शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

आर्थिक मंदीमध्ये यंत्रमाग उद्योगाची होरपळ : सरकार उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 00:48 IST

वस्त्रोद्योग साखळीतील उत्पादक घटक नुकसानीत आणि दलाल, व्यापारी तेजीत, अशा विचित्र परिस्थितीमुळे महाराष्टतील शेती खालोखाल रोजगार देणारा यंत्रमाग उद्योग अडचणीत आला आहे.

ठळक मुद्देकापड उत्पादनास ५० टक्के फटका; यंत्रमागधारक, कामगार झाले बेरोजगारचार आठवड्यांत निर्णय घेण्याचे आश्वासन देणाºया वस्त्रोद्योगमंत्र्यांनी अद्यापपर्यंत काहीही केले नाही

राजाराम पाटील ।इचलकरंजी : वस्त्रोद्योग साखळीतील उत्पादक घटक नुकसानीत आणि दलाल, व्यापारी तेजीत, अशा विचित्र परिस्थितीमुळे महाराष्टतील शेती खालोखाल रोजगार देणारा यंत्रमाग उद्योग अडचणीत आला आहे. याचा परिणाम म्हणून यंत्रमाग उद्योगातील ५० टक्क्यांहून अधिक कापड उत्पादन घटले आहे. आर्थिक मंदी असली तरी तिचा सर्वाधिक फटका यंत्रमाग उद्योगाला बसत असून, शासनाची उदासिनता हेही प्रमुख कारण आहे.

देशातील वस्त्रोद्योगात असलेल्या २३ लाख यंत्रमागांपैकी सुमारे बारा लाख यंत्रमाग महाराष्टÑात आहेत. मात्र, गेल्या चार वर्षांपासून कापडाला नसलेल्या मागणीमुळे यंत्रमाग उद्योग अडचणीत आहे. जून २०१६ पासून आर्थिक मंदीची तीव्रता वाढत चालली आहे. त्याला कापूस बाजारात होणारी सट्टेबाजी कारणीभूत आहे. त्याचा परिणाम म्हणून सुताच्या भावात अस्थिरता निर्माण झाली आहे.

केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी वस्त्रोद्योगातील अडीअडचणी समजून घेण्यासाठी एक बैठक नवी दिल्लीत बोलावली. बैठकीत वस्त्रोद्योगातील प्रतिनिधी आणि आमदार व खासदारांचा समावेश होता. प्रतिनिधी व लोकप्रतिनिधींनी समस्या आणि त्यावरील उपाययोजना मांडल्या. सूतगिरण्यांसाठी लागणाऱ्या कापसाचे भाव स्थिर राहावेत, सुताचे दर किमान महिनाभर समान दराने मिळावेत, परदेशातून स्वस्त भावाने आयात होणाºया कापडावर (चिंधी) निर्बंध आणावेत, साध्या यंत्रमागांसाठी पोषक असे धोरण जाहीर करावे, अशा मागण्यांवर तीन-चार आठवड्यांत निर्णय घेण्याचे आश्वासन देणाºया वस्त्रोद्योगमंत्र्यांनी अद्यापपर्यंत काहीही केले नाही.महाराष्टÑात असलेले बारा लाख यंत्रमाग विकेंद्रित क्षेत्रामधील इचलकरंजी, भिवंडी, मालेगाव, माधवनगर-सांगली, विटा, वसमत, येवला अशा केंद्रांमध्ये आहेत. या उद्योगात गेली चार वर्षे असलेली आर्थिक मंदी, नोटाबंदी आणि जीएसटीनंतरची चलन टंचाई, त्याचबरोबर सरकारचे असलेले दुर्लक्ष अशा कारणांमुळे यंत्रमाग उद्योग मोडकळीला आला आहे. या उद्योगाची अवस्था आणि त्याची मिमांसा करणारी वृत्तमालिका आजपासून...यंत्रमाग : नुकसानीतील उद्योगकापड उत्पादनासाठी लागणारे सूत यंत्रमागधारकास रोखीने घ्यावे लागते. वीज बिल, कामगार पगार, अन्य खर्च रोखीनेच करावा लागतो. याउलट कापड मात्र उधारीवर विकले जाते. त्यासाठी मिळणारे पेमेंट, जे पूर्वी आठ-दहा दिवसांत मिळत असे, ते आता चलन टंचाईमुळे साठ ते सत्तर दिवसांनी मिळू लागले आहे. सध्या तरी पेमेंटची खात्री राहिली नाही. कारण नुकसानीतील उद्योग म्हणून यंत्रमाग उद्योगाकडे पाहिले जात आहे, असे मत यंत्रमागधारक शंकर पुजारी यांनी व्यक्त केले.

अन्यथा २५ टक्के यंत्रमाग भंगारातयंत्रमाग उद्योगासाठी लागणाºया चढ्या दराची वीज, सूत, कामगार वेतन यामुळे कापड उत्पादन खर्चात वाढ झाली. मात्र, कापडास किफायतशीर दर मिळत नसल्याने यंत्रमागधारक तोट्यात गेला आहे. त्यांच्याकडील भांडवल आता संपल्याने सरकारच्या आर्थिक मदतीचे पॅकेज मिळाले, तरच दिवाळीनंतर पुन्हा यंत्रमाग सुरू होतील. अन्यथा, सुमारे २५ टक्के यंत्रमाग कारखाने कायमचे बंद होऊन भंगारात जातील, अशी परखड प्रतिक्रिया इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी दिली.

टॅग्स :Power Shutdownभारनियमनkolhapurकोल्हापूर