शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

राहुल देसाई - के. पी. पाटील गटामध्ये चैतन्य : गारगोटी ग्रामपंचायत निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:01 IST

गारगोटी ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी आमदार प्रकाश आबिटकर गटाला पराभवाला सामोरे जावे लागले. युवानेते राहुल देसाई आणि माजी आमदार के. पी. पाटील गटाच्या आघाडीने

ठळक मुद्देप्रकाश आबिटकर गटाचा पराभव, भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसला उभारी

शिवाजी सावंत।गारगोटी : गारगोटी ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी आमदार प्रकाश आबिटकर गटाला पराभवाला सामोरे जावे लागले. युवानेते राहुल देसाई आणि माजी आमदार के. पी. पाटील गटाच्या आघाडीने सरपंचपदासह १२ जागांवर विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केल्याने त्यांच्या गटात उत्साहाचे वारे आहे.

सत्ताधारी आघाडीतील विद्यमान चार सदस्यांना पराभव पत्करावा लागला आहे. या विजयाने राहुल देसाई गटात चैतन्य पसरले आहे. भाजपचे सरपंच संदेश भोपळे विजयी झाल्याने उपसरपंचपदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या उमेदवाराची वर्णी लागणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीने भाजप आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे स्थान बळकट झाले आहे.

गारगोटी शहरातील निवडणूक सुरुवातीपासूनच गाजत होती. सरपंचपदासाठी मागासवर्गीय प्रवर्ग आरक्षित झाल्याने कोण उमेदवार द्यायचा इथंपासून झालेली सुरुवात माघारीच्या दिवशी तीन वाजेपर्यंत अनिश्चित होती. संदेश भोपळे आणि राजेंद्र घोडके यांच्या उमेदवारी शेवटच्या क्षणी निश्चित करण्यात आल्या आहेत. संदेश भोपळे यांच्या पत्नी गायत्री भोपळे या पंचायत समितीच्या सदस्या आहेत. पं. स.च्या माध्यमातून संदेश भोपळे यांचा लोकसंपर्क चांगला आहे. तर राजेंद्र घोडके हे व्यावसायिक असल्याने तुलनेने त्यांचा संपर्क कमी पडला आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यापासून संदेश भोपळे यांनी प्रचारात आघाडी घेतली होती.निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून राहुल देसाई यांनी तगडी मोर्चेबांधणी केली होती. काही झाले तरी यावेळी आमदार

आबिटकर गटाला सत्तेपासून थोपवायचे म्हणूनच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती केली. राहुल देसाई यांच्या गटापेक्षा तुलनेने माजी आमदार के. पी. पाटील यांचा गट कमीआहे; परंतु यावेळी राहुल देसाई यांच्यासोबत युती करून गतवेळीपेक्षा तीन जागा जादा मिळविल्या. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थान भक्कम होत आहे.1 गारगोटी शहरातील विविध प्रकारच्या विकासासाठी अनेक प्रकारचे निधी उपलब्ध करून आमदार आबिटकर यांनी विकासकामांचा डोंगर उभा केला असल्याचा दावा करीत त्यांच्या गटाने ही निवडणूक लढविली. अंतर्गत रस्ते, गटर्स, पथ दिवे, सीसीटीव्ही कॅमेरे, नानानानी पार्क यासारख्या अनेक कामांची पूर्तता केली आहे. याशिवाय एकछत्री अंमल ठेवीत आणि विरोधकांना विश्वासात घेऊन काम केले होते; पण या निवडणुकीत मतदारांनी विकासकामांकडे कानाडोळा करीत राहुल देसाई यांच्या आघाडीला पसंती दिली आहे. त्यामुळेच राहुल देसाई यांची जबाबदारी वाढली आहे.2 मतदारांनी विद्यमान सरपंच सरिता चिले, उपसरपंच अरुण शिंदे, रूपाली राऊत, विजय आबिटकर या विद्यमान सदस्यांना नाकारले आहे. विजय आबिटकर आणि अरुण शिंदे यांचा पराभव जिव्हारी लागणारा आहे. तर भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अलकेश कांदळकर यांनी विक्रमी मतांनी विजय मिळविला.3 गारगोटी शहरात वाढते अतिक्रमण आणि रहदारी यांसारख्या समस्यांचे निराकरण होणे आवश्यक आहे. राहुल देसाई यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच भाजपला या ग्रामपंचायतीमध्ये प्रवेश मिळाला आहे. सध्या राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. याशिवाय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून खऱ्या अर्थाने गारगोटीचा विकास होईल, असे काम करण्याची जबाबदारी राहुल देसाई यांच्यावर आली आहे.

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूर