शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
2
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
4
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
5
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
6
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
7
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
8
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
9
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
10
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
11
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
12
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
13
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
14
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
15
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
16
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
17
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
18
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
19
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...

कोल्हापूर जिल्ह्यात धुवाधार पाऊस, पंचगंगा धोका पातळीकडे; ७९ बंधारे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 17:25 IST

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला धुवाधार पाऊस सोमवारीही कायम राहिला. धरणक्षेत्रातील मुसळधार पावसाने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. यामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी दुपारपर्यंत ४० फुटांवर येऊन धोका पातळीकडे वाटचाल सुरू ठेवली. पावसाने तब्बल ७९ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली.

ठळक मुद्दे४० फुटांवर पाणी पातळी, ३८ मार्गांवरील वाहतूक बंद; पर्यायी मार्गाने सुरू  ११६२ ट्रान्सफार्मर बंद असल्यामुळे वीज पुरवठा खंडित

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला धुवाधार पाऊस सोमवारीही कायम राहिला. धरणक्षेत्रातील मुसळधार पावसाने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. यामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी दुपारपर्यंत ४० फुटांवर येऊन धोका पातळीकडे वाटचाल सुरू ठेवली. पावसाने तब्बल ७९ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली.

३८ राज्य, प्रमुख, इतर जिल्हा व ग्रामीण मार्ग बंद राहिल्याने पर्यायी मार्गांवरून वाहतूक वळविण्यात आली. तर जिल्ह्यातील ११६२ ट्रान्सफार्मर पाण्यामुळे बंद असल्याने महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून धुवाधार पाऊस सुरू आहे; त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नदी काठच्या गावांसह पाणी येणाऱ्या भागात सतर्कतेचे आदेश देत परिस्थितीवर नियंत्रण ठेवले जात आहे. शहरातील सखल भागांत पाणी साचल्याने ठिकठिकाणी डबक्याचे स्वरूप आले होते. त्यामुळे वाहनधारकांना कसरत करूनच मार्गक्रमण करावे लागत होते.  कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून धुवाधार पाऊस सुरू असून सोमवारीही पावसाचा जोर कायम राहिला; त्यामुळे करवीर तालुक्यातील कळंबा तलाव असा पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहू लागला. हे पाणी पाहण्यासाठी नागरिकांची अशी गर्दी झाली होती.  

जिल्ह्यात गगनबावडा, आजरा, शाहूवाडी, कागल, भुदरगड, पन्हाळा, राधानगरी, चंदगड तालुक्यांत मुसळधार पाऊस सुरू राहिल्याने नद्या व नाल्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली. पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथील पाणीपातळी दुपारी ४० फुटांवर जाऊन धोका पातळीकडे तिची वाटचाल सुरू राहिली.

धुवाधार पावसामुळे जिल्ह्यातील ७९ बंधारे पाण्याखाली जाऊन वाहतूक कोलमडली. तर राज्यमार्ग ६, प्रमुख जिल्हामार्ग १३, ग्रामीणमार्ग ५ व इतर जिल्हामार्ग १४ असे ३८ मार्ग बंद राहिले. या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गावरून वळविण्यात आली.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून धुवाधार पाऊस सुरू असून सोमवारीही पावसाचा जोर कायम राहिला; त्यामुळे करवीर तालुक्यातील कळंबा तलाव असा पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहू लागला. हे पाणी पाहण्यासाठी नागरिकांची अशी गर्दी झाली होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सोमवारी सकाळी आठपर्यंत ४७.१० मि.मी. पावसाची नोंद झाली. यामध्ये सर्वाधीक चंदगडमध्ये ७४.५० मि.मी., त्याखालोखाल आजऱ्यात ७३.२५ मि.मी. पाऊस पडला आहे.

तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा -हातकणंगले (१३.६२), शिरोळ (१४.००), पन्हाळा (३७.८६), शाहूवाडी (५६.३३), राधानगरी (६३.००), गगनबावडा (६५.५०), करवीर (२६.६३), कागल (४०.४३), गडहिंग्लज (३२.७१), भुदरगड (६७.४०), आजरा (७३.२५), चंदगड (७४.५०).

कडवी धरण शंभर टक्के भरलेधरणक्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कडवी धरण शंभर टक्के भरले. राधानगरी धरण ८१ टक्के भरले असून येथून १६०० क्युसेक्स विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. वारणा ८३ टक्के भरले असून येथून ७७५ क्युसेक्स विसर्ग सुुरू आहे. तर दूधगंगा धरण ७३ टक्के इतके भरले आहे.

जिल्ह्यातील ११६२ विद्युत ट्रान्सफार्मर बंदविभाग                          ट्रान्सफार्मर       फिडर       उच्चदाब वाहिनी               लघुदाबवाहिनीकोल्हापूर शहर                      ३८                 १                      २३७                           ४२१कोल्हापूर ग्रामीण-१              ५३२               -                         ८२१                        १३४१कोल्हापूर ग्रामीण- २             १७४                -                            -                           -इचलकरंजी                            १०४                   ५                       १                            -जयसिंगपूर                             २१८               -                         ७३                          १३३गडहिंग्लज                                ९६               -                             -                            -एकूण                                     ११६२             ०६                 ११३२                     १८९४ 

 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018kolhapurकोल्हापूर