शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राजर्षी शाहू स्मृती जागर: विरोधी विचारांचाही सन्मान करणारा राजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 14:21 IST

‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हा मूलमंत्र जपणाऱ्या शाहू महाराजांनी लेखक, कवी, शाहीर, संशोधक आणि पत्रकार या सर्वच साहत्यिक मंडळींवर उदंड प्रेम केले. त्यांना भरभरून आर्थिक साहाय्य केले. त्यांच्या अडीअडचणीच्या काळात हा राजा त्यांच्या पाठीशी पहाडासारखा उभा राहिल्याची अनेक उदाहरणे आहेत.

डॉ. रमेश जाधवकला, क्रीडा आणि सामाजिक चळवळीला भरभक्कम पाठबळ देणाऱ्या शाहू महाराजांनी तत्कालीन साहित्यिक, लेखक आणि पत्रकार, संपादकांनाही मोठा आधार दिला होता. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हा मूलमंत्र जपणाऱ्या शाहू महाराजांनी लेखक, कवी, शाहीर, संशोधक आणि पत्रकार या सर्वच साहत्यिक मंडळींवर उदंड प्रेम केले. त्यांना भरभरून आर्थिक साहाय्य केले. त्यांच्या अडीअडचणीच्या काळात हा राजा त्यांच्या पाठीशी पहाडासारखा उभा राहिल्याची अनेक उदाहरणे आहेत. एखाद दुसरा अपवाद वगळता आपण मदत केलेले साहित्यिक, लेखक आपले आश्रित आहेत, असे वर्तन शाहू छत्रपतींकडून कधीही झालेले आढळत नाही.प्रबोधनकार ठाकरे यांचा १९१८ पासून शाहू महाराजांशी स्नेह सुरू झाला. ठाकरे त्यावेळी ‘भिक्षुकशाहीचे बंड’ हे पुस्तक लिहीत होते. याबाबत त्यांनी महाराजांच्या भेटीवेळी कोणत्या संदर्भग्रंथांचा उपयोग करावा अशी विचारणा केली. तेव्हा राजांनी अनेक इंग्लिश ग्रंथांची नावे सांगितली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी ते ग्रंथ आपल्या खर्चाने ठाकरे यांना दिले. शिवाय ५ हजार रुपयांचा आगाऊ धनादेश देऊन त्यांच्या २ हजार प्रती खरेदीही केल्या. ‘वेदोक्त’ प्रकरणात टिळकांची बाजू घेणाऱ्या प्रा. वि. गो. विजापूरकर यांच्या ‘ग्रंथमाला’ मासिकालाही महाराजांनी वार्षिक पाचशे रुपये अनुदान मंजूर केले होते. महाराजांनी दिलेली आर्थिक मदत आणि प्रोत्साहन यामुळे दिनकरराव जवळकरांसारख्या बहुगुणी लेखकाच्या प्रतिभेला बहर आला होता यात शंका नाही.

प्रसिध्द शाहीर लहरी हैदर संध्यामठ गल्लीत एका पडक्या जागेत राहत होते. शाहू छत्रपतींनी म्युनिसिपल कमिटीच्या चेअरमनला खास लेखी हुकूम काढून ३० ऑक्टोबर १९२१ रोजी ती जागा लहरी हैदर यांना मोफत दिली. इतकेच नव्हे तर दरबारातून त्या ठिकाणी नवी इमारत बांधण्यासाठी लागणारे दगड आणि माती यांचाही पुरवठा केला.

बहुजन समाजातील पहिले शिवचरित्रकार कृष्णराव केळुसकर यांच्या शिवचरित्रास शाहू महाराजांनी एक हजार रुपयांचे पारितोषिक दिले. एक हजार ग्रंथप्रती घेतल्या. अशा अनेक साहित्यिक मंडळींना आपण मदत करतो म्हणून त्यांनी आपल्या आश्रितांसारखे रहावे अशी महाराजांची कधीच इच्छा नव्हती. त्यामुळेच ‘संदेश’कार अच्युत बळवंत कोल्हटकरांना ४ हजार रुपयांची मदत करूनही ‘तुम्ही माझी बाजू तुम्हांला त्रास होत असेल तर तुमच्या पत्रकात मांडू नका’ अशी विनंती ३ जून १९२१ रोजी अच्युतरावांना पाठवलेल्या पत्रात महाराज करतात. यातून त्यांच्या विशाल मनाचे आणि साहित्यप्रेमाचे दर्शन घडते. अशा असंख्य साहित्यिक, कलाकारांना शाहू महाराजांनी उदार हस्ते मदत केली, ज्यांच्या नावांची संख्या खूपच मोठी आहे.

कारकुन बनला राजकवी

आप्पाजी धुंडीराम मुरतुले ऊर्फ कवी सुमंत हे छत्रपतींच्या खासगी खात्यात कारकून होते. परंतु काव्यात रमणाऱ्या सुमंत यांच्यामुळे त्यांच्याकडून नोकरीचे काम होईना. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुमंत यांना नोकरीतून मुक्त करावे अशी महाराजांकडे मागणी केली. त्यानुसार सुमंत यांना कमी करतानाच त्याच्या घरासाठी धान्याचा पुरवठा करण्याचा आदेश महाराजांनी दिला. एवढेच नव्हे तर ते म्हणाले, ‘रावसाहेब, हा कारकून म्हणून जन्माला आलेला नाही. तो एक महाकवी म्हणून जन्मास आलेला आहे. त्याच्या सन्मानातच आमच्या दरबारचाही सन्मान होणार आहे.’ यानंतर त्यांची ३५ रुपये मानधनावर राजकवी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

(लेखक महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या राजर्षी शाहू गौरव ग्रंथाचे संपादक आहेत.)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती