शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

कोल्हापूर जिल्ह्यात धुवाधार पाऊस, पंचगंगा धोका पातळीकडे; ७९ बंधारे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 17:25 IST

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला धुवाधार पाऊस सोमवारीही कायम राहिला. धरणक्षेत्रातील मुसळधार पावसाने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. यामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी दुपारपर्यंत ४० फुटांवर येऊन धोका पातळीकडे वाटचाल सुरू ठेवली. पावसाने तब्बल ७९ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली.

ठळक मुद्दे४० फुटांवर पाणी पातळी, ३८ मार्गांवरील वाहतूक बंद; पर्यायी मार्गाने सुरू  ११६२ ट्रान्सफार्मर बंद असल्यामुळे वीज पुरवठा खंडित

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला धुवाधार पाऊस सोमवारीही कायम राहिला. धरणक्षेत्रातील मुसळधार पावसाने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. यामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी दुपारपर्यंत ४० फुटांवर येऊन धोका पातळीकडे वाटचाल सुरू ठेवली. पावसाने तब्बल ७९ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली.

३८ राज्य, प्रमुख, इतर जिल्हा व ग्रामीण मार्ग बंद राहिल्याने पर्यायी मार्गांवरून वाहतूक वळविण्यात आली. तर जिल्ह्यातील ११६२ ट्रान्सफार्मर पाण्यामुळे बंद असल्याने महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून धुवाधार पाऊस सुरू आहे; त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नदी काठच्या गावांसह पाणी येणाऱ्या भागात सतर्कतेचे आदेश देत परिस्थितीवर नियंत्रण ठेवले जात आहे. शहरातील सखल भागांत पाणी साचल्याने ठिकठिकाणी डबक्याचे स्वरूप आले होते. त्यामुळे वाहनधारकांना कसरत करूनच मार्गक्रमण करावे लागत होते.  कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून धुवाधार पाऊस सुरू असून सोमवारीही पावसाचा जोर कायम राहिला; त्यामुळे करवीर तालुक्यातील कळंबा तलाव असा पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहू लागला. हे पाणी पाहण्यासाठी नागरिकांची अशी गर्दी झाली होती.  

जिल्ह्यात गगनबावडा, आजरा, शाहूवाडी, कागल, भुदरगड, पन्हाळा, राधानगरी, चंदगड तालुक्यांत मुसळधार पाऊस सुरू राहिल्याने नद्या व नाल्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली. पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथील पाणीपातळी दुपारी ४० फुटांवर जाऊन धोका पातळीकडे तिची वाटचाल सुरू राहिली.

धुवाधार पावसामुळे जिल्ह्यातील ७९ बंधारे पाण्याखाली जाऊन वाहतूक कोलमडली. तर राज्यमार्ग ६, प्रमुख जिल्हामार्ग १३, ग्रामीणमार्ग ५ व इतर जिल्हामार्ग १४ असे ३८ मार्ग बंद राहिले. या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गावरून वळविण्यात आली.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून धुवाधार पाऊस सुरू असून सोमवारीही पावसाचा जोर कायम राहिला; त्यामुळे करवीर तालुक्यातील कळंबा तलाव असा पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहू लागला. हे पाणी पाहण्यासाठी नागरिकांची अशी गर्दी झाली होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सोमवारी सकाळी आठपर्यंत ४७.१० मि.मी. पावसाची नोंद झाली. यामध्ये सर्वाधीक चंदगडमध्ये ७४.५० मि.मी., त्याखालोखाल आजऱ्यात ७३.२५ मि.मी. पाऊस पडला आहे.

तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा -हातकणंगले (१३.६२), शिरोळ (१४.००), पन्हाळा (३७.८६), शाहूवाडी (५६.३३), राधानगरी (६३.००), गगनबावडा (६५.५०), करवीर (२६.६३), कागल (४०.४३), गडहिंग्लज (३२.७१), भुदरगड (६७.४०), आजरा (७३.२५), चंदगड (७४.५०).

कडवी धरण शंभर टक्के भरलेधरणक्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कडवी धरण शंभर टक्के भरले. राधानगरी धरण ८१ टक्के भरले असून येथून १६०० क्युसेक्स विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. वारणा ८३ टक्के भरले असून येथून ७७५ क्युसेक्स विसर्ग सुुरू आहे. तर दूधगंगा धरण ७३ टक्के इतके भरले आहे.

जिल्ह्यातील ११६२ विद्युत ट्रान्सफार्मर बंदविभाग                          ट्रान्सफार्मर       फिडर       उच्चदाब वाहिनी               लघुदाबवाहिनीकोल्हापूर शहर                      ३८                 १                      २३७                           ४२१कोल्हापूर ग्रामीण-१              ५३२               -                         ८२१                        १३४१कोल्हापूर ग्रामीण- २             १७४                -                            -                           -इचलकरंजी                            १०४                   ५                       १                            -जयसिंगपूर                             २१८               -                         ७३                          १३३गडहिंग्लज                                ९६               -                             -                            -एकूण                                     ११६२             ०६                 ११३२                     १८९४ 

 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018kolhapurकोल्हापूर