शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

पाऊस परतला, मळणीसह प्रचारावरही पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 13:08 IST

पाच-सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर वादळी पावसाने बुधवारी कोल्हापूरला झोडपून काढले. दुपारपासून गडगडाटासह जोरदार आलेल्या पावसाच्या सरींनी शेतशिवारांसह निवडणुकीच्या प्रचारमंडपांतही धांदल उडवून दिली. मळणीसह प्रचारावरही पूर्णपणे पाणी फिरविले. दरम्यान, रविवार (दि. २०) पर्यंत वादळी पावसाचा तडाखा कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्याने तर सर्वच जण चिंतेत आहेत.

ठळक मुद्देपाऊस परतला, मळणीसह प्रचारावरही पाणीपावसाच्या सरींनी शेतशिवारांसह निवडणुकीच्या प्रचारमंडपांतही धांदल

कोल्हापूर : पाच-सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर वादळी पावसाने बुधवारी कोल्हापूरला झोडपून काढले. दुपारपासून गडगडाटासह जोरदार आलेल्या पावसाच्या सरींनी शेतशिवारांसह निवडणुकीच्या प्रचारमंडपांतही धांदल उडवून दिली. मळणीसह प्रचारावरही पूर्णपणे पाणी फिरविले. दरम्यान, रविवार (दि. २०) पर्यंत वादळी पावसाचा तडाखा कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्याने तर सर्वच जण चिंतेत आहेत.गेल्या पंधरवड्यात परतीच्या पावसाने जिल्ह्यात अक्षरश: धुमाकूळ घातला. पूर्ण दसरा पावसातच गेल्यानंतर गेल्या पाच-सहा दिवसांपासून लख्ख सूर्यप्रकाश पडल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला होता.

कडक ऊन पडल्याने भुईमूग, सोयाबीनसह भातकापणी व मळणी जोरात सुरू होती. याचवेळी २१ रोजी होणाऱ्या मतदानासाठीचा प्रचार १९ ला सायंकाळी संपणार असल्याने अवघे चारच दिवस हातात राहिल्याने प्रचार टिपेला पोहोचला आहे. प्रचाराचा अंतिम टप्प्यात एकेक तास महत्त्वाचा असल्याने गावागावांत, गल्लोगल्ली एकच धुरळा उडाला आहे.ही सर्व धांदल सुरू असतानाच दुपारपासून अचानक पाऊस सुरू झाल्याने सभांचे नियोजनच विस्कटून गेले. सकाळपासून तसे वातावरण दिसत होते; पण त्यानंतर ते निवळले होते. दुपारी अचानक पावसाचे आगमन झाले.

तीन-साडेतीनच्या सुमारास जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी तुफानी पाऊस कोसळला. संध्याकाळी पाचनंतर पुन्हा आभाळ भरून आले. ढगांच्या गडगडाटासह आणि विजेच्या लखलखाटासह पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने संध्याकाळी होणाऱ्या सभा व प्रचारफेऱ्यांचे नियोजनच विस्कटले.पाऊस नसल्यामुळे रेनकोट, छत्र्या घरीच राहिल्याने संध्याकाळी भिजतच घर गाठण्याची वेळ नोकरदारांवर आली. त्यातच आता दिवाळीची खरेदीही सुरू असल्याने बाजारपेठेवरही याचा परिणाम झाला. पाऊस जोरात असल्याने अर्ध्या तासातच रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले. घाण पाण्यातूनच वाट काढत प्रवास करावा लागला. जयंती नाल्यातही पाण्याचा प्रवाह वाढल्याने वाहतूक पोलीस शाखेच्या कार्यालयामागे नाला ओसंडून वाहू लागला. 

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर