शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

अडचणींवर मार्ग काढून प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:21 IST

कोल्हापूर : आंबेओहोळ धरणग्रस्तांपैकी ३८९ जणांचे पुनर्वसन आणि ५० कोटींचे वाटप झाले आहे. ३३ हेक्टर जमिनींवर आयुक्तांची स्थगिती असून, ...

कोल्हापूर : आंबेओहोळ धरणग्रस्तांपैकी ३८९ जणांचे पुनर्वसन आणि ५० कोटींचे वाटप झाले आहे. ३३ हेक्टर जमिनींवर आयुक्तांची स्थगिती असून, ती उठवण्यात येईल. त्याशिवाय अजून १६ हेक्टर जमीन उपलब्ध आहे. गडहिंग्लज, बेकनाळ येथील भूसंपादन, नागरिकांच्या वैयक्तिक, कौटुंबिक व न्यायालयीन अडचणी आहेत, त्यावर पर्याय काढून प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यास प्राधान्य देऊ, असे आश्वासन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी दिले.

आंबेओहोळ धरणाच्या घळभरणीचे काम सुरू असून, पुनर्वसन झाल्याशिवाय घळभरणी करू देणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली होती. या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर, पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन, भूसंपादन अधिकारी हेमंत निकम उपस्थित होते. यावेळी ४४ अर्जांवर चर्चा होऊन काही अर्ज निकाली काढण्यात आले.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘चिकोत्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झाले. आता आंबेओहोळच्या नागरिकांचे वैयक्तिक, कौटुंबिक अडचणी आहेत, तांत्रिक मुद्दे आहेत, शासकीय नियमावली आहे, काही न्यायालयीन प्रकरणे आहेत, त्या सगळ्यांवर पर्याय काढून शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही.’

प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी प्रकरणाच्या सद्यस्थितीची माहिती दिली. आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांसाठी बुधवारचा दिवस राखीव ठेवला आहे. यादिवशी नागरिकांनी आपले अर्ज व त्यासंबंधीची कागदपत्रे घेऊन यावे, त्या प्रश्नावर समक्ष चर्चा करून त्यावर निर्णय घेतले जातील, असे सांगितले.

श्रमिक मुक्ती दलाचे संपत देसाई म्हणाले, ‘पुनर्वसन-संपादनाच्या संकलन यादीत प्रकल्पग्रस्ताच्या कुटुंबातील सुना, नातवंडे यांना ग्राह्य धरण्यात आलेले नाही. त्यांचाही समावेश करण्यात यावा, ६५ टक्के रक्कम भरुन पर्यायी जमीन उपलब्ध करून देण्यात यावी, संकलन दुरुस्ती हे विषय मार्गी लागावेत.’

यावेळी जिल्हा परिषद सदस्य उमेश आपटे, संजय तरडेकर, शंकर पावले, बजरंग पुंडपळ, सचिन पावले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

आंदोलनाबाबत आठ दिवसांनी निर्णय

बैठकीनंतर संपत देसाई म्हणाले, ‘आज अनेक प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली असली तरी आम्ही पूर्ण समाधानी नाही. संकलन दुरुस्ती, कुटूंब व्याख्या, देय जमिनीबाबत स्पष्टता नाही, किती लोकांचे पुनर्वसन व्हायचे बाकी आहे, किती जमीन उपलब्ध आहे. किती संपादित करावी लागेल, हे माहीत नाही. पुढील आठ दिवसात यावर काय कार्यवाही केली जाते, हे बघून आंदाेलनाबाबतचा निर्णय घेऊ.’

---

एकूण प्रकल्पग्रस्त : १२००

पुनर्वसन झालेले : ८००

अंशत: पुनर्वसन झालेले : ३००

पुनर्वसन न झालेले : १००

---

फोटो नं १९०३२०२१-कोल-आंबेओहोळ बैठक

ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आंबेओहोळ धरणग्रस्तांची बैठक झाली. यावेळी अश्विनी जिरंगे, महेश सुर्वे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, क्लेमेंट बेन, प्रांताधिकारी विजया पांगारकर उपस्थित होत्या.

--