शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक मंदीमध्ये यंत्रमाग उद्योगाची होरपळ : सरकार उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 00:48 IST

वस्त्रोद्योग साखळीतील उत्पादक घटक नुकसानीत आणि दलाल, व्यापारी तेजीत, अशा विचित्र परिस्थितीमुळे महाराष्टतील शेती खालोखाल रोजगार देणारा यंत्रमाग उद्योग अडचणीत आला आहे.

ठळक मुद्देकापड उत्पादनास ५० टक्के फटका; यंत्रमागधारक, कामगार झाले बेरोजगारचार आठवड्यांत निर्णय घेण्याचे आश्वासन देणाºया वस्त्रोद्योगमंत्र्यांनी अद्यापपर्यंत काहीही केले नाही

राजाराम पाटील ।इचलकरंजी : वस्त्रोद्योग साखळीतील उत्पादक घटक नुकसानीत आणि दलाल, व्यापारी तेजीत, अशा विचित्र परिस्थितीमुळे महाराष्टतील शेती खालोखाल रोजगार देणारा यंत्रमाग उद्योग अडचणीत आला आहे. याचा परिणाम म्हणून यंत्रमाग उद्योगातील ५० टक्क्यांहून अधिक कापड उत्पादन घटले आहे. आर्थिक मंदी असली तरी तिचा सर्वाधिक फटका यंत्रमाग उद्योगाला बसत असून, शासनाची उदासिनता हेही प्रमुख कारण आहे.

देशातील वस्त्रोद्योगात असलेल्या २३ लाख यंत्रमागांपैकी सुमारे बारा लाख यंत्रमाग महाराष्टÑात आहेत. मात्र, गेल्या चार वर्षांपासून कापडाला नसलेल्या मागणीमुळे यंत्रमाग उद्योग अडचणीत आहे. जून २०१६ पासून आर्थिक मंदीची तीव्रता वाढत चालली आहे. त्याला कापूस बाजारात होणारी सट्टेबाजी कारणीभूत आहे. त्याचा परिणाम म्हणून सुताच्या भावात अस्थिरता निर्माण झाली आहे.

केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी वस्त्रोद्योगातील अडीअडचणी समजून घेण्यासाठी एक बैठक नवी दिल्लीत बोलावली. बैठकीत वस्त्रोद्योगातील प्रतिनिधी आणि आमदार व खासदारांचा समावेश होता. प्रतिनिधी व लोकप्रतिनिधींनी समस्या आणि त्यावरील उपाययोजना मांडल्या. सूतगिरण्यांसाठी लागणाऱ्या कापसाचे भाव स्थिर राहावेत, सुताचे दर किमान महिनाभर समान दराने मिळावेत, परदेशातून स्वस्त भावाने आयात होणाºया कापडावर (चिंधी) निर्बंध आणावेत, साध्या यंत्रमागांसाठी पोषक असे धोरण जाहीर करावे, अशा मागण्यांवर तीन-चार आठवड्यांत निर्णय घेण्याचे आश्वासन देणाºया वस्त्रोद्योगमंत्र्यांनी अद्यापपर्यंत काहीही केले नाही.महाराष्टÑात असलेले बारा लाख यंत्रमाग विकेंद्रित क्षेत्रामधील इचलकरंजी, भिवंडी, मालेगाव, माधवनगर-सांगली, विटा, वसमत, येवला अशा केंद्रांमध्ये आहेत. या उद्योगात गेली चार वर्षे असलेली आर्थिक मंदी, नोटाबंदी आणि जीएसटीनंतरची चलन टंचाई, त्याचबरोबर सरकारचे असलेले दुर्लक्ष अशा कारणांमुळे यंत्रमाग उद्योग मोडकळीला आला आहे. या उद्योगाची अवस्था आणि त्याची मिमांसा करणारी वृत्तमालिका आजपासून...यंत्रमाग : नुकसानीतील उद्योगकापड उत्पादनासाठी लागणारे सूत यंत्रमागधारकास रोखीने घ्यावे लागते. वीज बिल, कामगार पगार, अन्य खर्च रोखीनेच करावा लागतो. याउलट कापड मात्र उधारीवर विकले जाते. त्यासाठी मिळणारे पेमेंट, जे पूर्वी आठ-दहा दिवसांत मिळत असे, ते आता चलन टंचाईमुळे साठ ते सत्तर दिवसांनी मिळू लागले आहे. सध्या तरी पेमेंटची खात्री राहिली नाही. कारण नुकसानीतील उद्योग म्हणून यंत्रमाग उद्योगाकडे पाहिले जात आहे, असे मत यंत्रमागधारक शंकर पुजारी यांनी व्यक्त केले.

अन्यथा २५ टक्के यंत्रमाग भंगारातयंत्रमाग उद्योगासाठी लागणाºया चढ्या दराची वीज, सूत, कामगार वेतन यामुळे कापड उत्पादन खर्चात वाढ झाली. मात्र, कापडास किफायतशीर दर मिळत नसल्याने यंत्रमागधारक तोट्यात गेला आहे. त्यांच्याकडील भांडवल आता संपल्याने सरकारच्या आर्थिक मदतीचे पॅकेज मिळाले, तरच दिवाळीनंतर पुन्हा यंत्रमाग सुरू होतील. अन्यथा, सुमारे २५ टक्के यंत्रमाग कारखाने कायमचे बंद होऊन भंगारात जातील, अशी परखड प्रतिक्रिया इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी दिली.

टॅग्स :Power Shutdownभारनियमनkolhapurकोल्हापूर