शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पालिका जळाल्याने कागलकरांना धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:49 IST

जहाँगीर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्ककागल : कागल नगरपालिकेच्या मुख्य इमारतीस लागलेल्या आगीच्या घटनेने शहरवासीयांना मोठा धक्का बसला आहे. जळालेली इमारत आणि त्याची दिसणारी भीषणता पाहून पालिकेशी संबंधित सारेच घटक हवालदिल झाल्याचे चित्र दुसºया दिवशी पाहावयास मिळाले. या घटनेने कागलकरांचे आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या मोठे नुकसान झाले आहे. इमारतीची झालेली हानी, जळलेले ...

जहाँगीर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्ककागल : कागल नगरपालिकेच्या मुख्य इमारतीस लागलेल्या आगीच्या घटनेने शहरवासीयांना मोठा धक्का बसला आहे. जळालेली इमारत आणि त्याची दिसणारी भीषणता पाहून पालिकेशी संबंधित सारेच घटक हवालदिल झाल्याचे चित्र दुसºया दिवशी पाहावयास मिळाले. या घटनेने कागलकरांचे आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या मोठे नुकसान झाले आहे. इमारतीची झालेली हानी, जळलेले फर्निचर, अन्य साहित्य आणि महत्त्वाचे रेकॉर्ड, कागदपत्रे या अनुषंगाने नगरपालिका आणि कागलकरांनी एकजुटीने उभे राहण्याची गरज आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या या नगरपालिकेत आग लागण्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. दोन मजले आणि तळमजला असणाºया या भव्य इमारतीत मधल्या मजल्यावर आग लागली. येथे संवेदनशील बनलेला बांधकाम विभाग होता. तसेच याच ठिकाणी घरकुल आणि अन्य लाभार्थी योजनांची कार्यवाही होत असे. सुदैवाने मुख्याधिकारी, नगराध्यक्ष केबिन खाली आहे. तळभागात करवसुली आहे. मात्र, जी कागदपत्रे जळाली ती खूप महत्त्वाची होती. बांधकाम परवाने, विविध मागणी अर्ज, गुंठेवारी, बांधकाम प्रस्ताव, बिले रेकॉर्डस्, लाभार्थींची कागदपत्रे, विवाह नोंदणी प्रस्ताव, घरकुलाबद्दलची कागदपत्रे, ठेकेदारांची बिले, आदींचा यात समावेश आहे. विविध नोंदी, आराखडे, नकाशे तसेच जुन्या फाईल्स, टिप्पणी, शेरे, अहवाल, बिले आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे कागलकरांसाठी हा मोठा मानसिक धक्का आहे. अनेक दिवस या घटनेचे पडसाद उमटत राहतील.दोष कोणाचा,शिक्षा कोणाला ?आग कशामुळे लागली? हे गुलदस्त्यात आहे. मात्र, पालिकेतील सत्ताधारी गट आणि प्रशासनाला याची नैतिक जबाबदारी झटकता येणार नाही. अपघात हा अपघात असला तरी रात्री सुरक्षारक्षक नसणे, फायर आॅडिट न करणे, पुरेशी खबरदारी न घेणे, आपत्ती व्यवस्थापन नसणे हे मुद्दे कसे नाकारणार? विद्युत विभागाला कामचलाऊ विभागप्रमुख देणे हे कशाचे द्योतक आहे? असे अनेक विषय या आगीच्या निमित्ताने चव्हाट्यावर येणारे आहेत. यामुळे सामान्य जनतेलाच शिक्षा मिळणार आहे.क्लोरीन वायूगळतीची आठवण ?२००२ मध्ये येथील जलशुद्धिकरण केंद्रात पाणी शुद्धिकरणासाठी उपयोगात आणावयाच्या क्लोरीन वायूच्या गळतीने ‘हाहाकार’ माजला होता. सुदैवाने तेव्हा आणि आताही कोणती जीवितहानी झालेली नाही. मात्र, पालिकेतील प्रशासन आणि कारभारी मंडळींनी योग्य ते धडे घेतलेले नाहीत. अजूनही अनेक इमारती, विभागात मनमानी, हलगर्जीपणा आणि मग्रुरी कायम आहे.नागरिकांना दिलासा देण्याची गरजपालिकेची इमारत नव्याने उभी करावी लागेल. सध्या सत्ताधारी गटाकडे तितका निधी नाही. शासनाच्या निधीसाठी सत्ताधारी-विरोधी नगरसेवकांनी एकत्र गेले पाहिजे. या घटनेकडे राजकीय कुरघोडी म्हणून पाहता कामा नये. सर्वांत महत्त्वाचे कागदपत्रांची नव्याने जोडणी. यात सर्वच घटक आहेत. सामान्य जनतेला वेठीस धरले जाऊ नये. यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखून ही पूर्तता केली पाहिजे. जनतेला दिलासा दिला पाहिजे. त्यासाठी सर्वपक्षीय समितीही नेमली पाहिजे, अशी मागणी होत आहे.