शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी प्रदीप घरत सरकारी वकील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 19:44 IST

कोल्हापूर : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपींना शिक्षा होण्यासाठी शासनाकडून विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. ...

ठळक मुद्देअश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी प्रदीप घरत सरकारी वकील बिद्रे हत्याकांडला आतातरी न्याय द्या

कोल्हापूर : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपींना शिक्षा होण्यासाठी शासनाकडून विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. प्रदीप घरत यांची नियुक्ती केली आहे. बिद्रे हत्याकांडला आतातरी न्याय द्या, या मागणीचे निवेदन बिद्रे-गोरे कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधार अभय शामसुंदर कुरूंदकर (रा. भार्इंदर पूर्व, जि. ठाणे), एकनाथ खडसे यांचा भाचा ज्ञानदेव दत्तात्रय पाटील ऊर्फ राजू पाटील (रा. तळवेल, ता. भुसावळ, जि. जळगाव), कुरूंदकरचा कारचालक कुंदन भंडारी, कुरूंदकरचा बालपणीचा मित्र महेश फळणीकर (रा. आजरा) या चौघांना अटक केली आहे.फळणीकर याने हत्येची कबुली दिल्याने तपासाची गती वाढली आहे. संशयित भंडारी याने जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. तो अलिबाग न्यायालयाने फेटाळून लावला आहे. बिद्रे-गोरे कुटुंबीयांनी या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम नकोत, त्यांच्याऐवजी प्रदीप घरत यांची नियुक्ती करावी म्हणून दि. १९ नोव्हेंबर २०१८ रोजी शासनाकडे आणि न्यायालयाकडे मागणी केली होती. त्यानुसार शासनाने अ‍ॅड. घरत यांची नियुक्ती केली. त्यांनी हिट आणि रन या केसमध्ये सलमान खानला शिक्षा लावली आहे.पत्रकार जे. डे. हत्याकांडातील आरोपी छोटा राजनला प्रदेशातून आणून शिक्षा लावली. बिद्रे हत्याकांडमधील आरोपींना ते शिक्षा लावतील, अशी आशा बिद्रे-गोरे कुटुंबीयांना आहे. म्हणूनच त्यांनी त्यांची मागणी केली होती. सहायक सरकारी वकील म्हणून रायगड जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. संतोष पवार यांची नियुक्ती केली आहे.अश्विनीचे वडील माजी सैनिक जयकुमार आण्णासो बिद्रे यांनी आतापर्यंत तपास योग्य रितीने झाला नाही म्हणून मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्यापही कोणत्याही प्रकारची चौकशी झालेली नाही.कदाचित यापुढे त्यांचे काही बरेवाईट झाल्यास त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले जाईल. तसेच आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्यास त्यासही मुख्यमंत्री जबाबदार राहतील. दिवसेंदिवस तपासात विलंब न लावता आतातरी बिद्रे हत्याकांडला न्याय द्यावा, या मागणीचे निवेदन राजू गोरे व जयकुमार बिद्रे यांनी दिले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर