शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
5
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
6
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
7
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
8
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
9
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
10
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
11
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
12
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
13
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
14
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
15
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
16
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
17
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
18
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
19
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
20
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

कर्ज काढून, शिलकीतील रक्कम वापरून ‘फौंड्री’ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 12:07 PM

कच्चा मालाची वारंवार दरवाढ होत असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील फौंड्री उद्योजकांची अडचण वाढली आहे. त्यातच या दरवाढीनुसार ज्या मोठ्या उत्पादकांना (ओरिजनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर्स) पुरवठा केल्या जाणाऱ्या उत्पादनांचा सुधारित दर वेळेत वाढवून मिळत नसल्याने अधिक भर पडली आहे.

संतोष मिठारीकोल्हापूर : कच्चा मालाची वारंवार दरवाढ होत असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील फौंड्री उद्योजकांची अडचण वाढली आहे. त्यातच या दरवाढीनुसार ज्या मोठ्या उत्पादकांना (ओरिजनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर्स) पुरवठा केल्या जाणाऱ्या उत्पादनांचा सुधारित दर वेळेत वाढवून मिळत नसल्याने अधिक भर पडली आहे. करारानुसार काम करून देणे आवश्यक असल्याने कर्ज काढून, शिलकीतील रक्कम वापरून अधिकतर फौंड्री सध्या सुरू आहेत. या स्थितीमुळे उद्योजकांच्या खेळत्या भांडवलावरील ताण वाढला आहे.कोल्हापुरातील फौंड्री उद्योजक हे आपल्या देशासह जगभरातील विविध देशांतील ॲटोमोबाईल क्षेत्रातील मोठ्या उत्पादकांना त्यांच्या मागणीनुसार कास्टिंग पुरवितात. हे मोठे उत्पादक दरवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या फौंड्री उद्योजक पुरवठादारांसमवेत उत्पादन, दरवाढ आदींबाबतचा करार करतात. कास्टिंग उत्पादनांसाठी लागणाऱ्या पिग आर्यन, कॉपर, निकल, सीआय स्क्रॅप, कोळसा आदी कच्चा मालाचे दर गेल्या दीड वर्षांत १५ ते १५० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. त्यात १५ ते ३० दिवसांत पाच ते दहा टक्क्यांनी वाढ होतच आहे. त्यावर कोल्हापुरातील उद्योजक हे कच्चा मालाचे दर ज्या प्रमाणात वाढतात, त्या प्रमाणात उत्पादनाचे सुधारित दर मिळावेत, अशी विनंती या मोठ्या उत्पादकांना करतात. त्यानंतर या उत्पादकांकडून सुधारित दर मिळण्यास दोन ते तीन महिने लागतात. तोपर्यंत पुन्हा कच्चा मालाचे दर वाढतात. त्यामुळे फौंड्री उद्योजकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.आठवड्यातील दोन दिवस फौंड्री बंदउद्योजकांकडील ऑडर्सचे प्रमाण चांगले आहे. याबाबत करारानुसार काम करण्यासाठी, उद्योग सुरू ठेवण्याकरिता काही उद्योजकांनी कर्ज काढून, शिलकीतील रक्कम वापरून फौंड्री सुरू ठेवल्या आहेत. सुधारित दर वेळेत मिळत नसल्याने काही उद्योजकांनी नुकसान कमी करण्यासाठी आठवड्यातील दोन दिवस फौंड्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.उद्योजक म्हणतात?

कच्चा मालाच्या दरवाढीने कोल्हापुरातील फौंड्री उद्योजकांची मोठी अडचण झाली आहे. त्यातून दिलासा मिळण्यासाठी केंद्र, राज्य सरकारने हे दर नियंत्रणात आणावेत. मोठ्या उत्पादकांनी सुधारित दर वेळेत देणे आवश्यक आहे. -मोहन पंडितराव, अध्यक्ष, गोशिमा

मोठ्या उत्पादकांकडून सुधारित दर मिळेपर्यंत पुन्हा कच्चा मालाचे दर वाढतात. त्यामुळे फौंड्री सुरू ठेवण्यासाठी आर्थिक ताळमेळ हा कर्ज काढून, शिलकीतील रक्कम वापरून उद्योजक करत आहेत. ज्या उद्योजकांना हे करणे शक्य त्यांनी आठवड्यातून दोन दिवस फौंड्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कच्चा मालाची दरवाढ नियंत्रित ठेवण्याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे. -शामसुंदर देशिंगकर, उद्योजक

उत्पादनांचा पुरवठा केल्यानंतर पेमेंट मिळत असल्याने आणि सुधारित दर मिळण्यास वेळ लागत असल्याने फौंड्री उद्योजकांची अडचण अधिक वाढली आहे. उद्योजकांच्या खेळत्या भांडवलावरील ताण वाढत आहे. सुधारित दर वेळेत मिळाल्यास फौंड्री नियमित सुरू ठेवण्यास बळ मिळेल.  -संजय पेंडसे, अध्यक्ष, मॅक

आकडेवारी दृष्टिक्षेपातकोल्हापूर विभागातील फौंड्रींची संख्या : ३००कामगारांची संख्या : दीड लाखदरमहा उत्पादन : ७५ हजार टनवार्षिक उलाढाल : एक हजार कोटी

टॅग्स :kolhapurकोल्हापूर