शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

अट्टल गुन्हेगार कळंबा कारागृहातच गिरवितात प्राथमिक धड

By admin | Updated: July 17, 2014 00:16 IST

बनतेय गुन्हेगारांचं विद्यापीठ : अनेक सराईतांची कबुली, पोलीसही चक्रावले; अंकुश ठेवणार तरी कसा ?े

एकनाथ पाटील - कोल्हापूरखून, चोरी, चेन स्नॅचिंग कसे करायचे, पोलिसांनी पकडल्यानंतर त्यांची फिरकी कशी घ्यायची, न्यायालयात कसे बोलायचे, आपले नेटवर्क वाढविण्यासाठी परजिल्ह्यांतील गुन्हेगारांशी कसा संपर्क ठेवायचा, याचे धडे आता नवख्या गुन्हेगारांना कळंबा मध्यवर्ती कारागृहात मिळत आहेत. त्यामुळे हे कारागृह ‘गुन्हेगारांचे विद्यापीठ’ म्हणून ओळखले जात आहे. धडे देणारे दुसरे-तिसरे कोणी नसून गंभीर गुन्ह्यांत शिक्षा भोगत असलेले ज्येष्ठ कैदी शिक्षकाची भूमिका निभावत आहेत. पोलिसांच्या जाळ्यात अडकलेल्या अनेक सराईत गुन्हेगारांनी याची कबुली दिल्याने पोलीस चक्रावून गेले आहेत. १९९१ मध्ये या कारागृहाला मध्यवर्ती कारागृहाचा दर्जा देण्यात आला. खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, विनयभंग, दरोडा, घरफोडी, अपहरण, खंडणी, आदी विविध गुन्ह्यांत शिक्षा झालेल्या कैद्यांना या कारागृहात ठेवले जाते. मुंबई, ठाणे, कल्याण, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आदी ठिकाणचे सुमारे १७८० कैदी या ठिकाणी शिक्षा भोगत आहेत. सुमारे ३२ एकरांमध्ये हे कारागृह पसरलेले आहे. येथील सर्वसोयीनियुक्त११ बरॅकमध्ये कैद्यांना ठेवण्यात येते. याठिकाणी शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगारांच्यात चांगले परिवर्तन घडावे, यासाठी कारागृह प्रशासन सर्व स्तरांवर प्रयत्न करत असते. परंतु, गेल्या तीन-चार वर्षांपासून कळंबा कारागृहातील वातावरण पूर्णपणे बदलल्याची चर्चा आहे. या ठिकाणी कैद्यांमध्ये दोन गट पडले असून, त्यांच्यात वर्चस्ववादातून अनेकवेळा मारहाणीचे प्रकार घडले आहेत. गल्लीत, चौकात भाईगिरी दाखविणारे कैदी आता कारागृहातही आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत. या ‘दादा’, ‘भार्इं’ना कारागृहातील काही अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याचे समजते. बरॅक बदलण्यापलीकडे कारागृह प्रशासन कोणतीच कारवाई करत नाही. काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी शहरात खून, घरफोडी, अपहरण, लूटमार प्रकरणातील काही आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी कारागृहात राहून आम्ही एकमेकांचे मित्र बनल्याचे व त्यानंतर बाहेर पडल्यानंतर एकमेकांशी संपर्क साधून पुन्हा गुन्हे केल्याची कबुली दिली. चोरी कशी करायची, पोलिसांनी पकडल्यानंतर पोलिसांचीच फिरकी कशी घ्यायची, याचे सर्व शिक्षण कळंबा कारागृहात अनुभवी कैद्यांकडून मिळते. गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे वेगवेगळ्या गुन्ह्यांतील आरोपींची भेट कारागृहात होत असल्याने त्यांचे नेटवर्क पक्के बनते. त्यामुळे किरकोळ आरोपी हा कारागृहातून बाहेर पडताना अनुभवी डिग्री घेऊनच बाहेर पडत आहेत.४१९९१ मध्ये कारागृहाला मध्यवर्ती कारागृहाचा दर्जा४सुमारे ३२ एकरांमध्ये हे कारागृह पसरलेले ४सुमारे १७८० कैदी या ठिकाणी शिक्षा भोगत आहेत४येथील ११ बरॅकमध्ये कैद्यांना ठेवण्यात येते ४कैद्यात सध्या दोन गट पडले असून, त्यांच्यात वाद४ बरॅक बदलण्यापलीकडे त्यांच्यावर कारवाई नाहीकारागृहात कैद्यांमध्ये दोन गट नाहीत. काही असंतुष्ट कैदी कारागृहाची विनाकारण बदनामी करत आहेत. कैदी एकत्र आल्यानंतर त्यांच्यात जे काही बोलणे होते ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही. - सतीश सोनवणे, वरिष्ठ कारागृह अधिकारी