शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जीवावर बेतली पिकांची रखवाली, शेतकरी भाऊ सापडले अस्वलांच्या तावडीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 17:42 IST

रात्री दहाच्या सुमारास शेताकडून घरी निघालो होतो, रात्रीच्या अंधारात समोरून आलेल्या दोन अस्वलांनी आमच्यावर अचानक जीवघेणा हल्ला केला. गव्यांना हुसकावून आलो..पण, सापडलो अस्वलांच्या तावडीत. नशीब बलवत्तर म्हणूनच आम्ही वाचलो. या घटनेचा साक्षीदार असणाऱ्या सुरेशकडून हल्याचा थरार ऐकणाऱ्यांच्या अंगावरही काटे उभारल्यावाचून राहत नाहीत.

ठळक मुद्देजीवावर बेतली पिकांची रखवाली, पिळणीतील प्रसंग शेतकरी भाऊ सापडले अस्वलांच्या तावडीत !

राम मगदूम

गडहिंग्लज  : रात्री दहाच्या सुमारास शेताकडून घरी निघालो होतो, रात्रीच्या अंधारात समोरून आलेल्या दोन अस्वलांनी आमच्यावर अचानक जीवघेणा हल्ला केला. गव्यांना हुसकावून आलो..पण, सापडलो अस्वलांच्या तावडीत. नशीब बलवत्तर म्हणूनच आम्ही वाचलो. या घटनेचा साक्षीदार असणाऱ्या सुरेशकडून हल्याचा थरार ऐकणाऱ्यांच्या अंगावरही काटे उभारल्यावाचून राहत नाहीत.हकीकत अशी, चंदगडपासून १५ किलोमीटर अंतरावर आणि बाजार कानूरपासून ६ किलोमीटरवर सुमारे ९०० लोकवस्तीचे पिळणी गाव आहे. त्या गावात रविवारी (१९) रात्री ही घटना घडली. त्यात उत्तम तुकाराम गावडे (वय ३६) हा गंभीर जखमी झाला आहे. अस्वलाने लचके तोडल्यामुळे त्याच्या डाव्या पायाला सुमारे ९० टाके पडले आहेत.जंगल क्षेत्र आणि फाटकवाडी धरणाच्या पाण्यामुळे अलिकडे पिळणीसह परिसरातील आजूबाजूच्या खेड्यातील शिवारात जंगली प्राण्यांचा वावर वाढला आहे. रानगवे, अस्वल, हत्ती आदी जंगली प्राणी याठिकाणी जणू मुक्कामालाच आहेत. घटप्रभा बारमाही झाली तरी एकही पीक हाताला लागणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना रात्रं-दिवस पिकांची रखवाली करावी लागते.रविवार (१९) रात्री सुरेश व त्याचा लहान भाऊ उत्तम दोघेही नेहमीप्रमाणे गव्यांच्या रखवालीसाठी पिळणीपासून सुमारे २ किलोमीटरवर असणाऱ्या भात शेतीकडे गेले होते. तोंडाने आवाज काढून व डब्बे वाजून त्यांनी रानगव्यांना हुसकावून लावले. गवे माघारी परतल्यानंतर त्यानी घरची वाट धरली.दरम्यान, गावालगतच्या पाणंद रस्त्यात समोरून आलेल्या दोन अस्वलांनी त्यांच्यावर हल्ला केला. काठीशिवाय दोघांच्याही हातात कांहीच नव्हते. समोर असणाऱ्या उत्तमला खाली पाडून अस्वलाने त्याच्या पायाचे लचके तोडायला सुरूवात केली. त्यावेळी सुरेशने जीवाच्या आकांताने आरडाओरडा करून अस्वलांना काठीने हुसकावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अस्वलांनी जंगलाकडे धूम ठोकली.जखमी उत्तमला सुरेशने खांद्यावरून गावात नेले. त्यानंतर त्याला सरपंच लक्ष्मण चव्हाण यांच्या चारचाकीतून चंदगड ग्रामीण रूग्णालयात व त्यानंतर गडहिंग्लजच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले, तोपर्यंत रात्रीचे बारा वाजून गेले होते.आमने-सामने..!पिळणीपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पाणंदीच्या वळणावर गावाकडून जंगलाच्या दिशेने जाणाऱ्या अस्वलांची आणि शेताकडून घराकडे जाणाऱ्या गावडे बंधूंची आमने-सामने गाठ पडली. त्यामुळे दोघांची घाबरगुंडी उडाली. परंतु, पाणंदीलगतच्या कुंपणामुळे त्यांना आणि अस्वलांनाही बाजूला जाता आले नाही. दरम्यान, बॅटरीच्या उजेडामुळे बिथरलेल्या अस्वलांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्ले नित्याचेच झाले..!अलिकडेच सडेगुडवळे येथील एका शेतकऱ्यावरही अस्वलाने हल्ला केला होता. भोगोली, पिळणी, झांबरे, उमगाव या परिसरात शेतकरी आणि पाळीव जनावरांवरील जंगली प्राण्यांचे हल्ले नित्याचेच झाले आहेत. सध्या शेतात खाण्यासाठी पिके नसल्यामुळे फणस खाण्यासाठी अस्वले गावाशेजारी आली होती. फणस खावून जंगलाकडे परतताना त्यांनी हा हल्ला केला. शेतमजूर कुटूंब..गावडे यांची केवळ दीडएकर शेती आहे. जंगली प्राण्यांच्या उपद्रवामुळे ते केवळ भाताचेच पीक घेतात. इतरवेळी शेती कामासाठी ते मजुरीला जातात. किमान पोटापुरते भात मिळावे म्हणून जीवाची पर्वा न करता भातशेतीची रखवाली करताना त्यांच्यावर हा प्रसंग ओढवला.

 

टॅग्स :wildlifeवन्यजीवkolhapurकोल्हापूर