शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
2
३१ डिसेंबर आहे अखेरची तारीख, 'ही' २ कामं पटापट आटोपून घ्या; केली नाही तर समस्यांना सामोरं जावं लागेल
3
धक्कादायक! SMAT स्पर्धेसाठी निवड न झाल्याच्या रागातून कोचवर जीवघेणा हल्ला; तीन क्रिकेटपटूंवर आरोप
4
शिंदेंचा ‘वाघ’ थेट बिबट्याच्या वेशात विधान भवनात; हात जोडून सरकारला विनवणी, “गेली २० वर्षे...”
5
ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारच्या आदेशाचा कागद फाडला! कशावरून रंगला 'हाय-व्होल्टेज' ड्रामा?
6
पाकिस्तानात शूट झालाय रणवीर सिंगचा 'धुरंधर'? अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिथले गँगस्टर..."
7
माणुसकी संपली! हेल्थ चेकअपमध्ये कॅन्सर झाल्याचे कळले; IT कंपनीने २१ वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्याला काढले 
8
'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद
9
Viral Video: अरे, हे चाललंय तरी काय? जोडप्यानं हायवेवर कार बाजूला लावली अन् रस्त्यावरच...
10
२०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी; सरकारकडून अधिसूचना जारी
11
कोण सरस...? टाटा नेक्सॉन आणि मारुती विक्टोरिसची समोरासमोर टक्कर झाली; दोन्ही ५ स्टार, कोणाची काय हालत...
12
रुपया गडगडल्यामुळे देशात महागाई वाढणार? आयातदारांची चिंता वाढली, RBI आता काय करणार?
13
Silver Price Today: चांदीचा दर विक्रमी उच्चांकावर, किंमत १.९० लाख रुपयांच्या पुढे; आता गुंतवणूक करणं योग्य होईल का?
14
Nana Patole: निवडणूक आयोगाच्या कारभारावर आक्षेप; आयुक्तांना पदावरून हटवण्याची पटोलेंची मागणी
15
याला म्हणतात नशीब! गरिबीशी लढणाऱ्या २ मित्रांचं आयुष्यच बदललं; सापडला ५० लाखांचा हिरा
16
धक्कादायक! लग्नासाठी जमीन विकली; २ वेळा बनला नवरदेव, पण दोन्ही वेळा फसला, चुना लावून वधू पसार
17
टेस्लाला मोठा झटका, VinFast बनली EV मार्केटची 'महाराणी'! आता असा आहे इलॉन मस्क यांच्या फ्यूचर प्लॅन
18
मालवणीतील वादाप्रकरणी मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार अस्लम शेख यांच्यात शाब्दिक चकमक
19
VIDEO: लग्नमंडपात काकूंचीच हवाsss... नवरा-नवरी वरमाला घालत असताना हवेत ५ राऊंड्स गोळीबार
Daily Top 2Weekly Top 5

शक्तिपीठ महामार्ग अदानीचे गौण खनिज गडचिरोलीतून पाठविण्यासाठीच, राजू शेट्टींचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 19:10 IST

४ राष्ट्रीय महामार्ग व ३ राज्य मार्ग. मग आठवा शक्तिपीठ महामार्ग कशासाठी

आजरा : भाविकांच्या सोयीपेक्षा अदानी उद्योग समूहाचे गौण खनिज गडचिरोलीमधून थेट वास्को येथील त्यांच्या पोर्टवरून निर्यात करण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग केला जाणार आहे. भाविकांचे कारण दाखवून हा प्रकल्प जनतेच्या माथी मारला जात असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली.शेळप (ता. आजरा) येथे झालेल्या शक्तिपीठविरोधी बैठकीत ते बोलत होते. शेळपजवळून जाणारा संकेश्वर ते बांदा हा राष्ट्रीय महामार्ग नुकताच पूर्ण झाला आहे. या रस्त्यावर अत्यंत तुरळक वाहतूक आहे. शक्तिपीठ करून राज्यातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा हा कुटील डाव आहे.

या महामार्गाचा भार राज्यातील सामान्य जनता व वाहनधारकांच्या टोलमधून पुढील ९० वर्षांसाठी वसूल केला जाणार आहे. त्याबरोबरच या महामार्गातून ५० हजार कोटीचा ढपला पाडण्यासाठीचा खटाटोप असल्याने सर्व थरातून विरोध होत असतानाही राज्य सरकार दडपशाही करण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीकाही शेट्टी यांनी केली.सर्फनाला प्रकल्पासाठी शेळप गावातील ३५० एकर जमीन संपादित केली आहे. आता गावातून शक्तिपीठ महामार्ग जाणार असल्याने बहुतांशी शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यांना पर्यायी जमीन नसल्याने शेती व्यवसायाचे नवीन संकट उभे राहत आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गाविरोधातील लढ्यामध्ये शेळप ग्रामस्थांनी एकजूट करीत एक इंचही जमीन न देण्याचा निर्धार बैठकीत केला.आता शक्तिपीठ महामार्ग कशासाठी?कोल्हापूरमधून गोव्याला जाण्यासाठी एकूण सात रस्ते असून, त्यापैकी ४ राष्ट्रीय महामार्ग व ३ राज्य मार्ग आहेत. मग आठवा शक्तिपीठ महामार्ग कशासाठी, असा प्रश्न शेतकऱ्यांनी बैठकीत केला.