शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

कसबा बीड ते महे बंधाऱ्याचा प्रस्ताव लालफितीत

By admin | Updated: November 18, 2015 00:11 IST

उंची वाढविण्याची मागणी : पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे जनजीवन होते विस्कळीत

शिवराज लोंढे -- सावरवाडी -गेल्या ३५ वर्षांपासून पूर परिस्थितीला जनतेला तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे विस्कळीत होणारे जनजीवन, ग्रामीण दळणवळणाचा अभाव, लोकप्रतिनिधींचे झालेले दुर्लक्ष, वाहतुकीची होणारी कोंडी या साऱ्या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील ४० गावांच्या दृष्टिकोनातून कसबा बीड ते महे (ता. करवीर)दरम्यान भोगावती नदीपात्रातील बंधाऱ्याचा नव्याने उंची वाढविण्याचा प्रस्ताव शासन दरबारी धूळ खात पडला आहे. राज्य शासनाने सन १९७५ साली कसबा बीड ते महे दरम्यान भोगावती नदीपात्रात कोल्हापूर पद्धतीचा बंधारा उभारला. सुमारे ७ लाख रुपये खर्च केले होते. मुळातच या बंधाऱ्याची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात पुराच्या पाण्याची तुंब आरे, कसबा बीड, महे या गावापर्यंत येते.पावसाळ्यात या बंधाऱ्यावरून पुराचे पाणी तब्बल १५ ते २० दिवस जात असते. परिणामी करवीर पश्चिम भागातील ४० गावांची वाहतूक ठप्प होते. ग्रामीण जनजीवन विस्कळीत होत आहे. या बंधाऱ्यावरून करवीर पश्चिम भागाची वाहतूक असते, पण बंधाऱ्याच्या उंची वाढविण्याकडे लोकप्रतिनिधी व आमदार यांचे दुर्लक्ष झाल्यामुळे मुख्य दळणवळणाचा प्रश्न कित्येक वर्षे ऐरणीवर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कसबा बीड, महे बंधाऱ्याची उंची वाढविण्याची जनतेची मागणी होत असताना आमदार, खासदारांनी दुर्लक्ष केल्याने जनतेमध्ये नाराजी होत आहे. करवीर पश्चिम भागातील गेल्या कित्येक वर्षांपासूनचा दळणवळणाचा स्वातंत्र्यप्राप्तीच्या कालखंडानंतर प्रश्न सुटलेला नाही. पावसाळा पूर परिस्थितीत जनतेचे होणारे हाल आणि पर्यायी उड्डाण पुलाचा रेंगाळलेला प्रश्न मात्र अद्याप निकालात निघालेला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या बंधाऱ्याचे घोंगडे भिजत पडल्याने पावसाळ्यात जनतेचे हाल होत आहेत. बंधाऱ्याची उंची वाढविण्यासाठी मंजुरी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.कसबा बीड ते महे दरम्यान बंधाऱ्याच्या उंची वाढविण्याचा प्रस्ताव लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षपणामुळे रेंगाळलेला आहे. शासकीय फंड लावून उंची वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी लोक चळवळ उभी करावी लागणार.- राजेंद्र सूर्यवंशी, करवीर पंचायत समिती सदस्यकसबा बीड ते महे (ता. करवीर) दरम्यान भोगावती नदीपात्रातील बंधाऱ्याची उंची वाढविण्याची मागणी जनतेतून होऊ लागली आहे.