शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

राजर्षी शाहू स्मृती जागर: विरोधी विचारांचाही सन्मान करणारा राजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 14:21 IST

‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हा मूलमंत्र जपणाऱ्या शाहू महाराजांनी लेखक, कवी, शाहीर, संशोधक आणि पत्रकार या सर्वच साहत्यिक मंडळींवर उदंड प्रेम केले. त्यांना भरभरून आर्थिक साहाय्य केले. त्यांच्या अडीअडचणीच्या काळात हा राजा त्यांच्या पाठीशी पहाडासारखा उभा राहिल्याची अनेक उदाहरणे आहेत.

डॉ. रमेश जाधवकला, क्रीडा आणि सामाजिक चळवळीला भरभक्कम पाठबळ देणाऱ्या शाहू महाराजांनी तत्कालीन साहित्यिक, लेखक आणि पत्रकार, संपादकांनाही मोठा आधार दिला होता. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हा मूलमंत्र जपणाऱ्या शाहू महाराजांनी लेखक, कवी, शाहीर, संशोधक आणि पत्रकार या सर्वच साहत्यिक मंडळींवर उदंड प्रेम केले. त्यांना भरभरून आर्थिक साहाय्य केले. त्यांच्या अडीअडचणीच्या काळात हा राजा त्यांच्या पाठीशी पहाडासारखा उभा राहिल्याची अनेक उदाहरणे आहेत. एखाद दुसरा अपवाद वगळता आपण मदत केलेले साहित्यिक, लेखक आपले आश्रित आहेत, असे वर्तन शाहू छत्रपतींकडून कधीही झालेले आढळत नाही.प्रबोधनकार ठाकरे यांचा १९१८ पासून शाहू महाराजांशी स्नेह सुरू झाला. ठाकरे त्यावेळी ‘भिक्षुकशाहीचे बंड’ हे पुस्तक लिहीत होते. याबाबत त्यांनी महाराजांच्या भेटीवेळी कोणत्या संदर्भग्रंथांचा उपयोग करावा अशी विचारणा केली. तेव्हा राजांनी अनेक इंग्लिश ग्रंथांची नावे सांगितली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी ते ग्रंथ आपल्या खर्चाने ठाकरे यांना दिले. शिवाय ५ हजार रुपयांचा आगाऊ धनादेश देऊन त्यांच्या २ हजार प्रती खरेदीही केल्या. ‘वेदोक्त’ प्रकरणात टिळकांची बाजू घेणाऱ्या प्रा. वि. गो. विजापूरकर यांच्या ‘ग्रंथमाला’ मासिकालाही महाराजांनी वार्षिक पाचशे रुपये अनुदान मंजूर केले होते. महाराजांनी दिलेली आर्थिक मदत आणि प्रोत्साहन यामुळे दिनकरराव जवळकरांसारख्या बहुगुणी लेखकाच्या प्रतिभेला बहर आला होता यात शंका नाही.

प्रसिध्द शाहीर लहरी हैदर संध्यामठ गल्लीत एका पडक्या जागेत राहत होते. शाहू छत्रपतींनी म्युनिसिपल कमिटीच्या चेअरमनला खास लेखी हुकूम काढून ३० ऑक्टोबर १९२१ रोजी ती जागा लहरी हैदर यांना मोफत दिली. इतकेच नव्हे तर दरबारातून त्या ठिकाणी नवी इमारत बांधण्यासाठी लागणारे दगड आणि माती यांचाही पुरवठा केला.

बहुजन समाजातील पहिले शिवचरित्रकार कृष्णराव केळुसकर यांच्या शिवचरित्रास शाहू महाराजांनी एक हजार रुपयांचे पारितोषिक दिले. एक हजार ग्रंथप्रती घेतल्या. अशा अनेक साहित्यिक मंडळींना आपण मदत करतो म्हणून त्यांनी आपल्या आश्रितांसारखे रहावे अशी महाराजांची कधीच इच्छा नव्हती. त्यामुळेच ‘संदेश’कार अच्युत बळवंत कोल्हटकरांना ४ हजार रुपयांची मदत करूनही ‘तुम्ही माझी बाजू तुम्हांला त्रास होत असेल तर तुमच्या पत्रकात मांडू नका’ अशी विनंती ३ जून १९२१ रोजी अच्युतरावांना पाठवलेल्या पत्रात महाराज करतात. यातून त्यांच्या विशाल मनाचे आणि साहित्यप्रेमाचे दर्शन घडते. अशा असंख्य साहित्यिक, कलाकारांना शाहू महाराजांनी उदार हस्ते मदत केली, ज्यांच्या नावांची संख्या खूपच मोठी आहे.

कारकुन बनला राजकवी

आप्पाजी धुंडीराम मुरतुले ऊर्फ कवी सुमंत हे छत्रपतींच्या खासगी खात्यात कारकून होते. परंतु काव्यात रमणाऱ्या सुमंत यांच्यामुळे त्यांच्याकडून नोकरीचे काम होईना. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुमंत यांना नोकरीतून मुक्त करावे अशी महाराजांकडे मागणी केली. त्यानुसार सुमंत यांना कमी करतानाच त्याच्या घरासाठी धान्याचा पुरवठा करण्याचा आदेश महाराजांनी दिला. एवढेच नव्हे तर ते म्हणाले, ‘रावसाहेब, हा कारकून म्हणून जन्माला आलेला नाही. तो एक महाकवी म्हणून जन्मास आलेला आहे. त्याच्या सन्मानातच आमच्या दरबारचाही सन्मान होणार आहे.’ यानंतर त्यांची ३५ रुपये मानधनावर राजकवी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

(लेखक महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या राजर्षी शाहू गौरव ग्रंथाचे संपादक आहेत.)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती