शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

एन. डी. सर आणि कोल्हापुरातील टोल लढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 14:47 IST

आयुष्यात त्यांनी अनेक लढे अंगावर घेतले व बलाढ्या राजकीय व खासगी कंपन्यांच्या छाताडावर बसून त्यांनी ते यशस्वी करून दाखविले. 

कोल्हापूर : प्रा.एन.डी.सर आणि लढे याचे आयुष्यभर अतूट नाते राहिले. किंबहुना गोरगरिब कष्टकऱ्यांच्या न्यायाचे लढे हीच त्यांच्या जगण्याची खरी उर्जा राहिली. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनापासून सुरु झालेल्या लढ्याची परंपरा त्यांच्या मृत्यूपर्यंत कायम राहिली. आयुष्यात त्यांनी अनेक लढे अंगावर घेतले व बलाढ्य राजकीय व खासगी कंपन्यांच्या छाताडावर बसून त्यांनी ते यशस्वी करून दाखविले. रायगड जिल्ह्यातील सेझला लढा हा रिलायन्स कंपनीविरुध्द होता. परंतू सर मागे सरले नाहीत. कोल्हापूरातील टोललढा हा आयआरबी कंपनीच्या विरोधात होता. परंतू कोल्हापूरातून टोल हद्दपार होण्याचे खरे श्रेय हे एन.डी.सर व ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या नेतृत्वाचाचे. त्यांच्या वैचारिक नेतृत्वामुळेच या लढा यशस्वी झाला.विरोधातील कंपनीने सगळ्या पातळीवर हा लढा मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्याकाळातील राज्यातील काँग्रेस आघाडीचे सरकार हे तसे कंपनीच्या बाजूनेच होते. कारण खासगीकरणाच्या धोरणातून स्विकारलेला हा प्रकल्प मागे घेतला तर देशभर त्याचे परिणाम उमटतील अशी भूमिका तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची होती. एन.डी.सर त्यासंदर्भातील कोणत्याही बैठकीला गेल्यावर त्यांचे पहिले वाक्य हेच असे की टोल आम्ही देणार नाही....मग मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणायचे टोल देणार नाही अशीच जर कृती समितीचे भूमिका असेल तर या प्रश्र्नांवर चर्चाच होवू शकत नाही. आणि घडलेही तसेच. काँग्रेसच्या काळात हा प्रश्र्न लोंबकळत राहिला.पुढे महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यावर भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयआरबी कंपनीला ४८५ कोटींची भरपाई देवून टोल रद्द करण्याची घोषणा केली व कोल्हापूरची मान टोलच्या जोखडातून मोकळी झाली. सुमारे सहा वर्षे हा संघर्ष सुुरु होता. परंतू त्या सगळ्या आंदोलनात एन.डी.सर कायमच अग्रभागी राहिले. त्यांचे चारित्र्यवान आणि लढाऊ नेतृत्व लाभल्यानेच कंपनीला मान झुकवावी लागली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरN D Patilप्रा. एन. डी. पाटील