शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
6
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
7
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
8
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
9
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
10
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
11
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
12
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
13
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
14
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
15
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
16
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
17
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
18
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
19
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
20
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार

रेल्वे आरक्षणाचे नियम बदलले; आता ६० दिवस आधी रिझर्व्हेशन

By संदीप आडनाईक | Updated: October 17, 2024 21:14 IST

लांबपल्ल्याच्या गाड्यांची तिकिटे आता केवळ दोन महिने आधीच फुल राहतील.

संदीप आडनाईक/कोल्हापूर, लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : दिवाळीपूर्वी रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांच्या सोयीसाठी आगाऊ आरक्षणाच्या सध्याच्या नियमात बदल केला आहे. आता प्रवासाचा दिवस सोडून १२० दिवसांऐवजी ६० दिवस आधी आरक्षण करता येणार आहे. यामुळे सामान्य प्रवाशांना फायदा होणार आहे. लांबपल्ल्याच्या गाड्यांची तिकिटे आता केवळ दोन महिने आधीच फुल राहतील.

मध्ये रेल्वेने यासंदर्भातील अधिसूचना १६ नोव्हेंबर रोजी जारी केली आहे. १ नोव्हेंबरपासून या नियमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नवी दिल्लीच्या प्रवासी मार्केटिंगचे संचालक संजय मनोचा यांनी जारी केलेल्या या अधिसूचनेनुसार ३१ ऑक्टोबरपर्यंतचे आरक्षण कायम राहतील, त्यात कोणताही बदल करण्यात येणार नाही. परदेशी प्रवाशांसाठी ३६५ दिवस आधी आरक्षण करण्याच्या नियमातही बदल झालेला नाही, अशी माहिती नमो रेल्वे पॅसेंजर वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष आणि मध्ये रेल्वेचे मुंबई सल्लागार समितीचे सदस्य अजय दुबे यांनी दिली.

या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवाशांना एक जानेवारीनंतरचे लांबपल्ल्याचे आरक्षण मिळणे दुरापास्त होणार आहे. पुढील दोन महिन्यांच्या बुकिंगसाठी प्रमुख आरक्षण केंदांबाहेर एजंटांनी बसवलेले भिकारी, गर्दुल्ले आणि बेकार तरुण यांच्या भल्यामोठ्या रांगा कमी होणार आहेत.

या निर्णयामुळे शुक्रवारी पुढील दोन महिन्यांचे आगाऊ आरक्षण सुरू होईल. यामुळे आरक्षण केंद्राबाहेरच्या परिसराचा ताबा घेणाऱ्या रेल्वे बुकिंग एजंटांचे मात्र नुकसान होणार आहे. सर्व आरक्षण केंद्राबाहेर लांब रांगा लागत, त्यात एकही अस्सल प्रवासी नसायचा. शुक्रवारी सकाळी खिडक्या उघडताच काही तासांतच पुढील १२० दिवसांचे रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे बुकिंग फुल होत होते.

यापूर्वीच्या पद्धतीमुळे वाढलेला तिकिटांचा काळाबाजार रोखण्यात येईल. शिवाय सामान्य प्रवाशांना पुढील दोन महिन्यांनंतरची तिकिटे मिळण्याची शक्यताही वाढलेली आहे.-शिवनाथ बियाणी, सदस्य, पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समिती.

या नियमामुळे अतिशय कमी कालावधीत प्रवासाचे नियोजन करणाऱ्या सामान्य प्रवाशांना फायदा होणार आहे. रेल्वेला आरक्षणाचे पैसे वापरायला मिळणार नसले किंवा महसूल कमी मिळणार असला तरी सामान्य प्रवाशांचे पैसे अडकून राहणार नाहीत. यामुळे रेल्वेचा वाढलेला नफा दाखवून आगाऊ आरक्षण घेता येणार नाही.

-विनाेद ओसवाल, संचालक, 'नमो ट्रॅव्हल्स ॲन्ड टूर्स', भेंडे गल्ली.

असे बदलले रेल्वेचे आरक्षण कालावधी-एप्रिल १९८१ ते जानेवारी १९८५ : ९०-१ सप्टेंबर १९८८ ते ३० सप्टेंबर १९९३ : ४५-१ सप्टेंबर १९९५ ते ३१ जानेवारी १९९८ : ६०-१ मार्च २००७ ते १४ जुलै २००७ : ६०-१ फेब्रुवारी २००८ ते ९ मार्च २०१२ : १२०-१ मे २०१३ ते ३१ मार्च २०१५ : १२०

टॅग्स :kolhapurकोल्हापूर