शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

कसबा बीड ते महे बंधाऱ्याचा प्रस्ताव लालफितीत

By admin | Updated: November 18, 2015 00:11 IST

उंची वाढविण्याची मागणी : पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे जनजीवन होते विस्कळीत

शिवराज लोंढे -- सावरवाडी -गेल्या ३५ वर्षांपासून पूर परिस्थितीला जनतेला तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे विस्कळीत होणारे जनजीवन, ग्रामीण दळणवळणाचा अभाव, लोकप्रतिनिधींचे झालेले दुर्लक्ष, वाहतुकीची होणारी कोंडी या साऱ्या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील ४० गावांच्या दृष्टिकोनातून कसबा बीड ते महे (ता. करवीर)दरम्यान भोगावती नदीपात्रातील बंधाऱ्याचा नव्याने उंची वाढविण्याचा प्रस्ताव शासन दरबारी धूळ खात पडला आहे. राज्य शासनाने सन १९७५ साली कसबा बीड ते महे दरम्यान भोगावती नदीपात्रात कोल्हापूर पद्धतीचा बंधारा उभारला. सुमारे ७ लाख रुपये खर्च केले होते. मुळातच या बंधाऱ्याची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात पुराच्या पाण्याची तुंब आरे, कसबा बीड, महे या गावापर्यंत येते.पावसाळ्यात या बंधाऱ्यावरून पुराचे पाणी तब्बल १५ ते २० दिवस जात असते. परिणामी करवीर पश्चिम भागातील ४० गावांची वाहतूक ठप्प होते. ग्रामीण जनजीवन विस्कळीत होत आहे. या बंधाऱ्यावरून करवीर पश्चिम भागाची वाहतूक असते, पण बंधाऱ्याच्या उंची वाढविण्याकडे लोकप्रतिनिधी व आमदार यांचे दुर्लक्ष झाल्यामुळे मुख्य दळणवळणाचा प्रश्न कित्येक वर्षे ऐरणीवर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कसबा बीड, महे बंधाऱ्याची उंची वाढविण्याची जनतेची मागणी होत असताना आमदार, खासदारांनी दुर्लक्ष केल्याने जनतेमध्ये नाराजी होत आहे. करवीर पश्चिम भागातील गेल्या कित्येक वर्षांपासूनचा दळणवळणाचा स्वातंत्र्यप्राप्तीच्या कालखंडानंतर प्रश्न सुटलेला नाही. पावसाळा पूर परिस्थितीत जनतेचे होणारे हाल आणि पर्यायी उड्डाण पुलाचा रेंगाळलेला प्रश्न मात्र अद्याप निकालात निघालेला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या बंधाऱ्याचे घोंगडे भिजत पडल्याने पावसाळ्यात जनतेचे हाल होत आहेत. बंधाऱ्याची उंची वाढविण्यासाठी मंजुरी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.कसबा बीड ते महे दरम्यान बंधाऱ्याच्या उंची वाढविण्याचा प्रस्ताव लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षपणामुळे रेंगाळलेला आहे. शासकीय फंड लावून उंची वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी लोक चळवळ उभी करावी लागणार.- राजेंद्र सूर्यवंशी, करवीर पंचायत समिती सदस्यकसबा बीड ते महे (ता. करवीर) दरम्यान भोगावती नदीपात्रातील बंधाऱ्याची उंची वाढविण्याची मागणी जनतेतून होऊ लागली आहे.