शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

राजर्षी शाहू स्मृती जागर: मराठ्यांच्या लष्करी सामर्थ्याची शाहू महाराजांकडून पुनर्स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 12:49 IST

पहिले महायुद्ध संपल्यानंतर, युद्धात धारातीर्थी पडलेल्या मराठ्यांसह सर्व जाती-धर्माच्या सैन्याच्या स्मरणार्थ शाहू महाराजांनी १९२१ साली पुण्यातील शनिवारवाड्यासमोर स्मारक बनवून घेतले. हे सैन्यासाठीचे भारतातील पहिले स्मारक होते.

इंद्रजीत सावंत, इतिहास संशोधक  

कोल्हापूर संस्थानात लष्कराचे बळकटीकरण आणि भारतीय सैन्य दलात मराठा रेजिमेंटसह बहुजनांच्या भरतीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे बहुमोल योगदान आहे. शिवाजी महाराजांपासून मराठ्यांचे सैन्यदळ, घाेडदळ, पायदळ असे लष्करी सामर्थ्य होते, पण पुढे तहात ब्रिटिशांनी कोल्हापूर संस्थानचे लष्कर कमी केले आणि १८१४ मध्ये गडकऱ्यांनी केलेल्या बंडानंतर फक्त छत्रपतींच्या सुरक्षेसाठीचे लष्कर ठेवले. त्यामुळे लष्करी सामर्थ्याची परंपरा खंडित झाली.त्यावेळी युद्धावर जाणे म्हणजे, कायमचे परागंदा होणे किंवा मृत्यू हे दोन गैरसमज सर्वसामान्य जनतेत असल्याने, लष्करात भरती व्हायला कोण तयार नसे.दरम्यान, पहिले महायुद्ध सुरू झाले आणि ब्रिटिशांना सैन्याची कमतरता भासू लागली. ब्रिटिशांवर आलेले संकट हे कोल्हापूर संस्थानचे लष्कर बळकट करण्याची संधी आहे, हे दूरदृष्टीच्या राजर्षी शाहू महाराजांनी हेरले व त्यांनी संस्थानातील मराठे व बहुजनांची लष्कर भरती व्हावी, यासाठी सिमल्याला जाऊन व्हॉइसरॉय यांची भेट घेतली.मराठ्यांच्या शरीरयष्टीमुळे त्यांच्या सैन्य भरतीत अडचणी येत होत्या, पण शाहू महाराजांनी हवामान व प्रतिकूल परिस्थितीमुळे मराठ्यांची लहान चणी आहे, पण याच काटकपणा व सहनशीलतेच्या गुणांमुळे मराठ्यांनी हिंदुस्थान जिंकून घेतला होता, आजही मराठ्यांची हिंमत व ताकद कमी झालेली नाही, याची आठवण ब्रिटिशांना करून दिली व सैन्यभरती करायला लावली, पण कोल्हापुरात वेगळाच प्रश्न निर्माण झाला, सैन्याच्या रिक्रुटमेंसाठी पार्टी आली की, लोक पळून जायचे. एकदा तर म्हादू गवंडी यांच्या पुढाकाराने नागरिकांनी रिक्रुटमेंटसाठी आलेल्यांनाच कैद केले, त्यावेळी संस्थानात तीन दिवस कर्फ्यू लावावा लागला. अखेर छत्रपती शाहू महाराजांनी मराठ्यांमध्ये दडलेल्या लढवय्या बाण्याची जाणीव करून दिली.छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, ताराराणींचा वारसा सांगून शौर्यजागृत केले. त्यानंतर, कोल्हापुरात लष्करभरतीला त्या काळी एवढा उदंड प्रतिसाद मिळाला की, सर्वाधिक भरती या संस्थानातून झाली. मराठा रेजिमेंट सुरू झाले. पहिल्या युद्धात मराठे इराककडील भागात कुत उल आमरा भागात लढत होते, पण त्यांना वेढा घातल्याने खाण्याचे वांदे झाले. अन्य सैनिक घोड्यांचे मांस खाऊन जगत होते, पण मराठ्यांना घोडे अधिक प्रिय असल्याने त्यांनी नकार दिला. मराठा सैनिक जगला पाहिजे, म्हणून शाहूंनी स्वत: विमानाने जाऊन मी तेथे सैनिकांशी बोलेन, असा प्रस्ताव दिला, पण ब्रिटिशांनी सुरक्षेच्या कारणास्तव तो नाकारला.युद्धात कोल्हापूर संस्थानची मदत झाल्याने युद्ध संपल्यानंतर झालेल्या शांततेच्या कराराच्या अटी-शर्ती शाहू महाराजांना कळाव्यात, यासाठी एक मसुदा ब्रिटिशांनी शाहू महाराजांना पाठविला होता. पहिल्या महायुद्धाच्या निमित्ताने का असेना, मराठ्यांची सैन्यभरतीची सुरुवात शाहू महाजांच्या प्रयत्नांनी झाली. कोल्हापूरचेच नव्हे, तर मराठ्यांचे लष्करी सामर्थ्य पुन्हा उदयाला आले. भारतीय लष्करात आजचे मराठ्यांना स्थान आहे, त्यामागेही शाहूंचीच ही प्रेरणा कामी आली, असे म्हणता येईल. शाहू महाराजांचा लष्कर भरतीचा पैलू मात्र दुर्लक्षित राहिला.भारतातील पहिले स्मारकपहिले महायुद्ध संपल्यानंतर, युद्धात धारातीर्थी पडलेल्या मराठ्यांसह सर्व जाती-धर्माच्या सैन्याच्या स्मरणार्थ शाहू महाराजांनी १९२१ साली पुण्यातील शनिवारवाड्यासमोर स्मारक बनवून घेतले. हे सैन्यासाठीचे भारतातील पहिले स्मारक होते. पुढे तेथे बाजीरावांचा पुतळा बसविण्याचा हालचाली सुरू झाल्यावर, लष्कराने स्मारकाची काळजी घेत, ते आहे असे उचलून आपल्या रेजिमेंटमध्ये पुनर्स्थापित केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती