहे. घटकपक्ष या नात्याने हे दोन्ही नेते सहभागी झाले तरी त्यांना पदाशिवाय ठेवणे पुढील काळात अडचणीचे ठरणार असल्यानेच त्यांना मंत्रिपद देऊन त्यांचे उपद्रवमूल्य कमी करण्याचा यामागे विचार असल्याची चर्चा आहे.

कोल्हापुरातून आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांचे मंत्रिपदासाठी नाव निश्चित मानले जात आहे. त्यामुळे आता शेट्टी यांचे नाव मंत्रिपदासाठी घेतले जात असले तरी कोल्हापुरात किती पदे द्यायची, असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. तरीदेखील पद मिळाले तर कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपदांची हॅट्ट्रिक होणार आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टी