शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली
3
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
4
बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...
5
आधी चर्चेला बोलावलं अन् नंतर हाकलून लावलं; नेपाळमध्ये Gen-Zसोबत चर्चेचा खेळ गडबडला?
6
ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल
7
Gold Silver Price 10 September: मोठ्या तेजीनंतर सोन्या-चांदीचे दर आज घसरले; पाहा १४ ते २४ कॅरेटसाठी आता किती खर्च करावा लागणार
8
Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस
9
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
10
iPhone 17: भारत, दुबई, अमेरिका की इतर कुठे; कोणत्या देशात आयफोन १७ मिळतोय स्वस्त? वाचा
11
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
12
सगळ्यात स्वस्त ७ सीटर असणाऱ्या 'या' कारची किंमत ९६ हजारांनी झाली कमी! आता कितीला मिळणार?
13
'मुंबईत घर घेणं आम्हाला परवडत नाही'; ८१ टक्के लोकांचं स्पष्ट मत, सर्वेक्षणात काय म्हटलंय? 
14
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
15
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
16
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
17
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
18
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
19
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
20
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?

पालकमंत्रिपदावरुन कोल्हापुरातील शिंदेसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर अस्वस्थ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 18:12 IST

आबिटकर यांना मंत्रिपद मिळाल्याने नाराजी : शिंदेसेनेसह महायुतीतही जाेरदार चर्चा

कोल्हापूर : प्रकाश आबिटकर यांची मंत्रिपदी निवड झाल्यानंतर शिंदेसेनेचे नेते आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जाहीरपणे तीनदा आपल्याला मंत्री आणि पालकमंत्रिपद मिळाले नाही याबद्दल उघड नाराजी केल्यामुळे आबिटकर यांचे मंत्रिपद त्यांच्याच पक्षातील नेत्याला पचनी पडले नसल्याची चर्चा महायुतीसह लोकांत सुरू झाली आहे. आता रोज जाहीरपणे बोलून काहीच उपयोग नाही अशी स्थिती असताना क्षीरसागर त्यांचे दु:ख का व्यक्त करीत आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.क्षीरसागर हे महाविकास आघाडीच्या काळात आणि नंतर महायुतीच्या काळात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. ‘मित्रा’ या संस्थेचे ते उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहतात. तसे आताही ते कॅबिनेट मंत्रीच आहेत. आता ते तिसऱ्यांदा आमदार झाल्यावर त्यांच्या या महत्त्वाकांक्षेने पुन्हा उचल खाल्ली. त्यासाठी आवश्यक ते प्रयत्नही त्यांनी केले. परंतु, त्यांचे नेते एकनाथ शिंदे यांनी आबिटकर यांना थेट कॅबिनेटमंत्रिपद दिले.पालकमंत्रिपद म्हणजे एका अर्थाने जिल्ह्याचे नेतृत्वच त्या नेत्याकडे येते. प्रशासनात त्यांच्या शब्दाला कमालीचे वजन असते. निधीवाटपापासून अनेक गोष्टींचा निर्णय त्यांच्या हातात असतो. त्यामुळे या वेळेला संधी असतानाही ते आपल्याला न मिळाल्याचे दु:ख क्षीरसागर यांना झाले आहे. शिवसेना फुटल्यानंतर मी सर्वांत प्रथम एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभा राहिलो, शहरात शिंदेसेनेची ताकद वाढवली. त्यामुळे नुसते मंत्रिपदच नाही, तर पालकमंत्रिपदही आपल्याला मिळायला हवे असा त्यांचा होरा होता; परंतु, तो चुकीचा ठरल्याने ते कासावीस झाल्याचे दिसत आहे.

आबिटकर यांना मंत्रिपद देताना नवे नेतृत्व, स्वच्छ चेहरा, ग्रामीण भागाच्या विकासाचा विचार झालेला असू शकतो. फारसे राजकीय पाठबळ नसताना सलग तीनवेळा तगड्या विरोधकाला पराभूत करून ते विजयी झाले हीसुद्धा त्यांच्या कॅबिनेटसाठीची महत्त्वाची पात्रता आहे. तिसऱ्यांदा आमदार झालेले चंद्रदीप नरके यांनाही मंत्रिपदाची आशा होती; परंतु, ते मिळाले नाही म्हटल्यावर सत्ताधारी आमदार म्हणून त्यांनी काम सुरू केले. आदळआपट करीत बसलेले नाहीत. परंतु, आबिटकर यांना मंत्रिपद जाहीर होताच क्षीरसागर यांनी ‘माझाही नंबर लागला असता. मंत्रिपद मिळाले असते तर मतदारसंघासाठी चांगले झाले असते,’ अशी भाषा वापरली. मंत्री झाल्यानंतर जेव्हा आबिटकर पहिल्यांदा कोल्हापुरात आले त्या दिवशीही आपल्याला संधी मिळायला हवी होती, असे वक्तव्य क्षीरसागर यांनी केले होते. शिवाय त्यांच्या स्वागताकडेही ते फिरकले नाहीत.

पालकमंत्रिपदही खटकलेआबिटकर आणि हसन मुश्रीफ मंत्री झाल्यानंतर पालकमंत्रिपद कोणाला मिळणार याची प्रचंड उत्सुकता होती. अशातच पालकमंत्रिपद आबिटकर यांना मिळाल्यानंतर रविवारी झालेल्या भोई समाजाच्या कार्यक्रमात त्यांनी पद न मिळाल्याची ठसठस पुन्हा व्यक्त केली. वारंवार व्यक्त होणारी नाराजी आबिटकर यांना मिळालेली संधी त्यांना खूपच त्रासदायक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरguardian ministerपालक मंत्रीRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरShiv SenaशिवसेनाPrakash abitkarप्रकाश आबिटकर