शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पर्यावरण ऱ्हास अर्थव्यवस्थेस बाधक

By admin | Updated: February 3, 2017 00:39 IST

एच. एम. देसरडा : शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे चर्चासत्र

कोल्हापूर : भारतीय अर्थव्यवस्था ही पर्यावरणावर आधारित आहे. मात्र, सध्या पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास अर्थव्यवस्थेला बाधक ठरणारा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी गुरुवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठातील चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. आर. जी. दांडगे होते. विद्यापीठातील अर्थशास्त्र विभाग, यशवंतराव चव्हाण स्कूल आॅफ रूरल डेव्हलपमेंटतर्फे आयोजित चर्चासत्राचा विषय ‘निश्चिलनीकरण आणि केंद्रीय अर्थसंकल्प’ असा होता. प्रा. देसरडा म्हणाले, नोटाबंदी नव्हे, तर नोटा बदली झाली आहे. सरकारचा नोटाबंदीचा डाव फसला आहे. आपल्या देशाचा समता मूलक शाश्वत विकास झाला पाहिजे, तरच देशाची अर्थव्यवस्था सुधारणार आहे. नोटाबंदीमुळे सध्या बँक व्यवस्था ढासळली आहे. अर्थसंकल्पात स्मार्ट सिटी, स्मार्ट इंडिया योजनांना कमी महत्त्व दिले आहे. ठरावीक कंपन्यांना मोठे करण्याचा सरकारचा उद्देश आहे. प्रा. दांडगे म्हणाले, नोटाबंदीचे आपल्यावर काही दूरगामी परिणाम होतात का ? हे पहावे लागणार आहे. कार्यक्रमात अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. पी. एस. कांबळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. कविता वड्राळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. शशिकांत पंचगल्ले यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)डिजिटलचा बडेजाव करणारी दिशादृष्टीनोटाबंदीच्या सावटाखाली प्रस्तुत केलेल्या अर्थसंकल्पाची दिशादृष्टी ज्या डिजिटल पद्धतीचा बडेजाव, कॅशलेसचा गवगवा करणारी आहे, ही गोरगरिबांच्या हिताची नसल्याचे मत प्रा. देसरडा यांनी वार्तालापमध्ये व्यक्त केले. शेतकरी कामगार पक्षाने हा वार्तालाप आयोजित केला होता. त्यात प्रा. देसरडा म्हणाले, अर्थसंकल्पातील तथ्यांचा बारकाईने विचार केला असता देशातील सामान्य जनतेला काही विशेष लाभ मिळेल असे जाणवत नाही. या कार्यक्रमास सुनीलकुमार सरनाईक, संभाजीराव जगदाळे, बाबूराव कदम, मधुकर हरेल, अजित सूर्यवंशी, आदी उपस्थित होते.