शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

Kolhapur: विधानसभेसाठी आश्वासन घेऊन प्रकाश आवाडे यांची माघार, उपमुख्यमंत्र्यांशी झाली चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 12:32 IST

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर जाहीर केला निर्णय

कोल्हापूर : आगामी सहा महिन्यांत होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाने आपला विचार करावा, असा आग्रह इचलकरंजी मतदारसंघातील भाजपाचे सहयोगी सदस्य आमदार प्रकाश आवाडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धरला. त्यासंदर्भात काही आश्वासन मिळाल्यानंतरच आवाडे यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे जबाबदार सूत्रांकडून सांगण्यात आले.तिथे भाजपाचे सुरेश हाळवणकर आणि आवाडे यांच्यात विधानसभेच्या उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच होणार आहे. त्याचे पडसाद लोकसभा निवडणुकीत उमटले आहेत. आमदार आवाडे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत रविवारी रात्री झालेल्या चर्चेत भाजपाचे माजी आमदार हाळवणकर यांच्याबद्दल तक्रारी केल्याचे समजते. त्यांचा माझ्या प्रत्येक कामात हस्तक्षेप होत आहे. अशा स्थितीत सहा महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत आपण आम्हाला कोणते संरक्षण देणार आहात, अशीही विचारणा आवाडे यांनी केली.त्यासंदर्भात काही ठोस शब्द घेतल्यानंतरच आवाडे यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी कोल्हापुरातील निवासस्थानी अर्धा तास चर्चा केल्यानंतर शिंदेसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या मिरवणुकीत ते सहभागी झाले.मुख्यमंत्री शिंदे यांची आवाडे यांच्याशी कोल्हापुरात शनिवारी सायंकाळी चर्चा झाली; परंतु, तरीही ते माघार घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे ते निवडणूक लढवणार, अशी हवा झाली. तेव्हा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तुमच्या अडचणी, भावना त्यांच्या कानावर घाला आणि निर्णय घ्या, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यावर आवाडे यांनी मी सर्वांचाच मान राखून निर्णय घेतो, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार सोमवारी मुख्यमंत्र्यांशी त्यांची येथील निवासस्थानी सुमारे अर्धा तास चर्चा झाली. यावेळी राहुल आवाडे, मौसमी आवाडे, किशोरी आवाडे, स्वप्नील आवाडे, मंत्री शंभूराज देसाई, विनय कोरे, विजय शिवतारे, रामदास कदम आदी उपस्थित होते. चर्चेवेळी मात्र आवाडे कुटुंबीय आणि मुख्यमंत्री एवढेच उपस्थित होते.

डिजिटलवर आमच्या फोटोचीही ॲलर्जी..

गेल्या पाच वर्षांत खासदार माने यांनी आपल्याला कोणत्याच टप्प्यावर विश्वासात घेतलेलं नाही. त्यांच्या डिजिटल फलकावरही त्यांनी कधी आमचा फोटो लावला नाही, एवढी त्यांना आवाडे यांची ॲलर्जी होती. इचलकरंजीच्या अनेक कामांत त्यांनी आमच्या राजकीय विरोधकांनाच बळ दिले. महापालिकेतील अनेक कामे होऊ नयेत, यासाठी त्यांनी ताकद लावली. कृष्णा योजनेची पाइपलाइन बदलण्याचे काम असो की सहा जलकुंभांचे काम मंजूर असतानाही ते त्यात आडवे पडल्याची नाराजी आवाडे यांनी यावेळी बोलून दाखवल्याचे समजते.

मूळ दुखणे..इचलकरंजी शहराच्या राजकारणात खासदार माने यांनी भाजपाचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचा हात घट्ट धरला आहे. विधानसभेलाही ही जोडी एकत्र राहू शकते. हाळवणकर आणि आवाडे यांच्यात राजकीय संघर्ष आहे. त्यात माने हे हाळवणकर यांना मदत करत असल्याचा रागही आवाडे यांच्या उमेदवारीमागे होता व आहे.

असाही एक गुंता..खरंतर, गेल्या लोकसभा निवडणुकीपासून राहुल आवाडे हेच संभाव्य उमेदवार म्हणून तयारी करत आहेत. या वेळेलाही त्यांनी तशी घोषणा केली होती; परंतु, कोणत्याच पक्षाकडून त्यांना फारसे पाठबळ मिळाले नाही. शिवाय राहुल उभे राहिले आणि त्यांनी माघारच घेतली नाही तर भाजपा व मुख्यमंत्र्यांशी असलेले चांगले संबंध बिघडू नयेत म्हणून स्वत: प्रकाश आवाडे यांनीच निवडणूक लढविण्याची घोषणा केली व आवाडे गटाची ताकद दाखवून माघार घेतली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणichalkaranji-acइचलकरंजीPrakash Awadeप्रकाश आवाडे