शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण ऱ्हास अर्थव्यवस्थेस बाधक

By admin | Updated: February 3, 2017 00:39 IST

एच. एम. देसरडा : शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे चर्चासत्र

कोल्हापूर : भारतीय अर्थव्यवस्था ही पर्यावरणावर आधारित आहे. मात्र, सध्या पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास अर्थव्यवस्थेला बाधक ठरणारा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी गुरुवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठातील चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. आर. जी. दांडगे होते. विद्यापीठातील अर्थशास्त्र विभाग, यशवंतराव चव्हाण स्कूल आॅफ रूरल डेव्हलपमेंटतर्फे आयोजित चर्चासत्राचा विषय ‘निश्चिलनीकरण आणि केंद्रीय अर्थसंकल्प’ असा होता. प्रा. देसरडा म्हणाले, नोटाबंदी नव्हे, तर नोटा बदली झाली आहे. सरकारचा नोटाबंदीचा डाव फसला आहे. आपल्या देशाचा समता मूलक शाश्वत विकास झाला पाहिजे, तरच देशाची अर्थव्यवस्था सुधारणार आहे. नोटाबंदीमुळे सध्या बँक व्यवस्था ढासळली आहे. अर्थसंकल्पात स्मार्ट सिटी, स्मार्ट इंडिया योजनांना कमी महत्त्व दिले आहे. ठरावीक कंपन्यांना मोठे करण्याचा सरकारचा उद्देश आहे. प्रा. दांडगे म्हणाले, नोटाबंदीचे आपल्यावर काही दूरगामी परिणाम होतात का ? हे पहावे लागणार आहे. कार्यक्रमात अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. पी. एस. कांबळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. कविता वड्राळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. शशिकांत पंचगल्ले यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)डिजिटलचा बडेजाव करणारी दिशादृष्टीनोटाबंदीच्या सावटाखाली प्रस्तुत केलेल्या अर्थसंकल्पाची दिशादृष्टी ज्या डिजिटल पद्धतीचा बडेजाव, कॅशलेसचा गवगवा करणारी आहे, ही गोरगरिबांच्या हिताची नसल्याचे मत प्रा. देसरडा यांनी वार्तालापमध्ये व्यक्त केले. शेतकरी कामगार पक्षाने हा वार्तालाप आयोजित केला होता. त्यात प्रा. देसरडा म्हणाले, अर्थसंकल्पातील तथ्यांचा बारकाईने विचार केला असता देशातील सामान्य जनतेला काही विशेष लाभ मिळेल असे जाणवत नाही. या कार्यक्रमास सुनीलकुमार सरनाईक, संभाजीराव जगदाळे, बाबूराव कदम, मधुकर हरेल, अजित सूर्यवंशी, आदी उपस्थित होते.