शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

पर्यावरण ऱ्हास अर्थव्यवस्थेस बाधक

By admin | Updated: February 3, 2017 00:39 IST

एच. एम. देसरडा : शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे चर्चासत्र

कोल्हापूर : भारतीय अर्थव्यवस्था ही पर्यावरणावर आधारित आहे. मात्र, सध्या पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास अर्थव्यवस्थेला बाधक ठरणारा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी गुरुवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठातील चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. आर. जी. दांडगे होते. विद्यापीठातील अर्थशास्त्र विभाग, यशवंतराव चव्हाण स्कूल आॅफ रूरल डेव्हलपमेंटतर्फे आयोजित चर्चासत्राचा विषय ‘निश्चिलनीकरण आणि केंद्रीय अर्थसंकल्प’ असा होता. प्रा. देसरडा म्हणाले, नोटाबंदी नव्हे, तर नोटा बदली झाली आहे. सरकारचा नोटाबंदीचा डाव फसला आहे. आपल्या देशाचा समता मूलक शाश्वत विकास झाला पाहिजे, तरच देशाची अर्थव्यवस्था सुधारणार आहे. नोटाबंदीमुळे सध्या बँक व्यवस्था ढासळली आहे. अर्थसंकल्पात स्मार्ट सिटी, स्मार्ट इंडिया योजनांना कमी महत्त्व दिले आहे. ठरावीक कंपन्यांना मोठे करण्याचा सरकारचा उद्देश आहे. प्रा. दांडगे म्हणाले, नोटाबंदीचे आपल्यावर काही दूरगामी परिणाम होतात का ? हे पहावे लागणार आहे. कार्यक्रमात अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. पी. एस. कांबळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. कविता वड्राळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. शशिकांत पंचगल्ले यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)डिजिटलचा बडेजाव करणारी दिशादृष्टीनोटाबंदीच्या सावटाखाली प्रस्तुत केलेल्या अर्थसंकल्पाची दिशादृष्टी ज्या डिजिटल पद्धतीचा बडेजाव, कॅशलेसचा गवगवा करणारी आहे, ही गोरगरिबांच्या हिताची नसल्याचे मत प्रा. देसरडा यांनी वार्तालापमध्ये व्यक्त केले. शेतकरी कामगार पक्षाने हा वार्तालाप आयोजित केला होता. त्यात प्रा. देसरडा म्हणाले, अर्थसंकल्पातील तथ्यांचा बारकाईने विचार केला असता देशातील सामान्य जनतेला काही विशेष लाभ मिळेल असे जाणवत नाही. या कार्यक्रमास सुनीलकुमार सरनाईक, संभाजीराव जगदाळे, बाबूराव कदम, मधुकर हरेल, अजित सूर्यवंशी, आदी उपस्थित होते.