शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

माहितीचा योग्य वापर करून प्रश्न, समस्या सोडवा : वसंत भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 5:33 PM

इंटरनेट, सोशल मीडियाच्या वापरामुळे विविधांगी माहिती वेगाने उपलब्ध होत आहे. त्या माहितीचा योग्य वापर करून सर्वसामान्यांचे प्रश्न, समस्या, अडचणी सोडविण्याचे काम होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी मंगळवारी येथे केले.

ठळक मुद्देमाहितीचा योग्य वापर करून प्रश्न, समस्या सोडवा : वसंत भोसलेशिवाजी विद्यापीठातील ‘पत्रकारिता विद्यार्थी काँग्रेस’चा प्रारंभ

कोल्हापूर : इंटरनेट, सोशल मीडियाच्या वापरामुळे विविधांगी माहिती वेगाने उपलब्ध होत आहे. त्या माहितीचा योग्य वापर करून सर्वसामान्यांचे प्रश्न, समस्या, अडचणी सोडविण्याचे काम होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी मंगळवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठातील पत्रकारिता व जनसंवाद विभागातर्फे आयोजित दोनदिवसीय ‘राज्यस्तरीय पत्रकारिता विद्यार्थी काँग्रेस २०१९’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. निलांबरी सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार सुभाष देसाई होते. ‘फेक न्यूज : मिसइन्फर्मेशन अँड डिसइन्फर्मेशन’ या संकल्पनेवर विद्यार्थी काँग्रेस आयोजित केली आहे.

संपादक वसंत भोसले म्हणाले, माध्यम क्षेत्रात सध्या काहीसे गोंधळाचे, अविश्वासाचे वातावरण आहे. अशा स्थितीत फेक न्यूज, चुकीच्या माहितीचे प्रसारण रोखण्याबाबत प्रबोधन करण्यासाठी ‘विद्यार्थी काँग्रेस’ आयोजनाचा उपक्रम उल्लेखनीय आहे. पूर्वी बातम्यांसाठी माहिती संकलित करण्याकरिता फारशी साधने उपलब्ध नव्हती; त्यामुळे एखादी माहिती मिळविण्यासाठी खूप यातायात करावी लागत होती. मात्र, आता इंटरनेट, सोशल मीडिया, स्मार्टफोन, आदींमुळे कोणतीही माहिती कुठेही उपलब्ध होते.

या तंत्रज्ञानाची ही एक चांगली बाजू आहे. मात्र, दुसरीकडे या तंत्रज्ञानाचा गैरवापर करून बनावट बातम्या, चुकीची माहिती प्रसारित करण्याचे प्रकारही वाढले आहेत. ते टाळण्यासाठी आपल्याला उपलब्ध झालेल्या माहितीची सत्यता तपासून पाहावी. बदलत्या तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणात आणि सहजपणे उपलब्ध होत असलेल्या माहितीचा योग्य पद्धतीने वापर करून सर्वसामान्यांचे प्रश्न, समस्या सोडविण्याचे काम माध्यमे आणि पत्रकारांकडून व्हावे.ज्येष्ठ पत्रकार सुभाष देसाई म्हणाले, पत्रकारिता हे क्षणाक्षणाला नवे आव्हान निर्माण करणारे क्षेत्र आहे. पत्रकारितेचे शिक्षण, प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपण पत्रकार कशासाठी होणार, याचा आधी विचार करावा. आत्मपरीक्षण आणि मूल्ये निश्चित करावीत. मूल्ये निश्चित नसतील, तर फेक न्यूज निर्माण करणाऱ्यांचे प्रमाण वाढतच राहील.या ‘विद्यार्थी काँग्रेस’चे उद्घाटन प्रमुख उपस्थितांच्या हस्ते रोपाला पाणी घालून झाले. पत्रकारिता व जनसंवाद विभागाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त तयार केलेल्या बोधचिन्हाचे अनावरण संपादक वसंत भोसले यांच्या हस्ते झाले.

शिवाजी विद्यापीठात मंगळवारी पत्रकारिता व जनसंवाद विभागातर्फे आयोजित ‘राज्यस्तरीय पत्रकारिता विद्यार्थी काँग्रेस २०१९’च्या उद्घाटनप्रसंगी ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून शिवाजी जाधव, प्रसाद प्रभू, राजेंद्र पारिजात, सुभाष देसाई, निशा पवार उपस्थित होत्या. (छाया : नसीर अत्तार)

यावेळी इंटरनेटतज्ज्ञ डॉ. राजेंद्र पारिजात, ज्येष्ठ पत्रकार प्रसाद प्रभू प्रमुख उपस्थित होते. विभागप्रमुख डॉ. निशा पवार यांनी स्वागत केले. डॉ. शिवाजी जाधव यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुमेधा साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. या विद्यार्थी काँग्रेसमध्ये कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि मुंबईतील पत्रकारितेचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

विशेष कक्षाचे उद्घाटनमोबाईलचा गैरवापर टाळण्याबाबत प्रबोधन करणाऱ्या पत्रकारिता व जनसंवाद विभागातील विशेष कक्षाचे उद्घाटन या कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे अजय दुधाणे, आर. जे. शीतल माने यांनी मार्गदर्शन केले.

 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर