शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

राधानगरी तालुक्यात जनावरांना होतेय 'लंपी ' रोगाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 14:48 IST

'Lampi' disease, amimal, health, doctor, kolhapurnews   'कोरोना'चा आलेख कोल्हापूर जिल्ह्यात थोडासा कमी झाला पण राधानगरी तालुक्यातील धामोड परिसरामध्ये जनावरांना लंपी (त्वचारोग) या विषाणूजन्य रोगाची लागण झाल्याने तालुक्यातील दुध उत्पादकांमध्ये कमालीची भिती निर्माण झाली आहे.  'कोरोना'चा आलेख कोल्हापूर जिल्ह्यात थोडासा कमी झाला पण राधानगरी तालुक्यातील धामोड परिसरामध्ये जनावरांना लंपी (त्वचारोग) या विषाणूजन्य रोगाची लागण झाल्याने तालुक्यातील दुध उत्पादकांमध्ये कमालीची भिती निर्माण झाली आहे. या रोगाची लागण झालेल्या जनावरांच्या पूर्ण अंगावर पुरळ येतात. जनावरांना मोठी खाज सुटते व तापही येतो. सात दिवसात त्याच्यावर उपाय न झाल्यास जनावर दगावण्याची शक्‍यता असते. त्यामुळे पशुपालक मोठया चिंतेत सापडले आहेत.

ठळक मुद्देराधानगरी तालुक्यात जनावरांना होतेय 'लंपी ' रोगाची लागणविषाणूजन्य त्वचारोगाचे पहिले बाधीत जणावर अढळले धामोडमध्ये

श्रीकांत ऱ्हायकरधामोड  :  'कोरोना'चा आलेख कोल्हापूर जिल्ह्यात थोडासा कमी झाला पण राधानगरी तालुक्यातील धामोड परिसरामध्ये जनावरांना लंपी (त्वचारोग) या विषाणूजन्य रोगाची लागण झाल्याने तालुक्यातील दुध उत्पादकांमध्ये कमालीची भिती निर्माण झाली आहे. या रोगाची लागण झालेल्या जनावरांच्या पूर्ण अंगावर पुरळ येतात. जनावरांना मोठी खाज सुटते व तापही येतो. सात दिवसात त्याच्यावर उपाय न झाल्यास जनावर दगावण्याची शक्‍यता असते. त्यामुळे पशुपालक मोठया चिंतेत सापडले आहेत.विदर्भ किंवा मराठवाडा या ठिकाणी तुरळक प्रमाणात 'लंपी 'या विषानूजन्य त्वचारोगाने बाधीत असणारी जनावरे सापडतात. पण तिथे लस उपलब्ध असल्याने या संसर्गजन्य आजाराचा फैलाव अटोक्यात आहे. पण गेल्या चार दिवसापासून धामोड परिसरात या संसर्गजन्य रोगाची जनावरे आढळू लागल्याने दुग्ध व्यावसाईकामध्ये भिती निर्माण झाली आहे. त्यात कोल्हापूर पशुवैद्यकीय विभागाकडे ही लस उपलब्ध नसल्याने व हा संसर्गजन्य रोग असल्याने पशुपालकांसह पशुवैद्यकीय विभागासमोर एक संकट उभे ठाकले आहे.बाधीत जनावराच्या पूर्ण अंगावर पुरळ उठणे, अशक्तपणा, ताप, अंगाला खाज सुटणे, दुधाळ जनावरांचे दुध पूर्णपणे बंद होणे अशी लक्षणे दिसतात व सात दिवसात  उपचार न झाल्यास ते जनावर दगावण्याची शक्यता असते. हा संसर्गजन्य आजार असल्याचे डॉक्टरांचे मत असल्याने गोठा प्रकल्पाने दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्यात प्रचंड भिती निर्माण झाली आहे.

धामोड (ता. राधानगरी ) येथील गणपती भामटेकर यांच्या गाईला या आजाराची लक्षणे दिसून आली आहेत. त्यामुळे धामोड येथील पशुवैद्यकीय डॉ. अनिल शिंदे यांनी तत्काळ या गायीची पाहणी करून उपचार सुरू केले आहेत. राधानगरी तालुक्यात अशा आजाराचे अद्याप एकही जनावर सापडलेले नाही. तालुक्यात लंपी आजार झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येते आहे.

सलग सात दिवस बाधीत जनावरांवर उपचार केल्यावर आजार संपुष्टात येतो. मात्र हा विषाणूजन्य आजार असल्याने इतर जनावरांनाही त्याचा धोका होऊ शकतो. "- अनिल शिंदे, पशुधन पर्यवेक्षक, धामोड

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचारkolhapurकोल्हापूरHealthआरोग्यdocterडॉक्टर