शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

रेल्वे आरक्षणाचे नियम बदलले; आता ६० दिवस आधी रिझर्व्हेशन

By संदीप आडनाईक | Updated: October 17, 2024 21:14 IST

लांबपल्ल्याच्या गाड्यांची तिकिटे आता केवळ दोन महिने आधीच फुल राहतील.

संदीप आडनाईक/कोल्हापूर, लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : दिवाळीपूर्वी रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांच्या सोयीसाठी आगाऊ आरक्षणाच्या सध्याच्या नियमात बदल केला आहे. आता प्रवासाचा दिवस सोडून १२० दिवसांऐवजी ६० दिवस आधी आरक्षण करता येणार आहे. यामुळे सामान्य प्रवाशांना फायदा होणार आहे. लांबपल्ल्याच्या गाड्यांची तिकिटे आता केवळ दोन महिने आधीच फुल राहतील.

मध्ये रेल्वेने यासंदर्भातील अधिसूचना १६ नोव्हेंबर रोजी जारी केली आहे. १ नोव्हेंबरपासून या नियमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नवी दिल्लीच्या प्रवासी मार्केटिंगचे संचालक संजय मनोचा यांनी जारी केलेल्या या अधिसूचनेनुसार ३१ ऑक्टोबरपर्यंतचे आरक्षण कायम राहतील, त्यात कोणताही बदल करण्यात येणार नाही. परदेशी प्रवाशांसाठी ३६५ दिवस आधी आरक्षण करण्याच्या नियमातही बदल झालेला नाही, अशी माहिती नमो रेल्वे पॅसेंजर वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष आणि मध्ये रेल्वेचे मुंबई सल्लागार समितीचे सदस्य अजय दुबे यांनी दिली.

या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवाशांना एक जानेवारीनंतरचे लांबपल्ल्याचे आरक्षण मिळणे दुरापास्त होणार आहे. पुढील दोन महिन्यांच्या बुकिंगसाठी प्रमुख आरक्षण केंदांबाहेर एजंटांनी बसवलेले भिकारी, गर्दुल्ले आणि बेकार तरुण यांच्या भल्यामोठ्या रांगा कमी होणार आहेत.

या निर्णयामुळे शुक्रवारी पुढील दोन महिन्यांचे आगाऊ आरक्षण सुरू होईल. यामुळे आरक्षण केंद्राबाहेरच्या परिसराचा ताबा घेणाऱ्या रेल्वे बुकिंग एजंटांचे मात्र नुकसान होणार आहे. सर्व आरक्षण केंद्राबाहेर लांब रांगा लागत, त्यात एकही अस्सल प्रवासी नसायचा. शुक्रवारी सकाळी खिडक्या उघडताच काही तासांतच पुढील १२० दिवसांचे रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे बुकिंग फुल होत होते.

यापूर्वीच्या पद्धतीमुळे वाढलेला तिकिटांचा काळाबाजार रोखण्यात येईल. शिवाय सामान्य प्रवाशांना पुढील दोन महिन्यांनंतरची तिकिटे मिळण्याची शक्यताही वाढलेली आहे.-शिवनाथ बियाणी, सदस्य, पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समिती.

या नियमामुळे अतिशय कमी कालावधीत प्रवासाचे नियोजन करणाऱ्या सामान्य प्रवाशांना फायदा होणार आहे. रेल्वेला आरक्षणाचे पैसे वापरायला मिळणार नसले किंवा महसूल कमी मिळणार असला तरी सामान्य प्रवाशांचे पैसे अडकून राहणार नाहीत. यामुळे रेल्वेचा वाढलेला नफा दाखवून आगाऊ आरक्षण घेता येणार नाही.

-विनाेद ओसवाल, संचालक, 'नमो ट्रॅव्हल्स ॲन्ड टूर्स', भेंडे गल्ली.

असे बदलले रेल्वेचे आरक्षण कालावधी-एप्रिल १९८१ ते जानेवारी १९८५ : ९०-१ सप्टेंबर १९८८ ते ३० सप्टेंबर १९९३ : ४५-१ सप्टेंबर १९९५ ते ३१ जानेवारी १९९८ : ६०-१ मार्च २००७ ते १४ जुलै २००७ : ६०-१ फेब्रुवारी २००८ ते ९ मार्च २०१२ : १२०-१ मे २०१३ ते ३१ मार्च २०१५ : १२०

टॅग्स :kolhapurकोल्हापूर