शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राजर्षी शाहू स्मृती जागर: फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार पुढे नेण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 11:22 IST

फुले, शाहू, आंबेडकर यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारांवर तयार झालेल्या राज्यघटनेमुळे लोकशाहीत सर्वांना समान हक्क व न्याय मिळाला; परंतु हा हक्क व न्याय आज खऱ्या अर्थाने मिळतो का, हाच प्रश्न आहे. आज पोशाख कोणता घालावा, काय खावे काय नको, यावर निर्बंध आणले जात आहेत, हे दुर्दैवी आहे.

शाहू छत्रपती

महात्मा जोतिबा फुले यांनी समाजातील पुरोहितशाही, अज्ञान व अस्पृष्यता नाहीशी करण्यासाठी चळवळ सुरू केली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी हीच चळवळ आपल्या संस्थानात प्रत्यक्ष कृतीद्वारे चालू ठेवली. उपेक्षित, वंचित समाजाला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फुले- शाहूंच्या विचारांचा प्रत्यक्ष भारतीय राज्यघटनेत समावेश करून खरी लोकशाही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या तीन समाज सुधारकांनी सुरू केलेले समाजोद्धाराचे कार्य अजून संपलेले नाही. उलट सध्याची देशातील राजकीय तसेच सामाजिक परिस्थिती पाहता या महान समाज सुधारकांचे कार्य आणि विचार अधिक नेटाने, व्यापक पातळीवर पुढे नेण्याची आवश्यकता आहे.

राजर्षी शाहू महाराज कोल्हापूर संस्थानच्या गादीवर विराजमान झाले तेव्हा त्यांनी बहुजन समाजाला आपल्या कार्याचा केंद्रबिंदू मानले. राजा असूनही ऋषींसारखे जीवन जगताना त्यांनी आपल्या राजदंडाचा वापर हा दलित-पतित, तसेच दीनदुबळ्या, वंचित घटकांसाठी केला; परंतु ज्यांना आपले वर्चस्व समाजाच्या प्रत्येक घटकावर राहिले पाहिजे असे वाटत होते, त्या प्रतिगामी शक्तींनी त्यास विरोध केला. त्यांच्या कार्यात खोडा घालण्याचे प्रयत्न केले; परंतु शाहू महाराजांच्या लोककल्याणी कार्यापुढे त्यांचा टिकाव लागला नाही.

शाहू महाराजांसह अनेक समाज सुधारकांनी प्रत्यक्षात कृतीतून धर्मनिरपेक्ष समाजनिर्मितीचे प्रयत्न केले. आज मात्र वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. जाती, धर्माच्या नावावर समाजात दुही माजविण्याचे प्रयत्न होत आहेत. धार्मिक द्वेष भडकावण्याचा प्रयत्न होत आहे. मशिदीवरील भोंगे, हनुमान चालिसा, महाआरती यासारखे समाजात दुफळी निर्माण करणारे विषय पुढे आणले जाऊ लागले आहेत.

सत्ता व वर्चस्व प्रस्थापित करण्याकरिता समाजाचे ध्रुवीकरण केले जात आहे. हिंदुत्वाचा मुद्दा समोर आणून मुस्लिमांना वेगळे केले जात आहे. हिंदू आणि हिंदुत्व हेच काहींना माहीत नाही. पूर्वीच्या काळी सिंधू नदीच्या पलीकडे राहणाऱ्या लोकांना देशाबाहेरून आलेल्या मुस्लीम लोकांनी हिंदू नाव दिले. रामाने, श्रीकृष्णाने हिंदू हा शब्द कुठे उच्चारल्याचे वाचनात आलेले नाही. हिंदुत्व म्हणजे बंधुभावाने वागणे, ही व्याख्या लोकशाहीत बसणारी आहे.

फुले, शाहू, आंबेडकर यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारांवर तयार झालेल्या राज्यघटनेमुळे लोकशाहीत सर्वांना समान हक्क व न्याय मिळाला; परंतु हा हक्क व न्याय आज खऱ्या अर्थाने मिळतो का, हाच प्रश्न आहे. आज पोशाख कोणता घालावा, काय खावे काय नको, यावर निर्बंध आणले जात आहेत, हे दुर्दैवी आहे. समाजसुधारकांच्या विचारांपासून समाजाला उलट्या दिशेने नेण्याचा उद्योग सुरू आहे. तथापि, महाराष्ट्राच्या भूमीत फुले- शाहू- आंबेडकर यांचे विचार खोलवर रुजले आहेत, रुजविण्याचा प्रयत्न आजही होत आहे. म्हणूनच देशातील राजकीय व सामाजिक परिस्थिती पाहता फुले, शाहू, आंबेडकर यांचे कार्य संपलेले नाही, तर अधिक गतीने पुढे नेण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती