शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

बचत गटांना देण्यात येणारे राजमाता जिजाऊ पुरस्कार बंद; ‘ग्रामविकास’ कधी घेणार निर्णय?

By समीर देशपांडे | Updated: February 8, 2024 12:43 IST

समीर देशपांडे कोल्हापूर : एकीकडे महिलांच्या सबलीकरणाच्या घोषणा केल्या जात असताना, महिला बचत गटांसाठी सुरू असलेले राजमाता जिजाऊ स्वावलंबन ...

समीर देशपांडेकोल्हापूर : एकीकडे महिलांच्या सबलीकरणाच्या घोषणा केल्या जात असताना, महिला बचत गटांसाठी सुरू असलेले राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार शासनाने बंद केले आहेत. यंदाचे ‘सरस महालक्ष्मी’सह अन्य महोत्सव विनापुरस्कार पार पडले असून, ग्रामविकास विभाग याबाबत कधी निर्णय घेणार, अशी विचारणा केली जात आहे.ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामोन्नती अभियानाच्या माध्यमातून राज्यातील महिला बचत गट चळवळीला गती दिली जात आहे. महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, यासाठी दरवर्षी जिल्हा पातळीवर महोत्सवांचे आयोजन केले जाते. त्याच पद्धतीने एक विभागीय आणि राज्यस्तरावर ‘महालक्ष्मी सरस’ या नावाने प्रदर्शन घेतले जाते, यासाठी भरीव निधीचीही तरतूद करण्यात येते. त्यानुसार, २०१९ पर्यंत सर्व काही सुरळीत सुरू होते.परंतु २०१९ नंतर कोरोनामुळे सर्व महोत्सव रद्द करण्यात आले. त्यामुळे पुरस्कार वितरणाचा प्रश्नच आला नाही. नंतर आता राज्यपातळीवरील ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शन नुकतेच मुंबई येथे पार पडले, परंतु या प्रदर्शनात राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार देण्याची परंपरा खंडित करण्यात आली. यावेळी विभागात प्रथम क्रमांक पटकावलेल्या बचत गटांचा आणि बचत गटविषयक लिखाण करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात येतो, परंतु यंदा यातील काहीच केले गेले नाही.राज्यपातळीवर पुरस्कारासाठी महिला बचत गटांची नावे न मागविल्याने जिल्हा पातळीवरही कुणीच याबाबत निर्णय घेतला नाही. परिणामी, कोरोनानंतर सुरू झालेल्या महोत्सवातही पुरस्कारांचे वितरण झाले नाही. वास्तविक त्या-त्या जिल्ह्याने आपल्या वार्षिक नियोजन आराखड्यामध्ये बक्षिसाची रक्कम गृहित धरून नियोजन करणे आवश्यक आहे, परंतु तसे हाेताना दिसत नाही. त्यामुळेच दरवर्षी हौसेने नटून थटून शिल्ड, ढाल, सन्मानचिन्ह घ्यायला स्टेजवर जाणाऱ्या महिला बचत गटांच्या सदस्यांचा हिरमोड झाला आहे.अशी आहेत बक्षिसे

  • तालुका पातळी : ५, ३, २ हजार रुपये
  • जिल्हा पातळी : १०, ७, ५ हजार रुपये
  • विभागीय पातळी : २५, १५, १० हजार रुपये

दरवर्षी चांगले काम केल्याबद्दल महिला बचत गटांचा सत्कार केला जातो, परंतु ही योजना आता बंद आहे. ते पुरस्कार शासनाने पुन्हा सुरू करावेत. - हमिदा बंडगल अध्यक्ष, आयेशा महिला बचत गट चिंचवाड ता.करवीर, जि.कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद