शहरं
Join us  
Trending Stories
1
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
2
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
3
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
4
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
7
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
8
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
11
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
12
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
13
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
14
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
15
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
16
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
17
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
18
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
19
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
20
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल

'प्रकाश आंबेडकरांचा 'तो' निर्णय चुकीचा, वंचित बहुजन आघाडी पर्याय ठरत नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 22:46 IST

मला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून ऑफर आली होती. परंतु, आम्ही नरेंद्र मोदींच्या सोबत राहणार, कारण मोदींनी कामे केली आहेत.

कोल्हापूर - प्रकाश आंबेडकर हे निवडणूक लढणार असतील तर माझ्या त्यांना शुभेच्छा. पण, सोलापूरला लढायचा आंबेडकरांचा निर्णय हा योग्य नाही, त्यांना तेथे मते पडणार नाहीत. वंचित आघाडीचे उमेदवार जेवढी मते खातील, त्याचा फायदा शिवसेना-भाजपला होईल. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी ही शिवसेना-भाजपाला पूरक अशीच आहे, असेही रामदास आठवलेंनी म्हटले आहे. तसेच, वंचित आघाडी ही महाराष्ट्राला पर्याय देणारी आघाडी नाही, असेही आठवलेंनी म्हटले. 

मला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून ऑफर आली होती. परंतु, आम्ही नरेंद्र मोदींच्या सोबत राहणार, कारण मोदींनी कामे केली आहेत. हवा कुठे वाहते त्या बाजूने मी जातो. सध्या काँग्रेसची हवा नाही आणि राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार असू शकत नाहीत. त्यांनी विरोधी पक्षनेते व्हावं, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यानंतर, वंचित बहुजन आघाडीबाबत त्यांना प्रश्न विचारला असता, वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्राला पर्याय देणारी आघाडी नाही. तर, प्रकाश आंबेडकरांनीसोलापूरमधून निवडणूक लढवू नये, असा सल्लाही आठवलेंनी दिला. सोलापूरमध्ये त्यांना मते पडणार नाहीत, तरीही त्यांना माझ्याकडून शुभेच्छा. कारण, सोलापूरमध्ये आमच्याही सभांना गर्दी होते, पण त्याचे मतात रुपांतर होत नाही, असे आठवलेंनी सांगितले. तसेच, वंचित आघाडीचे उमेदवार जेवढी मते खातील, त्याचा फायदा शिवसेना-भाजपला होईल. त्यामुळे वंचित आघाडी ही शिवसेना-भाजपाला पूरक अशीच आहे, असेही0 आठवलेंनी म्हटले. 

दरम्यान, आठवले यांनी नरेंद्र मोदींसोबतच राहणार असल्याचे सांगत आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. तसेच पवारांचा निवडणूक न लढविण्याचा निर्णय योग्य असून मी त्याचे स्वागत करतो, असेही ते म्हणाले. पंतप्रधान पदासाठी आपला नंबर लागेल असे पवारांना वाटले म्हणून ते लोकसभा लढणार होते. पण, आता युतीचं सरकार येणार असल्यानेच त्यांनी माघार घेतली असेल, असा मजेशीर टोमणाही रामदास आठवेलंनी पवारांना लगावला होता. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरRamdas Athawaleरामदास आठवलेSolapurसोलापूरBJPभाजपाShiv Senaशिवसेना