शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

एन. डी. सर आणि कोल्हापुरातील टोल लढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 14:47 IST

आयुष्यात त्यांनी अनेक लढे अंगावर घेतले व बलाढ्या राजकीय व खासगी कंपन्यांच्या छाताडावर बसून त्यांनी ते यशस्वी करून दाखविले. 

कोल्हापूर : प्रा.एन.डी.सर आणि लढे याचे आयुष्यभर अतूट नाते राहिले. किंबहुना गोरगरिब कष्टकऱ्यांच्या न्यायाचे लढे हीच त्यांच्या जगण्याची खरी उर्जा राहिली. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनापासून सुरु झालेल्या लढ्याची परंपरा त्यांच्या मृत्यूपर्यंत कायम राहिली. आयुष्यात त्यांनी अनेक लढे अंगावर घेतले व बलाढ्य राजकीय व खासगी कंपन्यांच्या छाताडावर बसून त्यांनी ते यशस्वी करून दाखविले. रायगड जिल्ह्यातील सेझला लढा हा रिलायन्स कंपनीविरुध्द होता. परंतू सर मागे सरले नाहीत. कोल्हापूरातील टोललढा हा आयआरबी कंपनीच्या विरोधात होता. परंतू कोल्हापूरातून टोल हद्दपार होण्याचे खरे श्रेय हे एन.डी.सर व ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या नेतृत्वाचाचे. त्यांच्या वैचारिक नेतृत्वामुळेच या लढा यशस्वी झाला.विरोधातील कंपनीने सगळ्या पातळीवर हा लढा मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्याकाळातील राज्यातील काँग्रेस आघाडीचे सरकार हे तसे कंपनीच्या बाजूनेच होते. कारण खासगीकरणाच्या धोरणातून स्विकारलेला हा प्रकल्प मागे घेतला तर देशभर त्याचे परिणाम उमटतील अशी भूमिका तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची होती. एन.डी.सर त्यासंदर्भातील कोणत्याही बैठकीला गेल्यावर त्यांचे पहिले वाक्य हेच असे की टोल आम्ही देणार नाही....मग मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणायचे टोल देणार नाही अशीच जर कृती समितीचे भूमिका असेल तर या प्रश्र्नांवर चर्चाच होवू शकत नाही. आणि घडलेही तसेच. काँग्रेसच्या काळात हा प्रश्र्न लोंबकळत राहिला.पुढे महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यावर भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयआरबी कंपनीला ४८५ कोटींची भरपाई देवून टोल रद्द करण्याची घोषणा केली व कोल्हापूरची मान टोलच्या जोखडातून मोकळी झाली. सुमारे सहा वर्षे हा संघर्ष सुुरु होता. परंतू त्या सगळ्या आंदोलनात एन.डी.सर कायमच अग्रभागी राहिले. त्यांचे चारित्र्यवान आणि लढाऊ नेतृत्व लाभल्यानेच कंपनीला मान झुकवावी लागली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरN D Patilप्रा. एन. डी. पाटील