शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

पावसाची उघडीप पण पूराचे पाणी ओसरण्याची गती संथ, अद्याप ५४ बंधारे पाण्याखाली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 17:10 IST

कोल्हापूर जिल्ह्यात गेली दोन दिवस पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी पूराचे पाणी ओसरण्याची गती एकदमच संथ आहे. अद्याप ५४ बंधारे पाण्याखाली असून ९ राज्य तर १५ प्रमुख जिल्हा मार्ग पाण्याखाली असल्याने एस. टी. चे बारा मार्गावरील वाहतूक पुर्णपणे ठप्प आहे.

ठळक मुद्देपावसाची उघडीप पण पूराचे पाणी ओसरण्याची गती संथअद्याप ५४ बंधारे पाण्याखाली 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेली दोन दिवस पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी पूराचे पाणी ओसरण्याची गती एकदमच संथ आहे. अद्याप ५४ बंधारे पाण्याखाली असून ९ राज्य तर १५ प्रमुख जिल्हा मार्ग पाण्याखाली असल्याने एस. टी. चे बारा मार्गावरील वाहतूक पुर्णपणे ठप्प आहे.कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर पावसाची उघड-झाप राहिली तरी पंचगंगेसह सर्वच नद्यांच्या पाण्याची पातळी स्थिर राहिल्याने नदीकाठच्या गावांची अस्वस्थता कायम आहे. पंचगंगेची पातळी ३९.११ फुटांवर कायम असून, ५४ बंधारे पाण्याखाली असल्याने एस. टी. चे बारा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. रविवारी दिवसभर उघडीप राहिली, तर सोमवारी अधून-मधून सरी कोसळत राहिल्या. मंगळवारी उघड-झाप सुरू होती.

महापुरातून अजून कोल्हापूरकर सावरले नसल्याने पावसाचा जोर वाढला, की नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकतो. मागील चार दिवसांत झालेल्या जोरदार पावसाने नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. त्यात धरण क्षेत्रातही अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आणि नद्यांनी पुन्हा रौद्र रूप धारण केले.

रविवारी आंबेवाडीसह पूरबाधित गावांचे जिल्हा प्रशासनाने स्थलांतर सुरू केले. पावसाचा जोर कमी झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला, तरी नद्यांची पातळी कायम आहे. पंचगंगा नदीची पातळी ३९.१० फुटांवर कायम आहे. जिल्ह्यातील ५४ बंधारे पाण्याखाली असल्याने एस. टी. चे बारा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. गगनबावड्यासह पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, आजरा व चंदगड तालुक्यांत पावसाचा जोर आहे. करवीर, कागल, गडहिंग्लज, भुदरगडमध्ये तुलनेने पाऊस कमी असून हातकणंगले, शिरोळमध्ये पूर्णपणे उघडीप राहिली आहे.पिकांचे मोठे नुकसाननदी व ओढ्याकाठचे ऊस, भातपिके अगोदरच कुजली आहेत. या पुराने उरली-सुरली पिकेही कुजू लागली आहेत. सततच्या पावसाने ऊस व भाताची वाढ खुंटली आहे. डोंगरमाथ्यावरील गवतही कुजू लागल्याने ओल्या वैरणीचा प्रश्नही गंभीर बनला आहे.पडझडीत ६.५० लाखांचे नुकसानसोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात २५ हून अधिक खासगी मालमत्तांची पडझड झाली आहे. त्यामध्ये साडेसहा लाखांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.पातळी स्थिर राहिल्याने स्थलांतर थांबविलेपुराचे पाणी वाढत गेल्याने सुरक्षिततेसाठी शिरोळ ४ गावातून ११२ तर करवीरमधील दोन गावांतून २५९ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले. कोल्हापूर शहरातील सुतारवाड्यात ९ कुटुंबांतील २८ व्यक्तींचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले होते.  पावसाचा जोर ओसरला त्यात नदीची पाणी पातळी स्थिर राहिल्याने प्रशासनाने स्थलांतरीत कुटुंबांची मोहीम तूर्त थांबविली आहे.बारा प्रमुख मार्गांवरील वाहतूक ठप्पजिल्ह्यातील ९ राज्य तर प्रमुख जिल्हा मार्ग पाण्याखाली असल्याने एस. टी. चे बारा मार्गावरील वाहतूक पुर्णपणे ठप्प आहे. यामध्ये कोल्हापूर-गगनबावडा, रंकाळा-आरळे, गारगोटी-वाळवा, कागल-भोगावती, गगनबावडा-गारवडे, चंदगड-नांदवडे, चंदगड-गौसे-इब्रामपूर, मलकापूर - शित्तूर या मार्गांवरील वाहतूक कोलमडली आहे. 

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर