शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
2
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
3
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
4
तुम्हीही तुमच्या पगारवाढीचा हिशोब लावताय? वेतनवाढ कशी ठरते? संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घ्या
5
Manoj Jarange Patil: "माझ्या पोरांवर दादागिरी करायची नाही, एकालाही काठी लावली तर मुंबईसह महाराष्ट्र बंद करू"
6
चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची आवडती कार, मोदींनीही केली सफर! 'लाल झेंडा' असलेल्या 'या' गाडीत खास काय?
7
भारतात रस्ते अपघातात दर तासाला २० जणांचा मृत्यू, अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती
8
GST कमी झाल्यास, किती स्वस्त होऊ शकते मोस्ट-सेलिंग Maruti Ertiga? किती रुपयांचा होऊ शकतो फायदा? जाणून घ्या
9
'आरक्षण बचाव'ची मागणी, मराठा आंदोलनाचे केंद्रबिंदू अंतरवाली सराटीत ओबीसींचे उपोषण
10
मराठा आंदोलन: शिंदे गटाचे अर्जुन खोतकर आझाद मैदानात, घेतली मनोज जरांगेंची भेट; म्हणाले... 
11
Mumbai Local: मराठा आंदोलनामुळे मुंबईची लाईफलाईन खोळंबली! सीएसएमटी स्टेशनवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
12
"राष्ट्रीय पुरस्कार, आपली अपूर्ण इच्छा पूर्ण झाली...", किंग खानने राणीसोबत केलं रील, चाहते खूश
13
मराठा आंदोलन: सुट्टी असूनही मुंबई हायकोर्ट उघडले; जरांगेंविरोधातील याचिकेवर तातडीची सुनावणी
14
चीनमध्ये भारताचा पाकिस्तानला धक्का! SCO च्या जाहीरनाम्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा एकमताने निषेध
15
येत्या रविवारी खग्रास चंद्रग्रहण; 'या' वेळेत दिसणार अद्भुत लाल चंद्र! भारतातूनही पाहता येणार
16
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण सुरुच राहणार; इथेनॉलमुक्त पेट्रोलची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
17
सीएसएमटी स्टेशनवर मराठा आंदोलकांची प्रचंड गर्दी; लोकल ट्रेनच्या गार्ड केबिनमध्ये घुसले आंदोलक
18
लेडी कंडक्टरला तब्बल ६१५९ कॉल, ३१५ मेसेज; ‘तो’ म्हणाला, ‘माझ्याशी लग्न कर नाहीतर…'
19
ओलाचा शेअर रॉकेट बनला, ३० दिवसांत ४७% परतावा दिला; पाडला पैशांचा पाऊस; कारण काय?
20
"रशिया-भारत खांद्याला खांदा लावून प्रगती करतायत..."; PM मोदी आणि पुतिन यांच्यात दीर्घ चर्चा

धान्य साठवणुकीसाठी कडुलिंबाच्या गोळ्यांची निर्मिती -: निसर्गमित्रचे अनोखे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 20:59 IST

कोणत्याही कृत्रिम रासायनिक पदार्थांचा वापर न करता कडूलिंबामध्ये नैसर्गिकरीत्या असणाऱ्या किटकनाशक गुणांचा वापर करून या गोळ्यांची निर्मिती संस्थेने केली आहे.

कोल्हापूर : येथील निसर्गमित्र परिवारामार्फत पर्यावरण रक्षणासाठी नेहमीच कृतिशील उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. याहीवेळी संस्थेच्या प्रोत्साहनामुळे धान्य साठवणुकीसाठी कडूलिंबाच्या गोळ्या आणि घरगुती कचरा व्यवस्थापनासाठी रद्दी आणि जुन्या साड्यांचा उपयोग करून रोजगार निर्मितीची संधीही उपलब्ध झाली आहे. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला गृहिणींचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

निसर्गमित्र परिवारामार्फत गुढीपाडव्याला वापरून झालेल्या कडूलिंबाच्या पानापासून साठवणुकीच्या धान्यात किटकनाशक म्हणून वापरावयाच्या गोळ्या तयार केल्या आहेत. कोणत्याही कृत्रिम रासायनिक पदार्थांचा वापर न करता कडूलिंबामध्ये नैसर्गिकरीत्या असणाऱ्या किटकनाशक गुणांचा वापर करून या गोळ्यांची निर्मिती संस्थेने केली आहे.संस्थेने मंगेशकर नगर, बेलबाग, रविवार पेठ, मंडलिक वसाहत, सरनाईक वसाहत आणि महालक्ष्मीनगर परिसरातील सुमारे ६५0 परिवारांकडे या गोळ्या सुपूर्द करून या गोळ्यांची चाचणी घेतली. या गोळ्या परिणामकारकरीत्या काम करत असल्याचा अभिप्राय या परिवाराने दिला. कडूलिंबाच्या गोळ्यांची निर्मिती संस्थेचे सदस्य आणि बीवेल फॉर्मास्युटिकल कंपनीचे विलास डोर्ले यांच्यामुळे शक्य झाली. या उपक्रमाचे संयोजन पराग केमकर, अनिल चौगुले, अभय कोटणीस, विश्वास चौगुले, सुनील चौगुले, यश चौगुले, प्रफुल्ल खेडकर, अस्मिता चौगुले यांनी केले.रद्दीपासून कागदी पिशव्या, कापडी पिशव्यांची निर्मितीसंस्थेने घरगुती कचरा व्यवस्थापनासाठी एक अनोखे पाऊल उचलले आहे. घरोघरी जुनी वापरलेली साडी आणि एक किलो रद्दी पेपर संस्थेकडे जमा करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला. यामधून १00 हून अधिक जुन्या साड्या आणि अंदाजे २५0 किलो रद्दी संस्थेकडे जमा झाली. या साड्यांपासून प्लास्टिक कॅरीबॅगला पर्याय म्हणून कापडी पिशव्या आणि कोरड्या पदार्थांसाठी रद्दीतून कागदी पिशव्या तयार करण्याचे संस्थेचे नियोजन आहे.

महिला बचत गटांना रोजगाराची संधीटाकाऊ वस्तूंचा वापर करून कापडी आणि कागदी पिशव्या निर्मितीद्वारे महिला मंडळ, महिला बचत गट यांच्याकरिता कायमस्वरूपी रोजगाराची उत्तम संधी यानिमित्ताने निर्माण झाली आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीforestजंगल