पावसाचे आगरही दुष्काळाच्या छायेमध्ये
By Admin | Updated: September 6, 2015 22:54 IST2015-09-06T22:54:29+5:302015-09-06T22:54:29+5:30
दहा तलाव कोरडे : शिराळा तालुक्यात बरसला निम्माच पाऊस, चांदोली धरणाचा सांडवा दहा वर्षांत पहिल्यांदाच कोरडा

पावसाचे आगरही दुष्काळाच्या छायेमध्ये
विकास शहा= शिराळा शिराळा तालुका हा पावसाचे आगर. मात्र यावेळी सप्टेंबर महिना आला तरीही तालुक्यात निम्म्यापेक्षाही कमी पाऊस झाल्याने १० पाझर तलाव कोरडे पडले आहेत, तर इतर २९ तलावात ५० टक्केसुद्धा पाणीसाठा नाही.
पावसाच्या दडीमुळे चांगली उगवण झालेली पिके करपू लागली आहेत, तर जनावरांना वैरण व पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. चांदोली धरणातून यावर्षी पूजनासाठी फक्त पाणी सोडण्यात आले. गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच हा सांडवा कोरडा आहे.
तालुक्यात ५४०९० हेक्टर क्षेत्र पिकाखालील आहे. त्यापैकी जिरायती ४७४७६, तर बागायती क्षेत्र ६६१८ हेक्टर आहे. खरीप हंगामात २६९५० हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत. धूळवाफेवर भात पेरण्या झाल्या, यानंतर काही प्रमाणात पाऊस पडला. जुलै महिनाअखेर पिकांना जीवदान मिळेल, असा पाऊस झाला होता. त्यामुळे दुबार पेरण्यांचे संकट टळले होते. मात्र मुसळधार पाऊस एकदाही न झाल्याने पाझर तलाव, धरणांमध्ये पाणीसाठा होऊ शकला नाही.
मात्र आॅगस्ट महिना जवळजवळ कोरडाच गेला. त्यामुळे ४९ पाझर तलावांपैकी निगडी (जुना), बेलदारवाडी, कोंडाईवाडी नंबर २, शिरसवाडी, औंढी, शिरशी जुना, शिरशी (भैरवदरा), शिवरवाडी, पावलेवाडी नं. १, भटवाडी हे १० तलाव कोरडेच आहेत, तर पाडळी (३० टक्के), पणुंबे्र तर्फ शिराळा नं. १ (१५), करमाळा नं. १ (३०), खेड (२०), पाडळीवाडी (२०), वाकुर्डे खुर्द (३५), अंत्री खुर्द (४०), निगडी महारदरा (२०), आटुगडेवाडी मेणी (३५), वाडीभागाई (३५), तडवळे (३०), हत्तेगाव (५०), गवळेवाडी उंदीरखोरा (४०), गवळेवाडी बहिरखोरा (५०), हातेगाव अंबाबाईवाडी (४५), धायवडे कुंडनाला (३५), मेणी साकु्रंपीनाला (४०), बादेवाडी (४५), शिरशी कासारकी (३०), कोंडाईवाडी नं. १ (२५), चव्हाणवाडी (३०), वाकुर्डे बुद्रुक जामदाड (३०), चरणवाडी नं. १ (२०), कापरी (४०), बिऊर (४५), खिरवडे (५०), शिरशी काळेखिंड (१०), भैरेवाडी (२०), पाचुंबी (३५), तडवळे नं. १ (२०), पावलेवाडी नं. २ (२०), भाटशिरगाव (३५), रेड क्र. २ (६०), पणुंब्रे तर्फ शिराळा नं. २ (२०), करमाळे नंबर २ (२०), निगडी खोकडदरा (१०), लादेवाडी (२०), इंग्रुळ (२०), सावंतवाडी (३० टक्के) एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.
यामुळे पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. पाऊस न झाल्याने जनावरांच्याचाऱ्याचा प्रश्नही गंभीर होणार आहे.
तालुक्यात चांगला पाऊस होतो. त्यामुळे जुलै महिन्यातच सर्व धरणे, पाझर तलाव भरतात. मात्र यावर्षी पाऊस नसल्याने ५० टक्के सुद्धा पाणी नाही. शिराळा तोरणा ओढ्यास एकदाही पूर आलेला नाही. अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे.
यावर्षी सुरुवातीस पिके चांगली होती. ही पिके जोमात यायला आणि पाऊस गायब व्हायला. त्यामुळे आता सोयाबीन, भात, ऊस आदी पिके करपू लागली आहेत. तसेच वाढही खुंटली आहे. वाकुर्डे योजनेचे पाणी सोडल्यास उत्तर भाग तसेच मोरणा नदीकाठास पाणी मिळू शकेल.
चांदोली धरण जुलै, आॅगस्ट महिन्यात भरते. त्यानंतर वीजनिर्मिती केंद्र व सांडव्यातून पाणी सोडले जाते. मात्र यावर्षी फक्त पाणी पूजनासाठी चार दरवाजांतून पाणी सोडण्यात आले व ते लगेच बंद करण्यात आले. गेल्या दहा वर्षात या दरवाजातून पाणी न सोडण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे सांडवा कोरडा आहे. सध्या धरणात ९४.५५ टक्के म्हणजे ३२ टीएमसी पाणीसाठा आहे.
संपूर्ण आॅगस्ट महिना कोरडा गेला आहे. त्याचबरोबर कडक उन्हामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेली पिके करपू लागली आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
मंडलनिहाय ६ सप्टेंबरअखेरचा पाऊस
मंडल वर्ष २०१२ २०१३२०१४२०१५
शिराळा५९८८२६९८८३९४
शिरशी४५०१०५८५०७३१५
कोकरुड१३१५१४३११२७३७६८
चरण१२६६१३९०१४९१६६६
मांगले७०२८०९१०१६४५०
सागाव६०१८५६८७९४२०
चांदोली धरण२१७७२८७०२८४४१४५३