शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
3
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
4
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
5
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
6
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
7
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
8
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
9
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
10
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
11
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
12
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
13
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
14
जातगणना : मॅजिक की मंडल?
15
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
16
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
17
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
18
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
19
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
20
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...

अडचणींवर मार्ग काढून प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:21 IST

कोल्हापूर : आंबेओहोळ धरणग्रस्तांपैकी ३८९ जणांचे पुनर्वसन आणि ५० कोटींचे वाटप झाले आहे. ३३ हेक्टर जमिनींवर आयुक्तांची स्थगिती असून, ...

कोल्हापूर : आंबेओहोळ धरणग्रस्तांपैकी ३८९ जणांचे पुनर्वसन आणि ५० कोटींचे वाटप झाले आहे. ३३ हेक्टर जमिनींवर आयुक्तांची स्थगिती असून, ती उठवण्यात येईल. त्याशिवाय अजून १६ हेक्टर जमीन उपलब्ध आहे. गडहिंग्लज, बेकनाळ येथील भूसंपादन, नागरिकांच्या वैयक्तिक, कौटुंबिक व न्यायालयीन अडचणी आहेत, त्यावर पर्याय काढून प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यास प्राधान्य देऊ, असे आश्वासन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी दिले.

आंबेओहोळ धरणाच्या घळभरणीचे काम सुरू असून, पुनर्वसन झाल्याशिवाय घळभरणी करू देणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली होती. या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर, पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन, भूसंपादन अधिकारी हेमंत निकम उपस्थित होते. यावेळी ४४ अर्जांवर चर्चा होऊन काही अर्ज निकाली काढण्यात आले.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘चिकोत्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झाले. आता आंबेओहोळच्या नागरिकांचे वैयक्तिक, कौटुंबिक अडचणी आहेत, तांत्रिक मुद्दे आहेत, शासकीय नियमावली आहे, काही न्यायालयीन प्रकरणे आहेत, त्या सगळ्यांवर पर्याय काढून शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही.’

प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी प्रकरणाच्या सद्यस्थितीची माहिती दिली. आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांसाठी बुधवारचा दिवस राखीव ठेवला आहे. यादिवशी नागरिकांनी आपले अर्ज व त्यासंबंधीची कागदपत्रे घेऊन यावे, त्या प्रश्नावर समक्ष चर्चा करून त्यावर निर्णय घेतले जातील, असे सांगितले.

श्रमिक मुक्ती दलाचे संपत देसाई म्हणाले, ‘पुनर्वसन-संपादनाच्या संकलन यादीत प्रकल्पग्रस्ताच्या कुटुंबातील सुना, नातवंडे यांना ग्राह्य धरण्यात आलेले नाही. त्यांचाही समावेश करण्यात यावा, ६५ टक्के रक्कम भरुन पर्यायी जमीन उपलब्ध करून देण्यात यावी, संकलन दुरुस्ती हे विषय मार्गी लागावेत.’

यावेळी जिल्हा परिषद सदस्य उमेश आपटे, संजय तरडेकर, शंकर पावले, बजरंग पुंडपळ, सचिन पावले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

आंदोलनाबाबत आठ दिवसांनी निर्णय

बैठकीनंतर संपत देसाई म्हणाले, ‘आज अनेक प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली असली तरी आम्ही पूर्ण समाधानी नाही. संकलन दुरुस्ती, कुटूंब व्याख्या, देय जमिनीबाबत स्पष्टता नाही, किती लोकांचे पुनर्वसन व्हायचे बाकी आहे, किती जमीन उपलब्ध आहे. किती संपादित करावी लागेल, हे माहीत नाही. पुढील आठ दिवसात यावर काय कार्यवाही केली जाते, हे बघून आंदाेलनाबाबतचा निर्णय घेऊ.’

---

एकूण प्रकल्पग्रस्त : १२००

पुनर्वसन झालेले : ८००

अंशत: पुनर्वसन झालेले : ३००

पुनर्वसन न झालेले : १००

---

फोटो नं १९०३२०२१-कोल-आंबेओहोळ बैठक

ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आंबेओहोळ धरणग्रस्तांची बैठक झाली. यावेळी अश्विनी जिरंगे, महेश सुर्वे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, क्लेमेंट बेन, प्रांताधिकारी विजया पांगारकर उपस्थित होत्या.

--