शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोल्हापूर जिल्ह्यात धुवाधार पाऊस, पंचगंगा धोका पातळीकडे; ७९ बंधारे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 17:25 IST

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला धुवाधार पाऊस सोमवारीही कायम राहिला. धरणक्षेत्रातील मुसळधार पावसाने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. यामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी दुपारपर्यंत ४० फुटांवर येऊन धोका पातळीकडे वाटचाल सुरू ठेवली. पावसाने तब्बल ७९ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली.

ठळक मुद्दे४० फुटांवर पाणी पातळी, ३८ मार्गांवरील वाहतूक बंद; पर्यायी मार्गाने सुरू  ११६२ ट्रान्सफार्मर बंद असल्यामुळे वीज पुरवठा खंडित

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला धुवाधार पाऊस सोमवारीही कायम राहिला. धरणक्षेत्रातील मुसळधार पावसाने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. यामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी दुपारपर्यंत ४० फुटांवर येऊन धोका पातळीकडे वाटचाल सुरू ठेवली. पावसाने तब्बल ७९ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली.

३८ राज्य, प्रमुख, इतर जिल्हा व ग्रामीण मार्ग बंद राहिल्याने पर्यायी मार्गांवरून वाहतूक वळविण्यात आली. तर जिल्ह्यातील ११६२ ट्रान्सफार्मर पाण्यामुळे बंद असल्याने महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून धुवाधार पाऊस सुरू आहे; त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नदी काठच्या गावांसह पाणी येणाऱ्या भागात सतर्कतेचे आदेश देत परिस्थितीवर नियंत्रण ठेवले जात आहे. शहरातील सखल भागांत पाणी साचल्याने ठिकठिकाणी डबक्याचे स्वरूप आले होते. त्यामुळे वाहनधारकांना कसरत करूनच मार्गक्रमण करावे लागत होते.  कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून धुवाधार पाऊस सुरू असून सोमवारीही पावसाचा जोर कायम राहिला; त्यामुळे करवीर तालुक्यातील कळंबा तलाव असा पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहू लागला. हे पाणी पाहण्यासाठी नागरिकांची अशी गर्दी झाली होती.  

जिल्ह्यात गगनबावडा, आजरा, शाहूवाडी, कागल, भुदरगड, पन्हाळा, राधानगरी, चंदगड तालुक्यांत मुसळधार पाऊस सुरू राहिल्याने नद्या व नाल्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली. पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथील पाणीपातळी दुपारी ४० फुटांवर जाऊन धोका पातळीकडे तिची वाटचाल सुरू राहिली.

धुवाधार पावसामुळे जिल्ह्यातील ७९ बंधारे पाण्याखाली जाऊन वाहतूक कोलमडली. तर राज्यमार्ग ६, प्रमुख जिल्हामार्ग १३, ग्रामीणमार्ग ५ व इतर जिल्हामार्ग १४ असे ३८ मार्ग बंद राहिले. या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गावरून वळविण्यात आली.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून धुवाधार पाऊस सुरू असून सोमवारीही पावसाचा जोर कायम राहिला; त्यामुळे करवीर तालुक्यातील कळंबा तलाव असा पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहू लागला. हे पाणी पाहण्यासाठी नागरिकांची अशी गर्दी झाली होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सोमवारी सकाळी आठपर्यंत ४७.१० मि.मी. पावसाची नोंद झाली. यामध्ये सर्वाधीक चंदगडमध्ये ७४.५० मि.मी., त्याखालोखाल आजऱ्यात ७३.२५ मि.मी. पाऊस पडला आहे.

तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा -हातकणंगले (१३.६२), शिरोळ (१४.००), पन्हाळा (३७.८६), शाहूवाडी (५६.३३), राधानगरी (६३.००), गगनबावडा (६५.५०), करवीर (२६.६३), कागल (४०.४३), गडहिंग्लज (३२.७१), भुदरगड (६७.४०), आजरा (७३.२५), चंदगड (७४.५०).

कडवी धरण शंभर टक्के भरलेधरणक्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कडवी धरण शंभर टक्के भरले. राधानगरी धरण ८१ टक्के भरले असून येथून १६०० क्युसेक्स विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. वारणा ८३ टक्के भरले असून येथून ७७५ क्युसेक्स विसर्ग सुुरू आहे. तर दूधगंगा धरण ७३ टक्के इतके भरले आहे.

जिल्ह्यातील ११६२ विद्युत ट्रान्सफार्मर बंदविभाग                          ट्रान्सफार्मर       फिडर       उच्चदाब वाहिनी               लघुदाबवाहिनीकोल्हापूर शहर                      ३८                 १                      २३७                           ४२१कोल्हापूर ग्रामीण-१              ५३२               -                         ८२१                        १३४१कोल्हापूर ग्रामीण- २             १७४                -                            -                           -इचलकरंजी                            १०४                   ५                       १                            -जयसिंगपूर                             २१८               -                         ७३                          १३३गडहिंग्लज                                ९६               -                             -                            -एकूण                                     ११६२             ०६                 ११३२                     १८९४ 

 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018kolhapurकोल्हापूर