शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बिल थकल्याने वीज खंडित, उचगावमध्ये व्हेंटिलेटरवरील रुग्णाचा झाला मृत्यू; भर पावसात नातेवाईकांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 13:34 IST

नातेवाईकांनी महावितरणकडे वारंवार फोन करून वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी केली. पण अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. अखेर व्हेंटिलेटर बंद पडून आमेश काळेचा मृत्यू झाला.

कोल्हापूर : उचगाव (ता. करवीर) परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने शांतिनगर भागात घरी व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. आमेश आप्पा काळे (वय ३८, रा. राजर्षी शाहू वसाहत, शांतिनगर, उचगाव) असे मृताचे नाव आहे.दरम्यान, त्याच्या मृत्यूस महावितरणचे अधिकारी जबाबदार असल्याने त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, या मागणीसाठी उचगावमधील ग्रामस्थांनी गुरुवारी भर पावसातही कोल्हापुरात ‘सीपीआर’मध्ये आंदोलन करून, मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. करवीर पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी यांनी आंदोलकांची भेट देऊन चौकशीचे आश्वासन दिल्याने सायंकाळी मृतदेह ताब्यात घेतला.घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की, आमेश काळे हे गेली दोन वर्षे फुप्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. खासगी रुग्णालयात उपचारानंतर त्यांना उचगाव येथे घरीच व्हेंटिलेटर लावून उपचार सुरू होते. त्यांच्या घरगुती वीज कनेक्शनचे वीज बिल थकल्याने ते भरण्यासाठी महावितरणने तगादा लावला. बिल भरण्यासाठी दि. २ जूनपर्यंत मुदतीची मागणी त्यांच्या वडिलांनी केली. तरीही त्यांचा वीज पुरवठा दि. ३० मे रोजी खंडित केला. वडिलांनी शेजारील भावाच्या घरात आमेशला स्थलांतरित करून तेथे व्हेंटिलेटर लावला. पण गुरुवारी सकाळी ७ वाजता परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. आमेशच्या नातेवाईकांनी महावितरणकडे वारंवार फोन करून वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी केली. पण अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. अखेर व्हेंटिलेटर बंद पडून आमेश काळेचा मृत्यू झाला.

मृत्यूस महावितरण जबाबदार असल्याचा आरोप करत अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची ग्रामस्थांनी मागणी केली, नातेवाईकांनी ‘सीपीआर’मध्ये शवविच्छेदनानंतर मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक सत्यराज घुले यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी करवीर पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी यांना निवेदन दिले.

या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आश्वासन दिल्याने नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. तणावाचे वातावरण बनल्याने गांधीनगरचे सहा. पो. नि. विवेकानंद राळेभात, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष जाधव आदींसह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. दरम्यान, याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी फोन उचलला नाही.

मुसळधार पावसातही आंदोलन

शवविच्छेदन गृहासमोर मोठ्या संख्येने आंदोलकांनी ठिय्या मारला. सायंकाळी मुसळधार पावसातही आंदोलन सुरूच ठेवले होते. त्यामुळे आंदोलकांसह पोलीसही भिजून चिंब झाले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरelectricityवीजmahavitaranमहावितरण