शहरं
Join us  
Trending Stories
1
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
2
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
3
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
4
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
5
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
6
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
7
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
8
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
9
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
10
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
11
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
13
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
14
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
15
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
16
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
17
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
18
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
19
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
20
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  

पालकमंत्रिपदावरुन कोल्हापुरातील शिंदेसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर अस्वस्थ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 18:12 IST

आबिटकर यांना मंत्रिपद मिळाल्याने नाराजी : शिंदेसेनेसह महायुतीतही जाेरदार चर्चा

कोल्हापूर : प्रकाश आबिटकर यांची मंत्रिपदी निवड झाल्यानंतर शिंदेसेनेचे नेते आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जाहीरपणे तीनदा आपल्याला मंत्री आणि पालकमंत्रिपद मिळाले नाही याबद्दल उघड नाराजी केल्यामुळे आबिटकर यांचे मंत्रिपद त्यांच्याच पक्षातील नेत्याला पचनी पडले नसल्याची चर्चा महायुतीसह लोकांत सुरू झाली आहे. आता रोज जाहीरपणे बोलून काहीच उपयोग नाही अशी स्थिती असताना क्षीरसागर त्यांचे दु:ख का व्यक्त करीत आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.क्षीरसागर हे महाविकास आघाडीच्या काळात आणि नंतर महायुतीच्या काळात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. ‘मित्रा’ या संस्थेचे ते उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहतात. तसे आताही ते कॅबिनेट मंत्रीच आहेत. आता ते तिसऱ्यांदा आमदार झाल्यावर त्यांच्या या महत्त्वाकांक्षेने पुन्हा उचल खाल्ली. त्यासाठी आवश्यक ते प्रयत्नही त्यांनी केले. परंतु, त्यांचे नेते एकनाथ शिंदे यांनी आबिटकर यांना थेट कॅबिनेटमंत्रिपद दिले.पालकमंत्रिपद म्हणजे एका अर्थाने जिल्ह्याचे नेतृत्वच त्या नेत्याकडे येते. प्रशासनात त्यांच्या शब्दाला कमालीचे वजन असते. निधीवाटपापासून अनेक गोष्टींचा निर्णय त्यांच्या हातात असतो. त्यामुळे या वेळेला संधी असतानाही ते आपल्याला न मिळाल्याचे दु:ख क्षीरसागर यांना झाले आहे. शिवसेना फुटल्यानंतर मी सर्वांत प्रथम एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभा राहिलो, शहरात शिंदेसेनेची ताकद वाढवली. त्यामुळे नुसते मंत्रिपदच नाही, तर पालकमंत्रिपदही आपल्याला मिळायला हवे असा त्यांचा होरा होता; परंतु, तो चुकीचा ठरल्याने ते कासावीस झाल्याचे दिसत आहे.

आबिटकर यांना मंत्रिपद देताना नवे नेतृत्व, स्वच्छ चेहरा, ग्रामीण भागाच्या विकासाचा विचार झालेला असू शकतो. फारसे राजकीय पाठबळ नसताना सलग तीनवेळा तगड्या विरोधकाला पराभूत करून ते विजयी झाले हीसुद्धा त्यांच्या कॅबिनेटसाठीची महत्त्वाची पात्रता आहे. तिसऱ्यांदा आमदार झालेले चंद्रदीप नरके यांनाही मंत्रिपदाची आशा होती; परंतु, ते मिळाले नाही म्हटल्यावर सत्ताधारी आमदार म्हणून त्यांनी काम सुरू केले. आदळआपट करीत बसलेले नाहीत. परंतु, आबिटकर यांना मंत्रिपद जाहीर होताच क्षीरसागर यांनी ‘माझाही नंबर लागला असता. मंत्रिपद मिळाले असते तर मतदारसंघासाठी चांगले झाले असते,’ अशी भाषा वापरली. मंत्री झाल्यानंतर जेव्हा आबिटकर पहिल्यांदा कोल्हापुरात आले त्या दिवशीही आपल्याला संधी मिळायला हवी होती, असे वक्तव्य क्षीरसागर यांनी केले होते. शिवाय त्यांच्या स्वागताकडेही ते फिरकले नाहीत.

पालकमंत्रिपदही खटकलेआबिटकर आणि हसन मुश्रीफ मंत्री झाल्यानंतर पालकमंत्रिपद कोणाला मिळणार याची प्रचंड उत्सुकता होती. अशातच पालकमंत्रिपद आबिटकर यांना मिळाल्यानंतर रविवारी झालेल्या भोई समाजाच्या कार्यक्रमात त्यांनी पद न मिळाल्याची ठसठस पुन्हा व्यक्त केली. वारंवार व्यक्त होणारी नाराजी आबिटकर यांना मिळालेली संधी त्यांना खूपच त्रासदायक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरguardian ministerपालक मंत्रीRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरShiv SenaशिवसेनाPrakash abitkarप्रकाश आबिटकर